Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा, या कृषीमंत्र्यांचं करायचं काय?

Agriculture Minister Manikrao Kokates: अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडलाय.

कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा, या कृषीमंत्र्यांचं करायचं काय?

Agriculture Minister Manikrao Kokates: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंनी शेतक-यांकडे कर्जाचा तगादा लावलाय. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरलं पाहिजे असं विधान त्यांनी केलंय. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतलाय. कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा वादंग निर्माण झालंय. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्यवेळी कर्जमाफी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री कोकाटे मात्र, शेतक-यांकडे कर्जाचा तगादा लावतायत. त्यामुळे कोकाटेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय.

अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतकरी कुठून कर्ज भरणार असा सवाल अनिल देशमुखांनी उपस्थित केलाय. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळी कोणती ते सांगावं असाही खडा सवाल त्यांनी राज्य सरकारला
केलाय.

कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?

शेतकरी कर्जमाफीवरून याआधीही माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांना तंबी देखील दिली होती.. शेतकऱ्यांना एक रुपायात पीकविमा दिला. एक रूपया भिकारी देखील घेत नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसंच कर्जमाफीच्या पैशांनी शेतकरी मुलांचं लग्न लावतात. कोकाटेंच्या या वक्तव्यानंतर देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

कर्जमाफीचं आश्वासन कधी होणार पूर्ण?

विधानसभा निवडणुकी महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांकडून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या झोळीत भरूभरून मतं टाकली. आणि कधी न मिळालेल्या यश पहिल्यांदा महायुतीला मिळालं.
मात्र, सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

अशा प्रकाराची वक्तव्य का?

योग्य वेळी शेतक-यांची कर्जमाफी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.. मात्र, असं असतांना देखील कृषीमंत्र्यांकडून कर्जासाठी शेतक-यांकडे तगादा का लावला जातोय? तसंच याआधीही
कृषीमंत्र्यांनी शेतक-यासंदर्भात वादग्रस्त विधान केली होती. सरकारमधील सहकारी पक्षांनी देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी दिली होती.. तरीही सातत्यानं माणिकराव कोकाटे अशा प्रकाराची वक्तव्य का करतात? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

Read More