Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळं रॉबर्ट वाड्रा अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल होणार?

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळं रॉबर्ट वाड्रा अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल होणार?

Pahalgam Terror Attack: काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 मे रोजी सुनावणी पार पडली. हायकोर्टाने याचिका निकाली काढली असून आता फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.

न्यायाधीश राजन राय आणि जस्टिस ओम प्रकाश शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी याचिका दाखल करण्यात आले. ही याचिका हिंदू फ्रंट फार जस्टिस आणि अन्यजणांकडून दाखल करण्यात आली होती. याचिकेत मागणी करण्यात आली होती की, या प्रकरणी एसआयटी गठित करण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच, रॉबर्ट वॉड्रा यांच्यावही कारवाईचे आदेश देण्यात यावे, असंही नमूद करण्यात आलं आहे. 

 रॉबर्ट वाड्रा यांनी काय म्हटलंय?

याचिकेनुसार, रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं होतं की, पहलगाममध्ये हिंदूवर हल्ला झाला कारण दहशतवाद्यांना वाटत असेल की देशातील मुसलमानांना चुकीची वर्तवणूक देण्यात येत आहे. जेव्हा पण सांप्रदायिक मुद्दे पुढे येतात आणि लोकांना असुरक्षित वाटू लागते तेव्हा देशात दोन गट पडतात. त्याचा फायदा शेजारी राष्ट्रांना होतो. आता राजकारण आणि धर्म वेगळा करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. 

याचिकेत काय म्हटलं?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांच्या वक्तव्यानंतर हिंदू फ्रंट फॉर जस्टिज आणि अन्य संघटनांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र सरकारने या प्रकरणी SIT स्थापन करावी आणि वाड्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टाला वाड्रा यांच्याविरोधात BNS अंतर्गंत कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशीही मागणी केली आहे. 

पहलगाममध्ये 26 लोकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात फिरायला आलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता. 

Read More