Maharashtra Breaking News 18 June 2025 LIVE Updates: राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकारणात आहे. तर एकीकडे आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. राज्यातील या व इतर महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊयात या लाइव्हच्या माध्यमातून
डोंबिवलीतील हवाई सुंदरी रोशनी सोनघरे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडली असून या घटनेला आठवडा उलटला आहे. तब्बल सात दिवसांनी रोशनीचा मृतदेह मुंबईत दाखल झाला आहे. डीएनए चाचणीला विलंब झाल्याने मृतदेह आज मिळाला आहे. तब्बल सात दिवसांनी डीएनए चाचणी रिपोर्ट आला. आज दुपारी मृतदेह अहमदाबाद वरूनमुंबईसाठी निघाला होता आता मुंबईत मृतदेह पोहोचला असून उद्या सकाळी ९ वाजता अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती रोशनीच्या वडिलांनी दिली आहे
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या जीआरचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या जाहिर निषेध केला आहे. या निषेधाची माहिती माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला आहे. आज पुण्यात मसापचं यासंबंधी बैठक पार पडली त्यानंतर ही भूमिका मांडली गेली आहे. येत्या 8 दिवसात शासनाने हा जीआर रद्द केला नाहीतर आंदोलन करू असा इशारा मसापने दिला आहे.
शिवसेनेच्या मुंबईतील नव्या कार्यकारणीला अखेर पाच महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ तारखेपर्यंत शिवसेनेची नवी कार्यकारणी जाहीर होणार आहे. १९ जानेवारी रोजी मुंबईतील शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून शिवसेना मुंबईत कार्यकारणी विना होती. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवे विभागअध्यक्ष आणि शाखाप्रमुख जाहीर केले जाणार आहे. शिवसेनेत विभाग स्तरावर असणारे गटतटाचे वाद यामुळे कार्यकारणीची घोषणा तब्बल पाच महिने लांबीवर गेली होती
Sunetra Pawar : '...तर दादा सीएम होतील'; सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या 'पांडुरंग...'#sunetrapawar #maharashtra #AjitPawarhttps://t.co/mOJ6XvywVy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
अकलुजमधील सयाजी वॉटर पार्कमध्ये फिरत्या पाळण्याचा अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहा.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसुन आणि सांगलीतील काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असून पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांतदादा पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते प्रवेशाला उपस्थित राहणार आहेत.
हिंदी भाषा सक्तीबाबत राज ठाकरे किंवा काँग्रेस हे गैरसमज पसरवतील पण... भाजपने समजावून सांगितला नेमका अर्थhttps://t.co/R6uG7L9Wav
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
FASTag बाबत गडकरींची ऐतिहासिक घोषणा; वाहनचालकांना फक्त 'इतक्या' रुपयात वर्षभराचा पास,ऐकून व्हाल खूष! #FASTag #NitinGadakarihttps://t.co/rSiAN8pp95
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
'तुझे तसले फोटो व्हायरल करेन', धमकी देत, मारहारण करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संतापजनक घटना! #MinorGirlRapehttps://t.co/syEmPBA42f
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
'...तर मराठी मुलांनाही शाळेत शिकावं लागणार गुजराती?', नवीन GR मधील 'ती' अट काय?#Marathihttps://t.co/CQBleiC2tt
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
अकलूज येथील सयाजी राजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्याचा अपघात झाला आहे. वेगात पाळणा फिरत असताना पाळणा निसटून पडल्याने चार जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून भिगवण येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
मागील दहा दिवसात चांदीच्या दरात 15000 रुपयांनी वाढ तर सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोने एक लाख एक हजार आठशे रुपये प्रति तोळे जीएसटी सह तर चांदी एक लाख 13 हजार 300 रुपये प्रति किलो आहे. सुवर्ण बाजाराच्या इतिहासात चांदीचे आतापर्यंतचे सर्वात उच्चांक दर गाठला आहे. गेल्या 24 तासात चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्या चांदीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढल्याने दर वाढल्याची सुवर्ण व्यावसायिकांनी माहिती दिली आहे. अचानक सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.
प्रत्येक मंत्र्यांला विभागानुसार ५ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळाली आहे. तसेच निवडणुका जाहिर होण्याची वाट न पाहता मंत्र्यांनी जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये कामाला लागण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.
