Maharashtra Breaking News Today LIVE: दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ब्लॉगमधून संक्षिप्त स्वरुपात घेऊ शकता.
संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाची कमान कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाची दखल घेत याची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
आयुर्वेदिक UG नंतर होणारी NEXT (National Exist Test Exam) परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019 साली पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. 2019 ऐवजी 2022 नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी NEXT परीक्षा लागू राहणारअसून सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयाचा निर्णय झाला आहे.
राष्ट्रवादी SP चा खासदार निलेश लंके बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. मागील चार दिवसांपासून बच्चू कडू हे शेतकरी, अपंग आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. तर इतर ५ जन गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्वाती खैरनाथ, ३५ , रेखा गायकवाड वय ३८ असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत.
मुंबईत दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अतिधोकादायक ठिकाणालगत एसआरए, म्हाडा यांचे प्रकल्प सुरू आहेत अशा प्रकल्पांमध्ये अतिधोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना सामावून घेण्याबाबत धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातील याचिकांवर आज सुनावनी झाली. विशेष खंडपीठाकडून सुनावनीची तारीख 18 जुलै अर्धादिवस आणि 19 जुलै पूर्ण दिवस निश्चित करण्यात आली आहे. न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे आणि न्या. निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ या सुनावनीसाठी स्थापन करण्यात आली. पुढील सुनावनी 18 जुलै रोजी होणार आहे.
फेसबुकवरून ओळख झालेल्या 29 वर्षीय बांगलादेशी युवतीसोबत नाशिकमधील युवकाने धर्मांतर करत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचे उघडकीस आले आहे. ती बांगलादेशहून लपून-छपून भारतात यायची. ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईत लिव्ह इन आणि लग्नानंतर नाशिकमध्ये तीन वर्षांपासून राहत आहेत. पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली.
14 जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक त्यांना शुभेच्छा द्यायला शिवतिर्थावर येतात. मनसे अध्यक्षदेखील प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. पण यंदा हे मनसैनिक राज ठाकरेंना शिवतीर्थआवर भेटू शकणार नाहीत. राज ठाकरेंनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना तसं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून म्हटले की, 'कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मी वाढदिवस साजरा करणार नाहीय का? काही विशेष कारण आहे का? तर असं कोणतचं कारण नाहीये. याचे कोणतेही अर्थ काढू नका', असे आवाहनही त्यांनी केलंय.
मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या फलंदाजाकडे सोपवलं नेतृत्व#MumbaiIndians #MarathiNews #T20Crickethttps://t.co/J6obMyVcPR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
मुंबईत सुप्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांच्या चित्रांचा हॅमिल्टन हाऊस येथे उद्या लिलाव करण्यात येणार आहे. बजरंग दलाकडून हुसेन यांच्या चित्रांच्या लिलावास कडाडून विरोध केला असून हा लिलाव रद्द केला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहित बजरंग दलाने हा इशारा दिला असून हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रांना बजरंग दलाचा विरोध दर्शवण्यात आलेला आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई - गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
Raja Raghuvanshi Murder: 'मी राजा रघुवंशीसोबत लग्न करेन, पण...,' सोनमने आईला दिली होती धमकी, 'मी तडजोड करण्याचे परिणाम...'https://t.co/tat4MRfnnQ#rajaraghuvanshi #RajaRaghuvanshiCase #SonamRaghuvanshi #SonamRaghuvanshiArrested #MeghalayaTragedy #MeghalayaHoneymoonCase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
'माझ्या बहिणीला फासावर लटकवणार, तिला..,' राजा रघुवंशीच्या आईला भेटला सोनमचा भाऊ; म्हणाला 'ती राखी बांधून...'https://t.co/FDS4uktRBR#rajaraghuvanshi #RajaRaghuvanshiCase #SonamRaghuvanshi #SonamRaghuvanshiArrested #MeghalayaTragedy #MeghalayaHoneymoonCase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
'होय मी राजाच्या हत्येच्या कटात सहभागी होती,' पुरावे पाहिल्यानंतर रडू लागली सोनम; SIT समोर दिली सर्व गुन्ह्यांची कबुलीhttps://t.co/hBkzq2xPlp#rajaraghuvanshi #RajaRaghuvanshiCase #SonamRaghuvanshi #SonamRaghuvanshiArrested #MeghalayaTragedy #MeghalayaHoneymoonCase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक पार पडली. या बैठकीत नियोजीत शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते. राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी मंत्री नितेश राणे आग्रही होते. या शिवसृष्टीला अंदाजे ८३.४५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत असून आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला आता मान्यता देण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून बच्चू कडू हे शेतकरी, अपंग आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. बच्चू कडूंनी मागण्यापुर्ण व्हाव्यात म्हणून उपोषणाचे हत्यार उगारला असून आज आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंची हेत घेतली.
