Pratap Sirnaik On Hindi: 'हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं', वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी "हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे," असं वक्तव्य केलं आहे. विधानाची सध्या मोठी चर्चा आहे.
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापलं होतं. हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळं हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुदध मराठीत बोलतो. जेंव्हा मिरा भाईंदरकडे जातो तेंव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो आहोत. असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे म्हणून शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी लाडकी बहीण आते बहीण मावस बहीण असे प्रकार नव्हते. आणि हेच लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत. त्यांचे नेते जे आहेत त्यांना विचाराव हा जो विचार आहे मराठी संदर्भातला हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. हे जे विचार मांडत आहेत हा भाजपचा आणि अमित शहा यांचा विचार आहे.शिंदे सेनेचे नेते अमित शहा आहेत हे मी वारंवार सांगतो आहोत, त्यामुळे अमित शहा यांना जे बोलायचं आहे ते ही लोकं बोलतात, अशी टीकादेखील त्यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक मराठी बोलतात. ते बोलले तेथे हिंदी वर्ग बसलेला असावा, असे ते म्हणाले.
महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा चार टक्के लोक मराठी बोलायचं. महाराजांनी ती भाषा 70 टक्क्यांवर नेली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा भाषावार प्रांतरचना झाली. मुंबई मराठी माणसांची आहे याच मुद्द्यावर महाराष्ट्राला यश मिळालं. माझ्या राजाची राज्याची मुंबईची आणि माझ्या बापाची वाडवडिलांची भाषा मराठी आहे. मुंबई देखील मराठी माणसांची आहे हे प्रताप सरनाईक यांना माहिती आहे की नाही अगोदर त्यांचे मंत्री हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायला हवा असा बडबडले होते.त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांना सांगावसं वाटतं आपल्या मंत्र्यांना आवरा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली. मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई घाण ठेवणार असणार ते आम्हाला मान्य नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी लढत राहू, असे ते पुढे म्हणाले.