मंत्री शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरची जबाबदारी सोपवली आहे. तर मुंबई, नवीमुंबई, पनवेल रायगड रत्नागिरी- सिंधूदुर्गची जबाबदारी मंत्री उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्याकडे सोपवली आहे. तर मराठवाडा मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर सोपवली आहे. तर विदर्भाची जबाबदारी मंत्री संजय राठोड आणि आशिष जैयस्वाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खानदेशाची मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यावर असून मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पालघर, मिराभाईदर आणि मुंबई उपनगरची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वेबसाईटवरून शिव भवानी शिल्पाचे संकल्प चित्र हटवले. परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत बैठक घेऊन संकल्पचित्र हटवण्याचे आदेश दिले होते. आदेशाची अंमलबजावणी करत मंदिर संस्थाने तात्काळ मंदिर संस्थांच्या वेबसाईटवरून ते संकल्पचित्र हटवले आहे. आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच तुळजापुरात भव्य शिल्प उभारणार आहे. हे शिल्प 108 फूट उंच उभारणार आहेत. या शिल्पाच्या संकल्पचित्रात तुळजाभवानीला अष्टभुजेत दाखवण्यात आले होते. लवकरच सुधारित संकल्पचित्र तयार केलं जाईल, अशी माहिती मंदिर संस्थांनीने दिली आहे.
मनसे सोबत युती करायची का नाही? उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना विचारणा केली आहे. यावेळी युती केली तर फायदाच होईल असं मत नगरसेवकांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची माजी नगरसेवकांनी माहिती दिली आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला पालिकेसाठी ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुम्ही सोबत राहिलात तुम्ही निष्ठावंत आहात येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवा खरच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलं. येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला अंदाज
तुकोबांचा शिळा मंदिरात फडणवीस यांनी दर्शन घेतले आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पादुका पूजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे दाखल होते.
राज ठाकरे किंवा काँग्रेस हे गैरसमज पसरवतील. पण, नेमका निर्णय काय, ते समजून घ्या!
- राज्य सरकारने हिंदी अनिवार्य केलेली नाही.
- पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे. ती कुणालाच नाकारता येणार नाही. दुसरी भाषा ही इंग्रजी आहे. कारण, ती जागतिक भाषा आहे.
- तिसरी भाषा म्हणून पर्याय देण्यात आले आहेत, त्यात उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्रीय प्राकृत, हिंदी इत्यादी भाषा. विद्यार्थ्याला त्याच्या आवडीची भाषा निवडता येणार आहे.
- त्यात नियम फक्त एकच आहे की, भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असेल तर तेथे शिक्षक देण्यात येईल. तशी संख्या नसेल तर तेथे ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल. उदाहरणार्थ : एखाद्या शाळेत हिंदी भाषेचा पर्याय स्वीकारणारा एकच विद्यार्थी असेल तर त्याला ती भाषा ऑनलाईन माध्यमातून शिकविण्यात येईल आणि संस्कृत शिकणार्यांची संख्या 20 हून अधिक असेल, तर तेथे संस्कृतचा शिक्षक देण्यात येईल.
- यातून सहज लक्षात यावे की, हिंदी अनिवार्य केलेली नाही आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छीत असेल तरी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
जुन्या आणि आताच्या रचनेत फरक काय?
- पूर्वीच्या अभ्यासक्रमात पहिली ते पाचवी त्रिभाषा सूत्र नव्हते. मात्र, सहावीपासून त्रिभाषा सूत्र सक्तीचे होते. म्हणजे आधीही सहावीपासून तीन भाषा शिकाव्याच लागत होत्या.
- मात्र आता नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याने त्रिभाषा सूत्र सर्व राज्यांनी स्वीकारले आहे. हे नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) देशभरातील शिक्षणतज्ञांच्या शास्त्रीय अभ्यासानंतर स्वीकारण्यात आले आहे. त्रिभाषा सूत्रानुसार, पहिली मातृभाषा, दुसरी जागतिक भाषा आणि तिसरी कोणतीही भारतीय भाषा असेच सूत्र आहे.
मराठीचे महत्त्व कुणी जाणले
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात व्यावसायिक शिक्षण हे मातृभाषेतून आहे. म्हणजे आधी इंजिनिअरिंग, मेडिकल हे इंग्रजीतूनच शिकणे सक्तीचे होते. पण ते आता मराठीतून शिकता येणार आहे. हे काम नरेंद्र मोदी सरकारनेच केले.
- महाराष्ट्रात मराठीची सक्ती आधीच करण्यात आली आहे. पहिली ते बारावी पहिली भाषा ही मराठीच आणि ती सक्तीची आहे.
- वर्षानुवर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम कुणालाच जमले नाही, तेही नरेंद्र मोदी सरकारनेच केले.
