Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आहिल्यानगर हळहळलं... पत्नीला वाचवायला गेलेल्या पती अन् शेजाऱ्याचा विचित्र मृत्यू; ती वाचली पण...


Crime News Today: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

आहिल्यानगर हळहळलं... पत्नीला वाचवायला गेलेल्या पती अन् शेजाऱ्याचा विचित्र मृत्यू; ती वाचली पण...

Crime News Today: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा आणि शेजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. राहता तालुक्यातील अस्तगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रामदास चोळके आणि आदेश नळे अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या पत्नीचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी पतीने शेततळ्यात उडी घेतली. मात्र त्याला काही तिला वाचवता आले नाही. दोघेही बुडत असल्याचे पाहून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने शेततळ्यात उडी घेतली. या घटनेत महिलेला वाचवण्यात यश आले. मात्र पती  आणि त्या तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राहाता तालुक्यातील अस्तगाव परिसरात घडली आहे.

ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने शेततळ्याचा भराव तोडून पाणी सोडून दिले आणि दोन्ही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. रामदास सखाहारी चोळके, वय वर्षे 56 आणि आदेश आण्णासाहेब नळे, वय वर्षे 22 अशी दोघा मयतांची नावे आहेत. 

जालन्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरुडयेथील बेपत्ता तिन्हीही लहान मुलांचा शेततळयात बुडून मृत्यू झाला आहे. वरुड गावातील शेततळयातच ही घटना घडली आहे. ही तिन्हीही मुलं महादेव मंदीरात दर्शनासाठी जातो म्हणून काल सकाळी घराबाहेर पडले होते. काल रात्रीपर्यत ते घरी न आल्यानं त्यांच्या शोध सुरु झाला होता. 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहन जोशी आणि 9 वर्षीय दिपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नाव आहेत. हे तिन्हीही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरूडसह परीसरात शोककळा पसरली आहे.

Read More