बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आणि गाडी अक्षकसः चक्काचूर झाली आहे. घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना बीड येथील गढी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली.
गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे हे सहा जण गाडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने थेट त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेत सर्व सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून, अपघातग्रस्त कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील रहिवाशाची एसयूव्ही कार राष्ट्रीय महामार्ग 52 वर 100 किमी अंतरावर असलेल्या गढी गावाजवळ दुभाजकावरुन चढली. यावेळी सगळेजण गाडीवरुन खाली उतरले. आणि एसयूव्ही गाडीला बाजू करण्याचा प्रयत्न सुरु केला. या सगळ्यात व्यस्त असताना 11.30 च्या सुमारास एका ट्रकने त्यांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण झाला की, सहा जणांचा मृत्यू झाला.
Beed Accident | बीडच्या गढीजवळ भीषण अपघात; अपघातात सहा जणांचा मृत्यू #beed #accidentnews #marathinews #zee24taas pic.twitter.com/KviqNiP8S8
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 27, 2025
कांदा घेऊन येणार ट्रक उलटला तर सिमेंट मीक्षचर रस्त्याच्या कडेला खचल्याने मोठा अपघातझाला आहे. नाशिक हुन मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवर माजीवडा पुलाच्या अलीकडे भर रस्त्यात ट्रक उलटला तर त्याच्याच बाजूला सिमेंट मिक्सर पावसाने झालेल्या चिखलात रुतला.दोन्ही अपघाताने मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून खारिगाव ते माजीवडा उड्डाण पुलापर्यंत मोठी वाहतुकीची कोंडी झालीय..वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे