Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हे कधी थांबणार! शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं होऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी मुलीने लिहिलेली चिठ्ठी वाचून परिसरातील सर्वांचे डोळे पाणावले

हे कधी थांबणार! शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं होऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि त्यामुळे आई-वडिलांना ओझं नको म्हणून 17 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे. सेजल जाधव असं मुलीचं नाव असून ती बारावीत शिकत होती. आत्महत्येपूर्वी सेजलने चिठ्ठी लिहिली असून त्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा इथल्या छीदवाडी गावात सेजल आपल्या कुटुंबासोबत रहात होती. महागाई, आमचे शिक्षण हे सर्व करत असताना आई, वडिलांना फार कष्ट करावे लागतात त्यामुळे माझे ओझे कमी व्हावे याकरिता मी आपले जीवन संपवत आहे असं लिहून सेजलनी घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

वडिलांना शेतमजुरी आणि तीन एकर शेती करून घराचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी, घरातील आर्थिक परिस्थिती त्यामुळे उदरनिर्वाह होत नाही, त्यातही आम्ही दोन बहिणी, एक लहान भाऊ अश्या सर्वांच्या पोटाचा प्रश्न बिकट होत आहे. आमच्यावर खूप कर्ज आहे. शेतात 3 वर्ष झाले उत्पन्न खूप कमी झालं आहे. 

मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे. आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही. माझी बहिण कामाला जाते, तीने माझ्यासाठी शाळा सोडली, ही गोष्ट माझ्या मनात घर करुन बसली आहे. असं चिठ्ठित लिहून सेजलने आत्महत्य केली.

सेजलच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read More