Maharashtra Breaking News Today 17 June Live Updates : तुळजाभवानी शिल्प वादावरून 17 जून रोजी महत्त्वाची बैठक. वरळीत दोन्ही शिवसेनेच्या बैठका. वर्धापन दिनाच्या पूर्व तयारीसाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरळीतील NSCI डोममध्ये बैठक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा वरळी येथील लाला लजपतराय महाविद्यालयात होणार. याशिवाय राज्यात आणि देशात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी लक्ष वेधणार? जाणून घ्या...
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मुंबईत बैठक संपन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली
गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ दृष्टिक्षेपात आल्याची आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
शहराशी एकरूप झालेली गाव हद्दवाढी मध्ये घ्यावीत अशा पद्धतीचे पत्र मी महापालिका आयुक्तांना देणार - आमदार राजेश क्षीरसागर
या पत्रानुसार महापालिका आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करून संबंधित ग्रामपंचायतींना सदरची नोटीस काढतील
त्यानुसार संबंधित गावांची भूमिका आल्यावरच हा प्रस्ताव शासनाला सादर होईल त्यानंतर शासन निर्णय घेईल
आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून पालखीसह वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनाम संकीर्तन व अभंग गायन करत आज अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला.यावेळी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व दर्शन घेतले. यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी वारकऱ्यांसोबत पायी दिंडीत सहभागी झाले.
टाळ मृदुंग, अभंग व हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला होता.
पारेगाव येथे पालखी मुक्कामास असून या ठिकाणी वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टर वर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्यातुलनेत यंदा केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
खरीप हंगामातील पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
अहिल्या नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे श्री. रस्तोगी यांनी सांगितले.
राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी धरणात ५१५ मीटर पर्यंत पाणी साठा करण्यात येईल असे सांगितल्याची माहिती श्री. कपूर यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीपुर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
पिंपरी चिंचवड - अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित गव्हाणे यांच्यासह माजी 37 नगरसेवकांचा पक्ष प्रवेश
शरद पवार गट आणि भाजपलाही अजित पवार यांचा धक्का
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत जोरदार इनकामिंग
.
* आजाराचा कालावधी: अनेक रुग्णांना हा आजार गेल्या १२ महिने ते ५ वर्षांपासून आहे.
* सध्याचे उपचार: मागील १-२ वर्षांपासून हे रुग्ण बुलढाणा आणि अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडून उपचार घेत आहेत.
डॉक्टरांचे स्पष्टीकरण
* संसर्गजन्य नाही: हा आजार संसर्गजन्य नाही.
* पाण्याशी संबंध नाही: या आजाराचा पाण्याशी काहीही संबंध नाही.
* कारणे: विविध प्रतिजन (ऍन्टिजेन) किंवा हानिकारक पदार्थांच्या संपर्कातून उद्भवणाऱ्या स्वयंप्रतिकार (ऑटोइम्युन) पद्धतीमुळे हा आजार होऊ शकतो.
आरोग्य विभागाचे आवाहन
* काळजी घेण्याचे आवाहन: आरोग्य विभागाने सर्व रुग्णांना योग्य ती काळजी घेण्यास सांगितले आहे.
* अधिक माहिती: जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा डॉ. अमोल गीते यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील कुटुंबीय करणार भाजपत प्रवेश
काँग्रेस नेत्या जयश्री पाटील उद्या करणार भाजपात प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात तरुण भारतीय क्रिकेटरने गमावला जीवhttps://t.co/3NGgORBI5u#AhmedabadPlaneCrash #ahmedabadtragedy #Cricketer #DirdhPatel
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
उद्या दुपारी १२ वाजता मातोश्री येथे होणार माजी नगरसेवकांची बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार बैठक
जवळपास ६ ते ७ महिन्यानंतर माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तोंडावर असताना अनेक नगरसेवक साथ सोडत आहेत
या माजी नगरसेवकांची बैठक घेत उद्धव ठाकरे अडचणी जाणून घेतील तसेच स्थानिक पातळीवरील आढावा घेतील
अजित पवारांसोबत युती करण्यासंदर्भात शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले 'सगळ्यांना बरोबर घ्यायचा...'.https://t.co/vwxlRxJvN8#AjitPawar #SharadPawar #NCP #Maharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
दाऊद इब्राहिमला भाजपमधे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला कोणाला घ्यायचं हा त्यांचा प्रश्न असून, शिवसेनेत कोणाला घ्यायचे तो आमचा प्रश्न आहे. सध्या ठिकठिकाणी पक्षप्रवेश सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज पक्षप्रेवश! सुधाकर बडगुजर चार हजार कार्यकर्ते घेऊन नाशिकहून मुंबईत आले आणि... https://t.co/McTUN8tZMy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
-नागपूरमधील फार्मा कंपनीत स्फोट
-स्फोटात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी
-अंकित पल्स कंपनीत भीषण स्फोट
-जखमींवर कामठीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
-जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
-अंकित पल्स या कंपनीत सकाळी 11वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे
Maharashtra Breaking News: एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान रद्द करण्यात आलंय. तांत्रिक बिघाड आढळल्याने एअर इंडियाच्या AI159 विमानाचं उड्डाण रद्द केल्य़ाची माहितीय...त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतेय. त्यात एअर इंडियाकडून कोणतिही ठोस माहिती मिळत नसल्यानं प्रवसी संताप व्यक्त करतायत
Maharashtra Breaking News: कुंडमळा पुलाच्या निधीवरून संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय... बजेटमध्ये प्रत्येक कामासाठी निधीची तरतूद हजारांमध्ये होत असते... 80 हजार गुणिले एक हजार असा त्याचा अर्थ असल्याचं स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण यांनी दिलंय...