- या विषयावर चर्चा करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीट समजावून घेतले, ते संपूर्णत: वाचले तरच गैरसमज दूर होणार आहेत
'...तर आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू', राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यपकांना इशारा, 'उद्या युपी, बिहारमध्ये...'https://t.co/atcEkQz7nV#MNS #RajThackeray #Hindi #Marathi #Maharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत,' राज ठाकरेंनी केला मोठा आरोप, 'केंद्र सरकारनेच त्यांना...'https://t.co/V5hhMN0NsI #MNS #RajThackeray #Hindi #Marathi #Maharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
'राज ठाकरेंना मी समजावलं होतं, पण...', 'त्या' बैठकीत नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी केला खुलासाhttps://t.co/3JD4O2701i#MNS #RajThackeray #Hindi #Marathi #Maharashtra #DevendraFadnavis
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जतन संवर्धनाची कामे संथ गतीने सुरू आहेत. ही कामे 24 जूनपूर्वी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिर समितीला दिले आहेत. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यामध्ये सेंट्रलाइज वातानुकूलित यंत्रणा बसवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर भातन बोगद्याजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यात पोलिसांच्या 10 ते 12 गाड्या धडकल्या असल्याचं समोर येतेय. ठाणे ,पालघर, मुंबई ,नवी मुंबई मधील बांगलादेशींना पुणे येथे घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे. तात्काळ त्यांना विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने जिवीतहानी नसली तरी पोलीस जखमी झाले आहेत.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नंतर मनसैनिक आक्रमक. हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचे पान जाळून पुस्तके फाडली. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आक्रमक. मनसेच्या खळखट्याक आंदोलनांना सुरवात
खडकवासला परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालीयं. खडकवासला प्रकल्पात आतापर्यंत जवळपास 20 टक्के पाणीसाठा जमा झालायं. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टीएमसीने अधिक पाणीसाठा उपलब्ध झालायं..
Maharashtra Breaking News: संभाजीनगर-धुळे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात झालाय. कार आणि दोन बसमध्ये जोरदार धडक झालीये. या अपघातात जवळपास 25 हून अधिक लोक जखमी झालेत. तर बसचालक गंभीर जखमी झालाय. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पाकिस्तानातील जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर येतेय. स्फोटामुळं रेल्वे रूळांवरुन 4 डबे घसरले आहेत. पाकिस्तानातील क्वेटा येथे ही घटना घडली आहे.
Maharashtra Breaking News: आज भाषा सक्ती करताय उद्या इतरही फतवे निघतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच, हिंदीची सक्ती दक्षिणेत कराल का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra Breaking News: हिंदी सक्ती कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळः राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबाबत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. शैक्षणिक धोरणातील हिंदी भाषेला मनसेचा विरोध, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला. कुचांबे पुनर्वसन ठिकाणचा डोंगराला भल्या मोठ्या भेगा. डोंगराला भेगा गेल्याने इथल्या सात घरांना धोका वाढला. डोंगराला भेगा गेल्याने डोंगराचा खचलेला काही भाग एका घराच्या मागच्या पडवीवर पडला आहे. गडनदी प्रकल्पात स्वतःहून पुनर्वसन केलेल्या ग्रामस्थ भितीच्या छायेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास डोंगराच्या भेगा वाढणार अशी भिती आहे.
शाळांमध्ये तिसरी भाषा हिंदीच राहणार? नव्या जीआरमधून 'अनिवार्य' शब्द वगळला, पण नवा नियम... https://t.co/cvmDIMPVXX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
राज ठाकरे त्यांच्या पक्ष्याचे नेते आहेत महाराष्ट्रातील अनेक घडामोडीवर ते व्यक्त झाले आहेत. राज ठाकरे राज्याचे नेते आहेत. तुम्हांला अपेक्षित आहे ते नक्कीच बोलतील, असं व्यक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक तसेच काल निघालेल्या हिंदी भाषा संदर्भातील GR वर होणार चर्चा. अमित ठाकरे,संदीप देशपांडे मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते बैठकीसाठी उपस्थित
Maharashtra Breaking News: आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या पतीला अटक
राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यांना 7.42 कोटींच्या फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यातही प्रोडक्शन वॉरंट मिळाले असून बुधवारी त्यांचा ताबा घेत पुढील तपास करण्यात येणार आहे.
Maharashtra Breaking News: नाशिकच्या येवल्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा लभडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलीयं. विद्यमान सरपंच यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरचे पद रिक्त झाल्याने मनीषा लभडे यांची सरपंचपदी निवड झाली. यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.. ..
