Breaking News Today: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून चार दिवस झाले आहेत याबद्दलचे अजूनही अनेक अपडेट्स येत आहेत. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं देशात खळबळ उडाली आहे. तर, एकीकडे महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. यासह देशभरातील आणि राज्यभरातील ठळक घडामोडींचा आढावा जाणून घेऊयात.
इंद्रयाणी नदी पूल दुर्घटनेत मृत पावलेल्याना शासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर. तर जखमी रुग्णांवरल उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात आज सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने बळीराजा शेतकऱ्याची मात्र चिंता वाढवली आहे. नुकतीच पेरणी झालेल्या खरीप हंगामाच्या पिकांना या पावसाचा फटका बसणार असून तरकारी पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे,त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जुना आणि सडलेला पूल असल्याने तो कोसळला; इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रियाhttps://t.co/pTa1qGoigN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
Pune News : पुण्याजवळील कुंडमाळा पावसाळ्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण, दुर्घटनेपूर्वीचं निसर्ग सौंदर्य पाहून पडाल प्रेमात#pune #bridge #Indrayanihttps://t.co/v0UsK8uV4s
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
Indrayani Bridge Collapse: 'पुलावर 200 ते 250 लोक होते,' बचावलेल्या तरुणाने सांगितला सगळा घटनाक्रम, '75 टक्के लोक...'https://t.co/wHJRkf0fL0#Pune #BridgeCollapse Pune Indrayani River #Indrayani
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
इ्ंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची दुर्घटना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
पुण्यात मोठी दुर्घटना! कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 6 पर्यटकांचा मृत्यू; 25 जण वाहून गेलेhttps://t.co/k7Z4KaIake
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
पुण्यात मोठी दुर्घटना! कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 6 पर्यटकांचा मृत्यू; 25 जण वाहून गेलेhttps://t.co/k7Z4KaIake
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
'पालकमंत्रिपदासाठी हपापले, आर्थिक घोटाळे उघड करु', राष्ट्रवादीच्या धमकीला गोगावलेंचे प्रत्युत्तर, 'तोंड काळं...'#BharatGogawale #NCP https://t.co/uwpfqji7UW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
Sunjay Kapur Property: 3 बायका, 4 मुलं....; संजय कपूरच्या 103000 कोटींच्या संपत्तीमधील करिश्मा कपूरला किती मिळणार?https://t.co/9XUtdveEz2#sunjaykapur #SanjayKapoor #sanjaykapoordeath #sunjaykapoor #KarishmaKapoor #KarismaKapoor
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी, टिळा पुसण्यास नकार दिल्यानं कर्मचाऱ्याची बदली!#Mumbai #Marathihttps://t.co/T7rCKjSWCa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
गुजरातमध्ये धार्मिक स्थळ पाडताना आत जे दिसलं ते पाहून अधिकारी चक्रावले; स्विमिंग पूल, बाथटबमध्ये...https://t.co/7EC3FH14a9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
सिंचन घोटाळ्यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले ज्यांनी केलंय त्यांना भरावंच लागेल. तटकरे समर्थक बोलले म्हणून सिंचनाचा विषय काढला असं देखील गोगावले म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असली तरी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीय. याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनाभवनात शाखाप्रमुखांची बैठक पार पडली... जवळपास तासभर ही बैठक चालली. बैठकीसाठी सुनील प्रभू, विनायक राऊत, अनिल परब उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं..
Maharashtra Breaking News Today: बीडमध्ये कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणारा अवघ्या 18 वर्षांचा तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शाहूनगर परिसरातून जुबेर जावेद सय्यद याला अटक झालीय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह त्याला अटक केलीय
Maharashtra Breaking News Today: पुण्यातील शनिवार वाडा परिसरात हेरिटेज ग्रस्त समितीच्यावतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आलं...शनिवार वाड्याच्या शंभर फुटापर्यंत बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी घंटा नाद आंदोलन करण्यात आलं...
अमरावतीच्या मेळघाटमधील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे घरावरील टीनपात्रे, सौरऊर्जा पॅनल उडालीत. मेडा प्रकल्पातील विद्युत स्थान देखील उन्मळून पडलेत..त्यामुळे मेळघाट मधील माखला गावात सर्वाधिक नुकसान झालंय.मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालीये.
