Maharashtra Breaking News Today LIVE : दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ब्लॉगमधून संक्षिप्त स्वरुपात
भर पावसात मुंबई नाशिक महामार्गावरील कशेळी पुलावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणारय. मुंबई नाशिक मार्गावरील रस्त्याच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणारय. आज रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाशिककडे जाणारी मार्गिका बंद राहणारय. यादरम्यान नाशिक-मुंबई मार्गिकेवरून आळी पाळीने वाहने सोडण्यात येणार आहेत.
भाजपमध्ये जाण्याअगोदर नारायण राणे शिवसेनेत येणार होते पण... भरत गोगावलेंचा महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात धक्कादायक दावाhttps://t.co/kgb5CZwsLG
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
गुजरातमधील राजकोटमध्ये बाजारपेठा अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या. अहमदाबादमधील विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विजय रुपाणी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत.
दुर्घटनाग्रस्त विमानात भगवद्गीता सापडलीये. ही भगवद्गीता मैथिली पाटीलची असल्याचा दावा करण्यात येतोय.. मैथिली श्री कृष्णाची खूप मोठी भक्त होती इस्कॉन च्या पुजारीकडून तुळशीची माळ मैथिलीला देण्यात आलेली होती जे ती नेहमी फ्लाईट मध्ये सोबत घेऊन जायची..विमान दुर्घटनेच्या घटनास्थळी सापडलेली भगवद गीता तसेच श्री कृष्णाची मूर्ती ही मैथिलीची असू शकते असा अंदाज देखील वर्तविण्यात येतोय..
Exclusive: शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत, मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा!#BharatGogavale @kamleshsutar https://t.co/kxoTTlGzcF pic.twitter.com/YPvQ6016zH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. समितीला चौकशीसाठी तीन महिन्यांचा वेळ दिला जाणार असल्याची माहिती हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिलीय. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास यंत्रणांकडून वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यातच प्रचारसभेदरम्यान अजित पवारांनी मोठी घोषणा केलीये. माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार, असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपल्यात कारखान्याचं भलं करण्याची धमक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू तर तीन जखमी झाले आहेत. यामध्ये सिल्लोडच्या सारोळा गावात दोन सख्ख्या भावांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्स येथे केमिकलच्या गोदामाला भीषण आग. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी लाखोंचे नुकसान.अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल.
इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर विकेटने विजय मिळवला असून प्रथमच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. यासोबतच साऊथ आफ्रिकेने त्यांचा 27 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील 27 वर्षांमध्ये साऊथ आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना यश आलं.
उपोषण मागे घेतल्यावर बच्चू कडू यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्यासह 23 आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दहा कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्याची असल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. गेल्या सात दिवसात बच्चू कडू यांच्या वजनात सात किलोने घट झाली आहे. बच्चू कडू यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असून रक्तांच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटोन्स आढळल्याची डॉक्टरांची माहिती आहे. पुढील 24 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर प्रफुल कडू यांनी माहिती दिली.
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तलवली पोलिस चौकी कल्याण फाटा ते भोईरपाडा बीजीआर गोडाऊन पर्यंत एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत असून गेल्या दीड दोन तासापासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
झेडपी गट आणि पंचायत समितीचे गण निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनांना ग्रामविकास खात्याकडून लेखी निर्देश जारी करण्यात आले आहेत. 33 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणुका लागणार असून १८ ऑगस्ट पर्यंत गट-गण रचना जाहीर करण्याचे दिले निर्देश देण्यात आले आहेत. 14 जून पासून गट-गण निर्मितीसाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे.
फायनलमधला सूर्याचा कॅच आठवतोय? आता फील्डर्स करू शकणार नाहीत असे कारनामे, ICC ने बदलला नियम#Marathinews #Cricket #ICC #ICCNewRuleshttps://t.co/NkW44PA2JU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे व अमरावती असे 5 प्रादेशिक विभाग करण्यात आले असून, प्रत्येक प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत विभाग आणि मुख्यालय निश्चित करण्यात आले आहेत. कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी करण्यात आलेली आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवले जाणार आहे.
बच्चू कडू यांची मोठी घोषणा. उदय सामंत यांच्या मध्यस्तीला यश.