Iran Israel Conflict: 'युद्धाला सुरुवात', इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केली घोषणा, ट्रम्प म्हणाले 'तुम्ही कुठे लपलाय हे...'https://t.co/S3dPrpTsMt#ısrael #IsraelIranConflict #Gaza #Iran #IranIsraelConflict #iranisraelwar #GazaGenocide #Khamenei #Donald_Trump
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
'रोहित शर्मा काय होता? त्याला तरी कुठे...', शुभमन गिलला कर्णधारपदासंदर्भात देण्यात आला स्पष्ट संदेश, 'जर BCCI ने...'https://t.co/RB3K6KZuBo#ShubhmanGill #SubhmanGill #RohitSharma #INDvsENG #indiavsengland
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
रक्तरंजित संघर्ष! इस्त्रायलने गाझामध्ये अन्न मिळवण्यासाठी जमलेल्या गर्दीवरच केला हल्ला; 59 ठार, 221 जखमीhttps://t.co/64r8g3NaDf#ısrael #IsraelIranConflict #Gaza #Iran #IranIsraelConflict #iranisraelwar #GazaGenocide
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2025
Maharashtra Breaking News: पुण्यातील शिरुरमध्ये पावसाचं जोरदार आगमन झाल्यानंतर शेतक-यांची ऊस लागवडीची लगबग सुरू झालीय... गेली 2 वर्ष या परिसरात उसाच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती... मात्र आता चांगला पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतायं...
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होतीये... यावर्षीचा हा 340 वा पालखी सोहळा आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहुतून प्रस्थान सोहळयाला सुरुवात होणार आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणी काकड़ आरती करून सुरुवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळयाचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
Maharashtra Breaking News Live Update: पालखी सोहळ्यादरम्यान पुण्यात ड्रोनच्या वापरास बंदी. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
बीडमध्ये शेतक-यांच्या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय...शेताच्या बांधावर तृण काढण्यावरून ही हाणामारी झालीय...कानडी घाट परिसरात 4 जणानी महिलेला बेदम मारहाण केलीय... महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय...महिलेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय
Maharashtra Breaking News: 51व्या G7शिखर परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, जगभरातील सर्व महत्वाच्या नेत्यांचं फोटोशूट
Maharashtra Breaking News: इस्राईल आणि इराण या दोन देशात युद्ध पेटलं असून तणाव वाढला आहे. इराणमधून 110 भारतीयांचा पहिला गट आर्मेनियाला पोहोचला आहे. हा गट उद्या दिल्लीला येईल
Maharashtra Breaking News: अर्नाळा युद्धनौका आज नौदलात दाखल होणार. विशाखापट्टणम इथल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये युद्धनौकेचं जलावतरण होणार.
Maharashtra Breaking News: मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना १३ वर्षात महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद झाल्याचे वास्तव समोर आलंय. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी घटलीये. केवळ विद्यार्थीच नव्हे तर या शाळांमधील शिक्षकांची संख्याही घटलीये. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्यात
Maharashtra Breaking News: पुण्यातल्या 830 पैकी 58 पूल कमकुवत असल्याचं पीडब्लूडीच्या पाहणीतून समोर. इंद्रायणी नदीवरचे चार पूल वाहतुकीसाठी धोकादायक
विशाखापट्टणम - अर्नाळा युद्धनौका मंगळवारी विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये औपचारिकरित्या नैसेनेत दाखल होणार आहे. नौकेचे नाव महाराष्ट्रातील इतिहासप्रसिद्ध अर्नाळा किल्ल्यावरून ठेवण्यात आले आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर येणारे तीन दिवस ऑरेंज अलर्ट, मान्सून चार ते पाच दिवसापासून सक्रिय झालाय त्यामुळे कोकणात आपल्याला गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे.
मुंबई-मनसे नेत्यांची शिवाजी पार्क येथील पक्ष कार्यालयात बैठक पार पडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे मुख्य नेते राज ठाकरे उपस्थित नसतील.
मुंबई- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आज बैठक होत आहे. 55 नगरसेवकांची मातोश्रीवर दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.
देहू, पुणे- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याच्या पूजेसाठी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम... माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 20 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, जळगाव मधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध विकासकामांचे उद्घाटन आणि धरणगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक आश्रमशाळा व संग्रहालयाचे उद्घाटन या कार्यक्रमां. देवेंद्र फडणवीस जळगावात येत आहेत.
शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला पार पडणार आहे. वरळीत डोम येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणारा असून याबाबत तयारीची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीला मुंबईतील आमदार नेते मंडळी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर येणारा हा वर्धापन दिन शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या वर्धापन दिनी काही विशेष जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना देणार असल्याची माहिती आहे
१२ जून ते १७ जून २०२५ दरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, एअर इंडियाच्या वाइड-बॉडी ऑपरेशन्समधील एकूण ८३ उड्डाणे रद्द करण्यात आली, त्यापैकी ६६ बोईंग ७८७ उड्डाणे होती: डीजीसीए
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.