Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ईडी ऑफिसला आग, संशयाचा धूर, 24 तासानंतरही ED ऑफिसच्या आगीचं कारण अस्पष्ट

रविवारी सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयाला आग लागली. या आगीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित कागदपत्र जळल्याची
माहिती सूत्रांनी दिली आहे.  

ईडी ऑफिसला आग, संशयाचा धूर, 24 तासानंतरही ED ऑफिसच्या आगीचं कारण अस्पष्ट

ED office Fire : रविवारी सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयाला आग लागली. या आगीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित कागदपत्र जळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यानंतर विरोधकांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर महत्त्वाची सर्व कागदपत्र डिजिटल स्वरुपात सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण ईडीकडून देण्यात आलं आहे.

मुंबईत ईडीच्या ऑफीसला आग लागलेल्या आगीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. या आगीत महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षापासून देशाचं राजकारण हे ईडीच्या अवतीभोवती फिरत आहे. त्यात आता ईडीच्या ऑफीसला लागलेल्या आगीनंतर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातो आहे. ईडी ऑफीसला लागलेल्या आगीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

मुंबईत ईडी कार्यालयाला आग

रविवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयाला आग लागली. आगीत मेहुल चोक्सी, नीरव मोदी, छगन भुजबळांच्या संबंधित फाईल जळाल्याची सूत्रांची माहिती आहे. सुमारे 10 तासानंतर अग्निशमनदलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं. आगीमुळे कार्यालयातील चौथ्या मजल्यावर मोठं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अस्पष्ट, चौकशीनंतर आगीचं कारण स्पष्ट करण्यात येणार आहे. 

ईडी कार्यालयात लागलेल्या आगीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी देखील संशय व्यक्त केला आहे. ईडी ऑफिसला आग लागली की लावली गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर ईडी कार्यालयात लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वकील असीम सरोदेंनी केली आहे. या आगीत छगन भुजबळ, नीरव मोदी, मेहुल चोक्सीं प्रकरणाशी संबंधित फाईल जळाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे.

2018 मध्येही आयकर विभागाच्या कार्यालयात लागलेल्या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्र जळाली होती. दरम्यान आता ईडी कार्यालयात लागलेल्या आगीनंतर देखील अनेक महत्त्वाच्या प्रकरणाशी संबंधित फाईल्स जळून खाक झाल्याचा संशय आहे.

Read More