'विमानातील 70 टक्के प्रवाशी सीटबेल्टमध्येच', प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'दोन जण जिवंत होते पण...'#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/tfzcscaexK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
'विमानातील 70 टक्के प्रवाशी सीटबेल्टमध्येच', प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'दोन जण जिवंत होते पण...'#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/tfzcscaexK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
'विमानातील 70 टक्के प्रवाशी सीटबेल्टमध्येच', प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'दोन जण जिवंत होते पण...'#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/tfzcscaexK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
'विमानातील 70 टक्के प्रवाशी सीटबेल्टमध्येच', प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'दोन जण जिवंत होते पण...'#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/tfzcscaexK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
'विमानातील 70 टक्के प्रवाशी सीटबेल्टमध्येच', प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'दोन जण जिवंत होते पण...'#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/tfzcscaexK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण होतील. दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका.मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी बच्चू कडू यांच्या भेटीला आलो आहे. 15 दिवसांमध्ये कर्जमाफीसाठी समिती तयार करू असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
माथेरान मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून दस्तुरी पासून चांगभल मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. विकेंडसाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी जमली आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल, प्रवासी संतापले.
उद्यापासून विठ्ठल-रुक्मिणी पद स्पर्श दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणालीची सुरुवात होणार आहे. त्यासाठी आजपासूनच दर्शन वेळ आरक्षित करता येणार आहेत. मंदिर समितीच्या टोकन दर्शन प्रणालीमार्फत पहिल्या दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत. त्याचे बुकींग भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आजपासून उपलब्ध असणार आहे.
सलग दुस-या दिवशी इस्रायलनं इराणवर तुफान हल्ले केलेत. इस्रायलकडून इराणच्या आण्विक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यात 78 जणांचा मृत्यू तर साडेतीनशेहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
जालन्यातील बस स्थानक परीसरात मोबाईल,पैसे चोरताना प्रतिकार केल्याने तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये. बस स्थानक परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका चोरट्याला अटक केलीये. आबासाहेब घोडके असं आरोपीचं नाव आहे. तर रामेश्वर पवार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
'...त्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज'; 24 तासात राज्यात कोरोनामुळे चौघे दगावल्यानंतर अजित पवारांचं विधानhttps://t.co/DryXNn5xK6 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#maharashtra #COVID_19 #Corona #ajitpawar #maharashtranews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
बच्चू कडू यांना तत्काळ अतिदक्षता विभागात भरती करण्याचे पत्र तिवसाच्या तहसीलदारांनी दिलं आहे. कडू यांची प्रकृती फार खालावल्याने तहसीलदारांनी हे पत्र दिले आहे. बच्चू कडू सातव्या दिवशीही आपल्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत.
BCCI ला ICC कडून मोठा झटका! भारत पुढील 6 वर्षे WTC फायनलचे आयोजन करू शकणार नाही? जाणून घ्या मोठे कारण https://t.co/69OoVxyN0A#BCCI #ICC #WtcFinal2025
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
सुट्टीसाठी पाहुण्याकडे आलेल्या मुलाचा पुण्यातील पानशेत धरणाच्या सांडव्यात आंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोहमलाल लखमाराम रायिका असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सोहमलाल हा पानशेत येथे मिठाईचे दुकान असलेल्या रामेश्वर यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी सुट्टीसाठी आला होता. शुक्रवारी सकाळी तो मित्रां समवेत आंघोळीसाठी पानशेत -वरसगाव रस्त्या लगतच्या पानशेत धरणाच्या सांडव्यावर गेला होता, तेव्हा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेक्सु पथकासह घटनास्थळी धाव घेत दुपारी खोल पाण्यातून सोहमलाल याचा मृतदेह बाहेर काढला आहे.
यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा 'गणेश मुहूर्त' पूजन शनीवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला. सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वर्ष ९२ वे
गणेश मुहूर्त पूजन
यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे… pic.twitter.com/AlDthuo5p9
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) June 14, 2025
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. काल बावनकुळे यांच्याशी झालेली चर्चा अयशस्वी ठरली. आज दुपारी दोन वाजता कडू पुढील निर्णय घेणार. बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे आंदोलनाला भेट देणार. आज कोणतेही आंदोलन न करण्याचे कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Vande Bharat News: महाराष्ट्रातील 'या' 2 जिल्ह्यांनाही जोडणार वंदे भारत! थेट मुंबई ये-जा शक्यhttps://t.co/N5ycSM0yi3 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#indianrailway #railway #mumbai #csmt #jalna #VandeBharatExpress #VandeBharat #nanded
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2025
राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे.राज्यामध्ये शुक्रवारी करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱया विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. तसंच, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसंच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संमतीने महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या या आदेशानुसार, शनिवार संध्याकाळी 4 वाजेपासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे. फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बच्चू कडुंचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारचा आणखी एक प्रयत्न असणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. उदय सामंत उपोषणस्थळी जाऊन कडू यांची समजूत काढणार आहेत.
Heavy Rain Alert : राज्यात शनिवार 14 जून 2025 रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून शनिवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.