--मोसाद ही इस्त्रायलची गुप्तचर संस्था
--इराण हल्ल्यात मोसादची महत्त्वाची भूमिका
--मोसाद मुख्यालयावर हल्ला, इस्त्रायलला मोठा धक्का
विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे कॉल आल्यानंतर नागपुरात विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली असून तपासणी सुरू आहे.
कोच्चीवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची नागपुरात लँडिंग करण्यात आलं आहे.
पोलिस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे.
20 मिनिटांपूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरलं आहे.
अजूनपर्यंत काहीही धोकादायक वस्तू आढळलेली नाही.
'85 व्या वर्षी कशाला निवडणूक लढायची? आता पायजमा...'; अजित पवारांचा BJP नेत्याला टोलाhttps://t.co/nAexXmrpbQ < येथे वाचा सविस्तर वृत्त...#malegaon #baramati #election #ajitpawar #chandraraotaware #maharashtra #maharashtraNews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
आजची सुनावणी पुढे ढकलली
पुढील सुनावणी 24 जून रोजी होणार
विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलली
बीड येथील विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार होती सुनावणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडत आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाकडून वरळी परिसरामध्ये जोरदार बॅनर्जी.. बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला डीवचण्याचा प्रयत्न.. भगवा बाळासाहेबांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा शिवसैनिकांचा असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाला घेरण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.
नाशिकमध्ये शिवसेना UBTला मोठं खिंडार पडलंय. सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासह 15 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. चारशे चारचाकी वाहनं, 100 बसेस आणि 4 हजार कार्यकर्त्यांसोबत बडगुजर मोठं शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना झालेत.. आज दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडेल. नाशिकमधील स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बडगुजर यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना UBTमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
आता लातूरकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी... लातूरात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय... हा आजार माणसामध्येही पसरू शकत असल्यानं पशुसंवर्धन विभागासह प्रशासन अलर्ट मोडवर आलंय... ग्लँडर्स झाल्याने आता एका घोड्याला दया मरण देण्यात आलं... आतापर्यंत घेतलेल्या जवळपास 40 घोड्यांच्या नमुन्यांमध्ये चार नमुने संशयास्पद आढळलेत...
Shocking: आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती! वर्ल्ड कपनंतर संपणार कारकिर्दhttps://t.co/k36UrF8wQV#retirement #womencricketer #NewZealand #sophiedevine
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
-- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी
-- बीडच्या विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
-- विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहण्याची शक्यता
-- वाल्मिक कराडच्या अर्जावर युक्तिवाद होणार
-- मकोकातून दोषमुक्त करण्याची कराडची मागणी
पहलगामहल्ल्यावर पाकिस्तानला दिलेल्या कठोर प्रत्युत्तरनंतर आजपासून जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन पूर्वपदावर .. जम्मू काश्मीरमधील पर्यटनस्थळं आजपासून पुन्हा खुली होतायत .. पर्यटकांनी जम्मू काश्मीर पुन्हा फुलणार
TNPL मध्ये वादळ! आर. अश्विनच्या संघावर चेंडू छेडछाडीचा गंभीर आरोप, तक्रार दाखलhttps://t.co/HZUyiaoo3H #TNPL #RAshwin #balltampering #DindigulDragons
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 17, 2025
मुंबई आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून पाऊस पडत असला तरी तलाव क्षेत्राकडे मात्र पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ ८.६ टक्के पाणीसाठा असून, भरपावसातही तलाव तहानलेले आहेत.
'यूपीआय'द्वारे होणारे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) सोमवारपासून व्यवहारांवरील प्रतिसाद वेळ 30 सेकंदांवरून कमी करून 10 सेकंद केला आहे. 16 जूनपासून व्यवहारांमध्ये यूपीआय लाभार्थ्याचा पत्ता तपासण्यासाठी लागणारा वेळ 15 सेकंदांवरून कमी करून केवळ 10 सेकंद करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची उद्या बीडच्या विशेष न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीला विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच या सुनावणीत काय निर्णय होईल याकडे राज्याचे लक्ष असणार आहे....
राज्यातील 23 लाख वाहनांवर हायसिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित वाहनावर एचएसआरपी बसविण्यासाठी दि. 30 जून ही अंतिम मुदत असल्याने ती वाहनांवर बसविण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी वाहनधारकांकडे आहे. अशात मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरतीसाठी 15 जुलैपासून ऑनलाइन परीक्षा होणार आहे. 21 जुलैपर्यंत ती चालणार आहे. नवी मुंबई महापालिकेने 368 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून 84 हजारपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ही भरतीप्रक्रिया पारदर्शीपणे व सुरळीत करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले जात आहेत. पालिकेच्या नोकरभरतीसाठी 15 ते 18 व 21 जुलैला ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, राज्यात 15 जूनपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस 20 जूनपर्यंत अनेक भागात कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरी- पुढील 24 तासांसाठी जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रातील नागरीकांना सर्तक राहाण्याच्या सुचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या असून NDRF, SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत
महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आदी 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.