महात्मा गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांची शिक्षा! काय आहे प्रकरण जाणून घ्या https://t.co/6ISNyM8Qgy #AshishLataRamgobin #MahatmaGandhi #fraudcase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
वैद्यकीय क्षेत्रात निष्काळजीपणाचा अतिरेक करणारी धक्कादायक घटना उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये घडलीये....अभिमान तायडे या व्यक्तीस डॉक्टरांनी तपासणी न करताच मृत घोषित करुन थेट डेथ सर्टिफिकेटही देऊन टाकलं...नातेवाईकांनी त्यांना घरी नेऊन अंत्यविधीची तयारी सुरु केली होती..मात्र तायडे यांच्या छातीची धडधड जाणवताच नातेवाईकांची धावपळ सुरु झाली..तातडीने त्यांना दुस-या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं..तिथे उपचार सुरु होताच ते शुद्धीवर आले..ही घटना समजताच शिवनेरी हॉस्पिटल आणि डॉक्टर आहुजा यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमानाचे आपत्कालीन लँडिंग
कमी इंधनामुळे यूके नौदलाच्या एफ-३५ लढाऊ विमानाचे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले
काल शनिवारी रात्र झाले आपत्कालीन लँडिंग
इंधन कमी होते त्यामुळे करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
Ahmedabad Plane Crash: 'जरा माणुसकी दाखवा,' हॉस्टेल रिकामं करण्यास लावल्यानंतर डॉक्टरला अश्रू अनावर, 'हे इतकं सोपं नाही, माझी मुलगी...'https://t.co/bqozP2405e#BJMedicalCollege #AhmedabadPlaneCrash #emotional #viralvideo #doctor
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात आजपासून टोकन दर्शनाची सोय सुरु करण्यात आलीये... हे टोकन दर्शन कसं घ्यायचं त्यासाठी काय करायचं याचा थेट मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी..
चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही असं रोहयो मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना सुनावलंय. जेव्हा चुकणार तेव्हा दोन पावलं मागं घेऊन माफी मागणार. मात्र चुकलो नाही तर कधीच झुकणार नाही असा पुष्पा स्टाईल बाणा, झी तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत भरत गोगावलेंनी दाखवला.
भरत गोगावलेंचे आरोप हे राजकीय आणि व्यक्तीदोषातून असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी केलीये... गोगावलेंनी माहिती घेऊन वक्तव्य करावीत अन्यथा त्यांचा हशा होईल असा टोला चव्हाणांनी लगावलाय.
केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील कुटुंब ठार, अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरडीनेही प्राण गमावलेhttps://t.co/LkbHT0jM5E
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
कल्याणमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना UBT आक्रमक झालीय.. शिवसेना UBT कार्यकर्त्यांकडून महावितरण कर्मचा-यांना मारहाण करण्यात आलीय.. स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-याचा मोबाईल फेकत कानशिलातही लगावली... कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरातील कैलास होम्स सोसायटीमध्ये ही घटना घडलीय..
24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 82.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माणगाव तालुक्यात सर्वाधिक 170 मिमी पाऊस बरसला आहे. तर म्हसळा इथे 145, श्रीवर्धन मध्ये 143 आणि सुधागड मध्ये 126 मिमी पाऊस झाला आहे.
"लवकरात लवकर 100 शवपेट्या बनवा!..." एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी अचानक कोणाला कॉल केला?https://t.co/ry4L6V9Ki5#AhmedabadPlaneCrash #coffins #vadodara #AirIndiaPlaneCrash
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
सुनील तटकरेंनी विधानसभेला पाडापाडीचं राजकारण केलं...रोहयोमंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप...महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा
शिवसेनेतल्या बंडाला रश्मी ठाकरेच कारणीभूत... सर्व राजकीय निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप... झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात भरत गोगावलेंचा थेट आरोप...
अमेरिकत मोठी दुर्घटना! खासदाराच्या घरात घुसून गोळीबार, महिला खासदार आणि पतीचा मृत्यू#Usa #minnesotashooting #worldnewshttps://t.co/ca9GiBfQl6
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
कोकणात मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळतंय रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. काल या दोन्ही जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं... रायगडच्या गारळ, गोरेगाव, नवघर परिसरात तुफान पाऊस झाला.. गोरेगावच्या मुकुंदनगर भागात घरांमध्ये पाणी शिरलं. तर तिकडे गुहागर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.. सावरपाटी भागातील घरांमध्ये पाणी शिरलं. कोकणात आजही रेड अलर्ट असल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात..
नाशिकच्या सुरगाणामधील मालगोंदा गावात पत्नीने पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केलीय. तसंच पतीची हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवला होता. या प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नीला अटक केली.
