काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एका लेखात सत्ताधारी पक्षाचा निवडणूक आयोगाशी झालेल्या सामन्याचा उल्लेख केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट पोस्ट केली होती. यामध्ये राहुल गांधी यांनी हेराफेरीबद्दल बोलले होते. ज्यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत म्हटले होते की निवडणूक हरल्यानंतर काही लोक निवडणूक आयोगावर खोटे आरोप करतात. हे चुकीचे आहे आणि त्यामुळे आयोगाची प्रतिमा मलिन होते. राहुल गांधींच्या आरोपांवरून महाराष्ट्रात राजकारणही तापले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी जोपर्यंत जमिनीवर उतरणार नाही, खोटं बोलणं सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष जिंकणार नाही अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून पाणी समस्येवर चर्चा होणार आहे, वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून होत आहे. त्यातून ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील शासन देखील तत्पर असेल विद्यापीठाने उत्तम उपक्रम राबवत आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. जोवर राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःची जोड खोटं बोलणं सोडणार नाही कुठे आश्वासनाने दिलासा देना सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही त्यांना जागा व्हावे लागेल समजून घ्यावे लागेल. अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसतं ऐकणाऱ्या समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी टिका केली आहे.
रोज खोटं बोललं की, लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात यापूर्वी त्यांनी असा आरोप केलेला आहे. निवडणूक आयोगाने सहप्रमान दिली. निवडणूक आयोगाने आकडेवारी सह प्रमाण दिले. रोज खोटं बोलण्याची सवय राहुल गांधी यांना लागलेली आहे. राहुल गांधी फोटो बोलून स्वतःच्या मनाला समजावतात जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलाही भवितव्य उरलेलं नाही. स्वतःशी खोट बोलून स्वतःला दिलासा देण्याच काम राहुल गांधी करत आहे. आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान राहुल गांधी करत आहे, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
दोन्ही भावाच्या युतीवर रोज काय बोलणार आहे. मी कालच बोललो. "हिंदीत महान कब बाप बनेगा कब बैल बटेंगे.. तुम्ही रोज पतंगे उडून राहिले, त्यावर उत्तर देत बसायला, एवढेच धंदे नाही मला.." असं मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर म्हटलं आहे.