इम्तियाज जलील संजय शिरसाठ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार असून यासाठी ते बुधवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुनील रत्नपारखे यांच्यासह 4 ते 5 आंदोलन पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं आहे. जालना छत्रपती संभाजी नगर सीमेवर शेकटा शिवारात जालन्याच्या कदिम पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे छत्रपती फाऊंडेशनचे सुनील रत्नपारखे यांनी जलील यांच्या घरावर शेण फेक करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. इम्तियाज जलील यांनी शहानिशा न करता संजय शिरसाठ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असल्याच या आंदोलकांनी निवेदनात म्हटलेलं आहे.
बच्चू कडू यांनी मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. शेतकरी, दिव्यांग, कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी ते उपोषण करत आहेत. आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीनं मंत्रालयाबाहेर गार्डन गेटवर आंदोलन करण्यात आलं. यात आंदोलनात अनेक अपंगांचा समावेश होता.
सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे,या तिघांना अटक देखील केली आहे. ऋतुजा सुकुमार राजगे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे.
बच्चू कडू यांचं मागील चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु असून आज त्यांची पत्नी नैना कडू या उपोषण स्थळी दाखल झाल्या. त्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणा बद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी पत्नी नयना यांना अश्रू अनावर झाले.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय समिती गठित केली असून तीन सदस्यीय समिती घेणार बच्चू कडू यांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहे. हे पथक दिवसातून दोन वेळा बच्चू कडू यांची तपासणी करणार आहे. प्रकृती खालावत असली तरी बच्चू कडू आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झालेत. आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली. यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले. मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नाही. ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि वर बापाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचे समोर आले. लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले. परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली, या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरती दिवसा बिबट्याचा वावर कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गणपतीपुळे प्रवास करताना वाहन चालकाने हा व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आहे. दरम्यान या बिबट्याचा अद्याप कोणताही त्रास नागरिकांना झालेला नसला तरी त्याच्या बंदोबस्ताची मागणी मात्र केली जातेय.
-अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन पेटलं
-जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर पेटवून आंदोलन
-आंदोलनाची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते आक्रमक
-बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस
-जिल्हाधिकारी कार्यालयामोर प्रहारचा चक्काजाम
-बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान किल्ल्याच्या संरक्षक भिंतीसह तटबंदीचा काही भाग ढासळला... त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली...मात्र प्रशासनाने अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय...
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल रात्री उशिरा वर्षा ह्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती.
सदिच्छा भेट असल्याची माहिती.
येत्या 19 जूनला शिवसेना UBTचा 59वा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडेल.. आगामी महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडं लक्ष लागलंय. तसंच राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याचीही उत्सुकता आहे.. मुंबई मनपा निवडणूक शिवसेना UBT महाविकास आघाडी म्हणून लढणार की नव्या पक्षासह युती करणार की स्वबळाचा नारा देणार हेही या सोहळ्याच्या दिवशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे..
शुभांशु शुक्लावर 548 कोटींचा खर्च! भारताने पहिल्या अंतराळवीरासाठी किती खर्च केला होता? किंमत ऐकून व्हाल आश्यर्यचकितhttps://t.co/T3udV18Nn8#shubhashushukla #Axiom4 #rakeshsharma #ASTRO
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू उपोषणाला बसलेत. मागण्या 13 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास गोळ्या, औषधं घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिलाय. आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर तसंच रोहित पवार भेट देणारेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही कडूंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय.
