Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नेत असताना पूल कोसळला अनेक जण जखमी

पार्थिव अंत्यविधीसाठी नेत असताना मृत्यू

अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नेत असताना पूल कोसळला अनेक जण जखमी

सातारा : अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नेत असताना एका ओढ्यावर असलेला पूल कोसळून १० ते १५ जण जखमी झाले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या दुर्गम भागातल्या एका गावात ही दुर्घटना घडली. या गावातल्या वृद्ध महिला कृष्णाबाई कदम यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी नेत होते. त्यावेळी ५० वर्षे जुन्या लोखंडी पुलावर अंत्ययात्रा आली असता पूल तुटला. अचानक मधोमध पूल तुटल्यामुळे १० ते १५ लोक खाली कोसळले. घटनेत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.

Read More