Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'फडणवीसांमुळे मी परत आलोय' छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे परत आलोय असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. 

'फडणवीसांमुळे मी परत आलोय' छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

अमर काणे, (प्रतिनिधी) नागपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात पुरागमन झालं आहे.  मात्र मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे परत आलोय असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र जवळपास 6 महिन्यांनंतर भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक झालंय. त्यांना अन्न आणि नागरि पुरवठा खातंही देण्यात आलंय. मात्र मंत्री मंडळात पुनरागमन झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे परत आलोय असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. 2024 च्या निवडणुकीनंतरही माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस यांनी आग्रह धरला होता. मात्र तेव्हा पक्षाने निर्णय घेतला नाही हे सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत. 

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मंत्रिमंडळात कमबॅक झाल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं खरं तर दुसरीकडे मी राष्ट्रवादीचा मंत्री आहे. भाजपचा मंत्री नाही असंही स्पष्ट केलं आहे.  पक्षाचा निर्णय अंतिम असल्याचं म्हणत अजितदादा नाराज होणार नाहीत याचीही काळजी घेतल्याचं दिसलं. मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर दरम्यानच्या काळात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीत वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. 

भुजबळांची फडणवीसांशी वाढती जवळीक : 

मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर भुजबळ प्रचंड नाराज होते. मंत्रिपद डावलल्यानंतर भुजबळांची फडणवीसांशी जवळीक वाढली. 23 डिसेंबर 2024  भुजबळांकडून अचानक सांगर बंगल्यावर जात फडणवीसांची भेट घेतली. सांगर बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा केली. 3 जानेवारी 2025 पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस यांची भेट झाली. एकाच गाडीतून फडणवीस आणि भुजबळांचा 50 मिनिटं प्रवास केला. या गाठीभेटींनंतर भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा केली. 

छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की भुजबळांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा विरोधात होता. त्यामुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा भुजबळांच्या पथ्यावर पडला आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.  

Read More