- गणेशोत्सवाच्या दृष्टीने मोठी बातमी
- पीओपी मुर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आणणार नवे धोरण
- या आठवड्यात मुर्ती विसर्जनासाठी शासनाकडून नवे धोरण आणण्याची शक्यता
- लालबागचा राजा, मुंबईचा राजा व इतर मंडळांना धोरणात दिलासा देणार
- गणेशोत्सव मंडळांना नियमांनुसार पीओपी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा मार्ग मोकळा
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचे स्पेस मिशन लांबणीवर; 'ती' चूक महागात पडली असती, पण...https://t.co/bFeKNuAeY9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 11, 2025
वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केलाय. यात एक महिला आणि एक पुरुष जखमी झालेत.. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये ही घटना घडली. माहूर मधील हनुमान मंदिराजवळील वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. महिलांनी अगरबत्ती आणि धूप झाडाखाली लावले होते. वडाच्या झाडाच्या शेजारी असलेल्या झाडावरचे मधमाश्यांचे मोहोळ अगरबत्ती आणि धूपच्या धुरामुळे उठले. त्यांनी महिलांवर हल्ला चढवला. मधमाश्यांच्या हल्यामुळे महिलांची धावपळ उडाली. यात 65 वर्षीय चंदा पांडे आणि तिथून जाणारे 45 वर्षीय विलास पवार जखमी झाले. दोघांवर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात चर्चा रंगली जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची....जयंत पवारांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली. शरद पवारांनी जयंतरावांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळलाय.
पुरोगामी, प्रगत कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार घडलाय..रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडलाय...या अघोरी प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडालीये... याप्रकरणी अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही. पण या निमित्ताने पंचगंगा काठी जादूटोणाचे प्रकार सुरु असल्याचं ठळकपणे समोर आलंय..
पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर भारत पाकिस्तानात घुसून हल्ला करेल, असा गंभीर इशारा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलाय. पहलगाम हल्ल्यासारख्या घटना घडल्या तर दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटलंय. पाकिस्तान हजारो अतिरेक्यांना खुलेआम प्रशिक्षण देतंय आणि त्यांना भारतात पाठवतंय. आम्ही हे सहन करणार नाही असंही युरोप दौऱ्यावर आलेल्या जयशंकर यांनी म्हटलंय. एप्रिलमध्ये केलेल्या कारवाया पुढे सुरूच ठेवल्यास तुम्हाला प्रत्युत्तराला तोंड देण्यासाठी तयार राहावं लागेल. ही कारवाई अतिरेकी संघटना आणि म्होरक्यांच्या विरोधात होईल.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड जिशान अख्तरला कॅनडात अटक करण्यात आलीय.. पाकिस्तानी डॉन शहजादच्या मदतीनं जिशान कॅनडात पोहोचला होता अशी माहिती मिळतेय.. जिशानला लवकरच भारतात आणण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती मिळतेय..
गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणूकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका लागल्पाचा अंदाज आहे. तत्पूर्वी लोकसंख्येनुसार मुंबई महानगर पालिकेत प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. राज्यातील ९ महानगर पातिकांच्या निवडणूका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिकनिकसाठी राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये आलेल्या ११ तरुणांसोबत भयावह घटना घडली आहे. बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले हे ११ जण वाहून गेले आहेत. यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
इंदूरच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. राजा रघुवंशीच्या हत्येबाबत चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. चौकशीत आरोपींनी सोनमच्या समोरच राजावर वार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच हत्या केल्पावर राजाचा मृतदेह दरीत फेकल्याचे सांगितले आहे.
सोनम रघुवंशीच मुख्य सुत्रधार असल्याचे या आरोपींनी चौकशीत कबुल केल्याचे क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी सांगितले आहे.
तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील २९ महानगर पालिका नगर परिषदेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी जारी केले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग रचनेचे गुगल मॅपचा आधार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर विकास विभागाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने पुढील तीन ते चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
नगर विकास विभागाच्या आदेशानुसार मुंबईत २२७ प्रभागात प्रभाग रचना करण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. तर ठाणे, नाशिकसह अ, ब, क वर्ग महापालिकांत चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांनुसार तर ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
इंदोरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. मेघालय पोलिसांना दरीत 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच (3 जूनला) यामध्ये सोनम रघुवंशीचा हात असल्याचं समजलं होतं. मेघालय पोलिसांनी हत्येत सहभागी सर्वांना 'ऑपरेशन हनीमून' असं नाव दिलेल्या कारवाई अंतर्गत अटक केल्याचं सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा उलगडा करणाऱ्या पथकात 20 कोअर सदस्य सामील होते. तसंच 120 पोलीस कर्मचारी या ऑपरेशनचा भाग होते.
कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुशील हगवणे याला पहिल्याच दिवशी जामीन मंजूर झाला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली होती. वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि नणंदेचा मित्र निलेश चव्हाण यांचा ताबा आज वारजे पोलिसांनी घेतला, उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.