हेमंत चापुडे (प्रतिनिधी) आंबेगाव जुन्नर : वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेलं जंगल यामुळे मानव-बिबट्या संघर्ष सतत वाढू लागलाय. हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग जुन्नर परिसरात एक अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करतंय. तेव्हा काय आहे हे तंत्रज्ञान आणि ते कसं काम करणार याविषयी जाणून घेऊयात.
मुंबई असो, नाशिक, नागपूर किंवा पुणे… इथल्या जंगलातले बिबटे अगदी सहज मानवी वस्तीत शिरतात आणि धुमाकूळ घालतात. अनेकदा लहानमुलं बिबट्याच्या हल्ल्याचे बळी ठरतात. त्यानंतर संतापाचा उद्रेक होतो आणि या सगळ्याला जबाबदार धरलं जातं वनविभागाला. मात्र आता हा संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आता वनविभाग चक्क AI टेक्नाॅलाॅजी वापरत आहे. त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल लागेल. उत्तर पुणे जिल्यातील बिबट्यांची वाढती घुसखोरी लक्षात घेऊन जुन्नर भागात सर्वात आधी याचा वापर करण्यात आला आहे.
१. यात मिनी काॅम्युटरचा वापर करण्यात आलाय
२. यंत्रणेत परिसरातील बिबट्यांचे फोटो सेव्ह केले आहेत
३. एका स्वयंचलित कॅमेऱ्याद्वारे आणि AI तंत्रज्ञानाद्वारे ही यंत्रणा काम करते
५. ३५ मिटरहून दूरची इमेज या कॅमेऱ्यात कैद होते
६. AI मशिन लर्निंग, डीप लर्निंग अल्गोरिदमच्या आधारे काम सुरु करते
७. तीन सेकंदात मशिन बिबट्याची ओळख पटवते आणि तातडीने यंत्रणा अलर्ट करते
८. यंत्रणेद्वार गावात १२० डेसिबलचा म्हणजेच जेट विमानाच्या आवाजा एवढा सायरन वाजतो
९. तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि वनविभागाचे कर्मचारी यांना SMS जातो
गंमत म्हणजे या कॅमेऱ्यापुढे इतर कोणतेही व्यक्ती किंवा प्राणी आलं तर यंत्रणा सायरन देत नाही. आंबेगाव तालुक्यात या यंत्रणेचा प्रथमच वापर होतो आहे. हे AI तंत्रज्ञान असल्याने ते कमालीचं अचूक आहे. आता ग्रामस्थ या यंत्रणेची कशी काळजी घेतात यावरच त्याचं यश अवलंबून आहे.