Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'तू कुराणावर घेतलेली शपथ मोडली, स्वतःला...'; गुरू गोविंद सिंग साहेबजींनी औरंग्याला लिहिलेलं खरमरीत पत्र समोर

Guru Gobind Singh Sahib Letter To Aurangzeb: या पत्राची एक प्रत छत्रपती संभाजीनगरमधील एका गुरुद्वारेत आहेत. या पत्रात नेमकं आहे काय जाणून घ्या...

'तू कुराणावर घेतलेली शपथ मोडली, स्वतःला...'; गुरू गोविंद सिंग साहेबजींनी औरंग्याला लिहिलेलं खरमरीत पत्र समोर

Guru Gobind Singh Sahib Letter To Aurangzeb: औरंगजेबसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं निलंबन करण्यात आलं आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबसंदर्भातील विषयावरुन जोरदार चर्चा असताना आता औरंगजेब क्रूर होता त्याने अनेकांचा छळ केल्याचा नवा पुरावा समोर आला आहे. खरं तर औरंगजेब हा क्रूर होता आणि त्याच्या कारकिर्दीत त्याची प्रचंड दहशत होती अशी इतिहासामध्ये नोंद आहे. मात्र त्याच्या या दुष्ट कृत्याची आठवण त्याला शिखांचे दहावे गुरू म्हणजेच गुरू गोविंद सिंग साहेब यांनी करुन दिली होती. त्यांनी औरंगजेबला पाठवलेल्या पत्राला झफरनामा असं म्हणतात. झफरनामाचा अर्थ होतो विजयाचे पत्र. असेच एक पत्र सध्या समोर आलं आहे.

कधीचं आहे हे पत्र? काय लिहिलं आहे यात?

गोविंद सिंग साहेब यांनी 1705 मध्ये हे पत्र औरंगजेबला पाठवले होते. महत्वाचं म्हणजे पंजाबच्या दीना कंगडमधून हे पत्र गुरू गोविंद सिंग यांचे दोन सहकारी दिल्लीत घेऊन आले होते. त्यांनी औरंगजेबच्या सैन्याला लाच देऊन औरंगजेबची भेट घेतली आणि स्वहस्ते हे पत्र औरंगजेबाला दिले होते. हे पत्र औरंगजेब याची मुलगी झेबुनीसाने औरंगजेबला वाचून दाखवले होते. या पत्राची एक प्रत आजही छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागातील गुरुद्वारात ठेवली आहे. गुरू गोविंद सिंग यांनी स्वत: फारसी भाषेत हे पत्र लिहले आहे.

काय आहे पत्रात..

> हे पत्र फारसी कवितेत लिहिले गेले आहे. यात गुरू गोविंद सिंग साहेब यांनी औरंगजेबच्या फसवणुकी, कपट, अत्याचार, धार्मिक ढोंग आणि युद्धातील अन्यायकारक कृतींचा तीव्र निषेध केला आहे.

> या पत्रामध्ये गुरू गोविंद सिंग साहेब यांनी औरंगजेबच्या खोट्या शपथा, युद्धातील कपट, धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार आणि त्याच्या राज्यकर्तृत्वातील ढोंग यांचे पर्दाफाश केला.

> झफरनामा हे केवळ एक तक्रारपत्र नसून, ते एक नैतिक विजयाचा आणि धार्मिक अधिष्ठानाचा दस्तऐवज आहे. जिथे गुरू गोविंद सिंग साहेब औरंगजेबला थेट सांगतात की त्याचा अन्याय आणि अत्याचार अधिक काळ टिकणार नाहीत, आणि शेवटी सत्यच विजयी होईल.

> गुरू गोविंद सिंग साहेब यांनी झफरनामामध्ये औरंगजेबच्या कपटी स्वभावाचा, युद्धातील कायरतेचा आणि अत्याचारी प्रवृत्तीचा पुरावा दिला आहे. त्यांनी हे पत्र केवळ औरंगजेबच्या गुन्ह्यांची यादी म्हणून नव्हे, तर एक स्पष्ट संदेश म्हणून पाठवले की सत्य, शौर्य आणि धर्मनिष्ठा हेच अंतिम विजय मिळवतील.

> झफरनामाच्या शेवटी, गुरू गोविंद सिंग ईश्वरी न्यायावर श्रद्धा ठेवून औरंगजेबला सावध करतात की त्याचे पाप आणि अन्याय लवकरच त्याच्यावर उलटतील. त्यांनी सांगितले की सत्ताधीशाचा खरा न्याय त्याच्या तलवारीने नव्हे, तर त्याच्या सत्यतेने मोजला जातो.

पत्रातील इतर आरोप काय?

> औरंगजेबने कुराणावर घेतलेली शपथ मोडली आणि फसवणूक केली.

> भ्याड युद्धनीतीने चामकौरच्या लढाईत कपटाने हल्ला केला.

> गुरू गोविंद सिंग साहेब यांच्या चार निष्पाप मुलांची क्रूर हत्या केली.

> शरण आलेल्या शीख सैनिकांचा छळ आणि हत्या केली.

> स्वतःला धार्मिक सम्राट म्हणवून घेतो, पण धर्माच्या तत्त्वांना पूर्णतः विरोध करतो.

> सत्य आणि न्यायाच्या विरुद्ध कारभार करून मुघल साम्राज्याला अधःपतनाकडे नेले.

Read More