उजनी धरणाची वाटचाल ५०% पाणी साठ्या कडे
आज सकाळी उजनी धरणात ४४.३१ % पाणी साठा
पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने उजनीत येतोय १४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
पावसाचा जोर कायम राहिला तर येत्या काही दिवसात धरण १००% होण्याची शक्यता
आषाढी वारी काळात पंढरपूर आणि भीमा नदी काठी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता
प्रशासनाकडून याबाबत नियोजन करण्याची गरज
Exclusive: ठाकरे बंधू एकत्र येतील का? मंत्री भरत गोगावले म्हणतात, "आताच्या स्थितीमध्ये..."https://t.co/06w7AwW1sr#bharatgogavale #Maharashtra #politics #RajThackeray #uddhavthackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी केला इन्काउंटर
सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई
शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 असे या सराईत गुंडाचे नाव
शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत
काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपळ्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते
लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती
या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला
गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवस परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. साइप्रसमध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार.. त्यानंतर कॅनडा आणि क्रोएशियाला जाणार.
केंद्रीय राखीव पोलीस, निमलष्करी दलाचे जवान,हेलिकॉप्टर, श्वानपथक यावर्षी 38 दिवसांच्या अमरनाथ यात्रेसाठी सज्ज झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनऊ दौऱ्यावर .. डिफेन्स एक्सपो मैदानात एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार.. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसोबत कॉन्स्टेबल्सना नियुक्ती पत्र देणार..
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये भल्या पहाटेच मोठी दुर्घटना! भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, 5 जण ठार#Kedarnath #HelicopterCrash #chardhamhttps://t.co/PQIAi46I1h
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 15, 2025
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला. यात अनेक प्रवाशांनी जीव गमावले तर काही प्रवासी जखमी झाले. परंतु, घटना नेमकी कशी घडली, हे कोडे रेल्वेला सुटत नसल्याने आता प्रशासनाने घटनेबद्दल नागरिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी नंबर तसेच इ-मेल जारी केला आहे.
-- रायगडच्या माणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
-- रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी
-- गारळ, गोरेगाव, नवघर परिसरात तुफान पाऊस
-- जनजीवन विस्कळीत, अनेक घरात पाणी शिरले
-- गोरेगावमधील मुकुंदनगर भागात रहिवाशांच्या घरात पाणी
-- गुहागर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
-- सावरपाटी भागातील घरांमध्ये पाणी शिरलं
-- नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना
-- गुहागरच्या पालशेत भागात ढगफुटीसदृश्य पाऊस
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी... विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय... मध्य रेल्वेवरील CSMT ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय.. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावरही 5 तासांची मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत..
अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यात लवकरच शुभारंभ होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळावरील टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह विविध स्वरूपाच्या २२५ अडथळ्यांची नोटोम अर्थात 'नोटीस टू एअर मन' यादी डीजीसीएच्या सूचनेनुसार जाहीर झाली होती. ही अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको, नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. प्राणी कत्तलीची तक्रार नॅट कनेक्ट फांउडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने आजच्या साठी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अलिबागसह महाड , पोलादपूर, माणगाव , भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळ पासून सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिप रिप सुरू आहे.
महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत करण्याचे मिशन आहे, असे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार म्हणाले.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. त्यानुसार, उपनगरी लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये केंद्रित तिकीट तपासणी मोहीम सोमवारपासून राबविण्यात येणार आहे. प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने मध्य रेल्वेकडे येत आहेत. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आता रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या समवेत गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात करण्यात येणार आहे. हे पथके प्रत्येक ट्रेनच्या प्रवासात सर्व डब्यांची तपासणी करेल.
तब्बल २५२ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी हवा असलेल्या आरोपीला सीबीआयने इंटरपोलच्या मदतीने यशस्वीरीत्या अटक केली आहे. यूएई येथून शुक्रवारी त्याचे प्रत्यार्पण करत त्याला मुंबईत आणण्यात आले. ताहेर सलीम डोला, असे या आरोपीचे नाव आहे. ताहेर डोला हा युएईमध्ये वास्तव्यास होता. मात्र, तेथून तो सांगली येथे अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालवत होता. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांतदेखील गुन्हे दाखल आहेत.
राज्य शासनाने इयत्ता पहिलीसाठी लागू केलेला नवीन अभ्यासक्रम पूर्णतः गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यावर आधारित आहे. या अभ्यासक्रमात भाषा, गणित, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि कला या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांना हसत-खेळत शिकता येणार आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते मुंबई या विमानात केबिन कर्मचारी असलेल्या एका कर्मचाऱ्याला सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. या कर्मचाऱ्याकडून एक हजार ३७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले असून, या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी ४१ लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती 'डीआरआय'कडून देण्यात आली.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.