Ajit Pawar and Supriya Sule: लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठा गट बाहेर पडला. ज्याचा वाद नंतर कोर्टात गेला आणि अजित पवारांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले. शरद पवार आणि पवार घराण्यासाठीदेखील हा मोठा धक्का होता. लोकसभा निवडणुकीत मागे पडल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकत ती कसर भरुन काढली होती. या दरम्यान पवार कुटुंब एकक्ष येणार का? असा प्रश्न विचारला जात असतो. याला उत्तर देणारा एक फोटो समोर आलाय. यामुळे सुप्रिया सुळे अजितदादांमध्ये पॅचअपची चर्चा रंगू लागली आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2025
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार ही भावंड एकाच व्यासपीठावर दिसली. यावेळी दादा-ताईंमध्ये पहिल्यांदाच हास्यविनोद झालेला पाहायला मिळाला. यामुळे सुप्रिया सुळे अजितदादांमध्ये पॅचअपची चर्चा सुरु झाली आहे.
ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण मागील 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करायचा? यासंदर्भातल्या बैठकीत दोन्ही नेते उपस्थित होते.. दरम्यान या बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवार याच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती.
अजित पवार, शरद पवार एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झालीय.. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरुन राऊतांना टोला लगावलाय. तर सामाजिक संस्थासंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार, शरद पवार एकत्र येतात त्यात वावगं नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय. शरद पवार, अजित पवारांनी एकत्र यावं अशी भावना रोहित पाटील यांनी देखील व्यक्त केलीय. दोन्ही नेते एकत्र आल्यास पक्षसंघटना मजबूत होईल असा दावा त्यांनी केलाय.. तर भेटीगाठी एकत्र येण्यासाठी नसतात असं विधान विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलंय.
अजित पवार आणि शरद पवार तिस-यांदा एकत्र आले आहेत. 10 एप्रिलला जय पवारच्या साखरपुड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. 13 एप्रिलला साता-यात रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. आणि त्यानंतर आज एआय तंत्रज्ञानाचा शेतीत कसा उपयोग करायचा? यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र आलेत.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं.. मात्र, मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे शरद पवारांबाबतचे सकारात्मक वक्तव्य. त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय.
अजित पवार आणि शरद पवारांचं वारंवार एकत्र येणं. त्यातल्या त्यात शरद पवारांचे गोडवे गाणं यामागे अजित पवारांचा मोठा उद्देश असल्याचं बोललं जातंय. तसंच दोन्ही नेते लवकरच एकत्र येणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही एकत्र येणार की फक्त हवाच आहे. ते पाहणं महत्त्वाचं ठरणाय.