Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणतही काम होणार असेल तर ते हो सांगतात. आपल्या कार्यक्षेत्रात नसेल तर तसं स्पष्ट सांगतात. अधिकाऱ्यांनाही तशाप्रकारच्या सूचना ते वेळोवेळी करत असतात. भाषण देताना कधी चुकीचा शब्दप्रयोग झाला आणि त्यांच्या लक्षात आला तर ते तात्काळ माफीदेखील मागतात. असाच एक प्रकार अजित पवारांसोबत नुकताच घडला.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सेवेत आला आहे. इगतपुरी-आमणे मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरून एकत्रित प्रवास केला. दरम्यान अजित पवारांनी बोलण्याच्या भरात एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
सत्तांतर आणि पदांची अदलाबदली यामुळे काही वेळा नकळतपणे एखाद्या पदाचा उल्लेख चुकून केला जातो. याचंच उदाहरण समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी चुकून अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला. मात्र लगेचच त्यांना झाला प्रकार लक्षात आला. त्यावर त्यांनी आपली चूक सुधारली.
Ajit Pawar On Eknath Shinde | अजित पवारांकडून एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; पाहा व्हिडिओ #ajitpawar #devendrafadnavis #marathinews #eknathshinde #maharashtrapolitics pic.twitter.com/nAr80pXP7M
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 5, 2025
शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. अजित पवार आमची विकासकामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केलीये.. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचं एकनाथ शिंदें नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकासकामं थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे.. तर सरकारमध्ये सर्वांना समान अधिकारी मिळावा, अशी भावना देखील व्यक्त केली आहे. यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्यानं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे केली. यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती. महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे पहायला मिळत असलं तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय पाऊले उचलतात ते पहावे लागेल.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील महायुती सरकारला टोला लगावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही टीका करण्यात आलीय. "मध्यंतरी भाजप आमदारांनीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. अजित पवारांना आवरा, असे गाऱ्हाणे घेऊन भाजप आमदार अमित शहा यांना भेटले. त्यावर ‘त्यांच्या इतके मागे लागा की, अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत’, असा डबल इंजिन सरकारचा आदर्श कानमंत्र अमित शहांनी आपल्या आमदारांना दिला. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे असे मनोरंजक महानाट्य सुरू आहे. 132 आमदार असलेल्या भाजपला व अमित शहांनी स्थापन केलेल्या मिंधे पक्षालाही अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल," असा खोचक चिमटा अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.