गुणरत्न सदावर्ते यांनी तीन भाषा महाराष्ट्रात शिकवल्या गेल्या पाहिजे हिंदीचा आग्रह असला पाहिजे ही भूमिका मांडली. ही भूमिका घेतल्याने राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करू गाडीच्या काचा फोडू अशा मारण्याच्या धमक्या सत्र सदावर्ते यांना सुरू केले आहे.
राज ठाकरेंनी जबाबदारीनं बोलावं असं आवाहन करत, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध केला आहे. हिंदीची सक्ती झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशा-यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा सदावर्तेंनी दिला आहे. तसेच राज ठाकरे गल्लीतील नेते असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मनसे नेते नयन कदम यांनी म्हटलं आहे की, गुजरातमध्ये तीन भाषांचा आग्रह नाही. मग महाराष्ट्रात हा अट्टाहास का? जर अशाच पद्धतीने माकडचाळे करत राहिले तर त्यांच्या घरावर आणि गाडीवर मनसैनिक हल्ला करतील अशी भूमिका मनसे नेते यांनी मांडली आहे.
राज ठाकरे नीट बोलायचं सटकल्यासारखं बोलायचं नाही शिक्षकांच्या विरोधात भूमिका जर घेतली तर रस्त्यावर फिरणं तुमचं अवघड होईल, अशा पद्धतीने त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं जुलैपर्यंत गाव पाड्यांपर्यंत हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो तुम गल्ली के नेता हो दिल्ली के नेता अमित शहा आणि मोदी साहेबांवर बोलू नका. राज ठाकरे काय म्हणतात कोणती भाषा शिकवायची उर्दू, चायनीज कोणती भाषा? राष्ट्रीय धोरण आहे तीन भाषा शिकवायचं, उगाच राजकारण राज ठाकरेंनी करू नये. उद्धव आणि राज ठाकरे या दोघांचीही भाकरी शिजणार नाही, हे दोघेही बिन बुडाचे आहेत. राज ठाकरे याद राखा तुम्ही किंवा तुमच्या पिल्लावळ्यांनी पाठ्यपुस्तक किंवा कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर त्याची कायदेशीर परिणाम होतील राज ठाकरे ते राज ठाकरे ला ते महाग पडतील राज ठाकरे ला ते महाग पडतील. हिंदी भाषा आहे आता इंग्रजीपेक्षा मोठी होत चाललेली आहे.