Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
विधानसभेत जनतेनं तुमचा मुडदा पाडला
वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही
आता मराठी माणसाच्या नावानं गळे काढतील
मुख्यमंत्रीपदासाठी जे लाचार झाले ते कसले बाळासाहेबांचं वारसदार?
किती उतावीळ झाले, युती करता का माझ्याशी, युती करता का
शिवसेनेच्या मतदारांचा उबाठाला केव्हाच टाटा बाय बाय
बाळासाहेंबांना हिंदूह्रदयसम्राट म्हणताना जीभ का कचरते
काहींना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण होते
दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे.
काल 7 राज्याच्या प्रमुखांची भेट घेतली, शिवसेना वाढलीय
बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपलाय
आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन
आपला वर्धापन मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा
ठाकरेंच्या सेनेला काँग्रेसच्या व्होट बँकेवर काही जागा मिळाल्या
ठाकरेंनी सत्तेसाठी लाचारी केली आणि कंबरेचं डोक्याला गुंडाळलं
काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप ठाकरेंनी केलं
इतक्या वेगानं रंग बदलणारा सरडा महाराष्ट्रानं पाहिला
मागच्या वर्षी लोकसभेच्या निकालानंतर कमी जागा आल्या त्या नंतर 4 महिन्यात झालेल्या विधानसभेला आपण 232 जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आणू शकलो.
आई भवानी शक्ती देवो आणि संजय राऊत यांचा सत्यानाश होवो
कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता येणार आहेत.
मंत्री आधी मी एक कार्यकर्ता आहे.
माझा पिवर माल संजय राऊत आहे.
संजय राऊत बोलत होते आपण पक्ष हायजक करू
राज ठाकरे युती बाबत संजय राऊत म्हटले होते हा संपलेला पक्ष आता i love you बोलत आहे.
त्याच्या 20 आमदार पैकी अनेक आमदार आमच्या संपर्कात
आम्ही सत्ते पोटी गेलो गद्दार केली तुमच्या सोबत असलेले बडगुजराचं काय?
शिवसेनेला संपवणारे संजय राऊत आहेत.
हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडला आहे.
एक कार्टून आमच्या मतावर खासदार झालं
दोघं मिळून पक्षाला हायजॅक करू असं राऊत शिंदेंना म्हणाले होते
सत्ता असताना राऊत मनसेला संपलेला पक्ष म्हणालेले
आता संजय राऊतच मनसेच्या सोबतीच्या बाता करतायंत
पालिकेवर महायुतीची सत्ता येणार असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या वर्धापन सोहळ्यात बोलताना केलं आहे.
हिंदू मुस्लीम करण्यासाठी एक बेडूक ओरडतो. उंची पेंग्विनची, चाल कोंबड्याची व आवाज बदकाचा. एक कोण तरी बाप ठरवा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय.
शेठजींच्या नोकरांना युती होऊ नये असं वाटतं. जे राज्याच्या मनात तेच करणार. मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
सिंचन घोटाळ्यावर आरोप करणारे पाय धुवून पाणी पित आहेत- उद्धव ठाकरे
हिंदीसोबत वैर नाही पण हिंदीसक्ती कशासाठी?
घोटाळेबाज नेत्यांसोबत फडणवीसांचा फोटो
दहशतवादी गेले कुठे, पाताळात, आकाशात की भाजपात गेले
आता फक्त दाऊदलाच भाजपात घ्यायचं बाकी आहे
ट्रम्पचा फोन आल्यानंतर मोदी-शाहांचा आवाजच गेला
देशाची वाट लावल्यानंतर आता शिवसेना संपवण्याची वाट पाहत आहेत.
एवढं करून पक्ष संपत नाही असा त्यांना प्रश्न पडत असेल. पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. महाराष्ट्रधर्म पाळणारी ही माणसे आहेत. पैसा फेको तमाशा देखो...तिकडे चोरांचा बाजार आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी मां साहेबांच्या मांडीवर बसलो होतो. आता दाढी खाजवणारे कुठं होते. राजकारणात ज्यांना पोरे होत नाहीत, त्यांची किव येते. भाजपची पाळीव बेडके बोलतील आमच्या वर्धापन दिनावर. या चोरांना लाज लज्जा शरम नाही.
वाघ शरण जात नाही व गवतही खात नाही.ते शरण गेलेले वाघ अमित शहांचे,मोदींचे गवत खातायत- संजय राऊत
हल्ल्याचे राजकारण भाजपने सुरू केले. ट्रम्पच्या फोननंतर माघार घेतात. तेच ट्रम्प पाकच्या सैन्य प्रमुखाला जेवायला बोलवतात व आय लव पाकिस्तान म्हणतात- संजय राऊत
पहलगाम हल्ल्याला 2 महिने होवूनही 4 दहशतवादी शोधू शकले नाहीत.
वर्धापन दिनाच्या भाषणातील संजय राऊतांचे मुद्दे-
शिवसैनिकांच्या संघर्षामुळे शिवसेना उभी
ज्या माकडांना माणसं केली, त्यांनीच पाठित वार केला
आपल्या मनोरंजनाची सरकारनं जबाबदारी घेतली
कुणीतरी एक मंत्री उघडाबंब अघोरीबाबासमोर बसला
साता-यातील महाबळेश्वर-तापोळा रस्ता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दरड खाली आल्यामुळे खचला आहे...चिखली शेडजवळ हा रस्ता खचला आहे. पर्यायाने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याचा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, या भागात सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीचा कामात अडथळे निर्माण होत आहेत.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांजूर मार्ग स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज स्थानाकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकलच्या पेंटोग्राफ मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.या बिघाडामुळे लोकल ट्रेन अर्धातास उशिराने धावत आहेत.
- अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात देण्यात आली अखेरची सलामी
- हवेत तीन वेळा गोळ्या झाडत मारुती चितमपल्ली यांना देण्यात आली मानवंदना
- मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.सचिन कल्याणशेट्टी , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची प्रमुख उपस्थिती
- अरण्यऋषी पद्मश्री मारुतीची चितमपल्ली यांचे पुतणे श्रीनिवास चितमपल्ली यांनी दिला अग्नी
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई मालेगाव शहरातील नवीन बस स्थानकाजवळ करण्यात आली असून,यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीकडून देशी दारूच्या शेकडो बाटल्या, एक कार,आणि एक मोटारसायकल असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास मालेगाव पोलिसांकडून सुरू आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पाऊस बरसत असून मुसळधार पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील आहुपे खोऱ्यातील धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. या परिसरात सध्या दाट दुख दाटून आलंय हिरवागार निसर्ग भरलाय, शंभर ते दीडशे फूट उंची वरून खळखळून वाहणारा हा पांढरशुभ्र धबधबा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे याची एक्सक्लिझीव दृश्य आपण झी 24 तास वरती पाहू शकता.
त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात आणि नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 48 तासात होत असलेल्या मुसळधार पावसाने गंगापूर धरणाचा सहा टक्के पाणीसाठा वाढला आहे. आजमीतिला 52% जलसाठा असून गंगापूर धरण समूहातील कश्यपी गौतमी गोदावरी आळंदी सर्वच धरणांमध्ये जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या विसर्ग सारखी परिस्थिती नसली तरी गोदावरीला मात्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या उपनद्यांमधील पुरामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते आहे. वरच्या बाजूला कुठलाही विसर्ग होत नसताना नाशिक ते निफाड पर्यंत गोदावरी त पाण्याची वाढ सतत होत आहे रामकुंडावर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने जायकवाडी कडे पाणीसाठ्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम तर दारणा धरण 55 टक्क्यावर गेल्याने 1100 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग. नांदूर माध्यमेश्वर धरणात पाणीसाठा वाढल्याने विसर्गात वाढ झाली असून गंगापूर धरण 48 तासात 52 टक्के वर 3228 वरून 4842 क्यूसिक्स वेगाने पाणी प्रवाहित होत आहे. तर जायकवाडीला उद्या संध्याकाळपासून पाणी मिळणार.
सातारा - पाटण तालुक्यातील जानुगडेवाडीनजीक एसटी बसला अपघातात होऊन 30 प्रवासी जखमी झाले आहेत. ढेबेवाडी येथील धोकादायक वळणावर खासगी प्रवासी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटून बस झाडावर आदळली.जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असून चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित जखमींवर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.ही बस सळवेहून पाटणकडे जात असताना अपघात झाला.अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
ठाकरे बंधूंची युती व्हावी ही लोकांची इच्छा आहे. ही लोकभावना ओळखू शकलो नाही तर महाराष्ट्रावर अन्याय ठरेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. महाराष्ट्रासाठी कुठलाही त्याग करायला तयार आहोत असंही त्यांनी सांगितलंय. मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरे मेळाव्यात विचार मांडतील असंही राऊतांनी म्हटलंय..
मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील बहुतांश मंदिरं पाण्याखाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. नाशिक जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पालखी सोहळा आकुर्डी कडे मार्गस्थ होत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या अनगडशहावाली बाबा यांच्या दर्ग्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली समाज आरती पार पडते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर देहू वासीयांनी निरोप दिल्यानंतर सर्व प्रथम अनगड शाह वाली बाबा यांच्या दर्ग्यात समाज आरती करून तुकोबांची पालखी मार्गस्थ होते. त्यामुळे अनगडशहा वाली बाबा यांच्या आरतीला विशेष महत्व दिले जाते. अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य समजले जातात. त्यामुळेच या दर्ग्यासमोर पालखी थांबवून समाज आरती पार पडते.
देहूतील इनामदार वाड्यातून पालखी आता पिंपरी चिंचवड कडे मार्गस्थ होत आहे. इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यावर तुकोबांच्या पादुकांची पहिली समाज आरती ही अनगडशहा वली बाबा याठिकाणी पार पडते. ही आरती झाल्यानंतर तुकोबांच्या पादुका या पालखी रथात विराजमान होतात. या पालखी रथाला आता आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. तर बैलजोडी देखील पालखी रथाला जुंपण्यात आली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवड कडे मार्गस्थ होणार आहे. मात्र रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे पालखी मार्गावर काही प्रमाणात पाणी साचले आहे. तरी देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेले हे वारकरी पाण्यातून वाट काढत पंढरीच्या दिशेने चालू लागले आहेत. सध्या रस्त्यावर पाणी असले तरी पावसाचा जोर आणखी वाढला तर मात्र हे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देहूतून पिंपरी चिंचवड कडे जाणारा हा वारकऱ्यांचा पहिला टप्पा काहीसा जलमय रस्त्यावरून असणार आहे. पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून पांडुरंगाचे नामस्मरण करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून पिंपरी-चिंचवड कडे मार्गस्थ.
संत तुकोबांची पालखी आज देहूच्या इनामदार वाड्यातून पिंपरी चिंचवड कडे प्रस्थान करत आहे. सकाळ पासूनच पावसाचा जोर मोठा आहे. मात्र यामुसळधार पावसात देखील हे वारकरी कशाची तमा न बाळगता अभंग गात टाळ मृदुंगच्या तालावर थिरकताना दिसत आहे.
पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांना नद्यांचे स्वरूप आले आहे. कोथरूड गणंजय सोसायटीमधील बधाई मिठाईजवळील उच्चभ्रू सोसायट्यांना मोठा फटका बसला आहे..नाल्याचं पाणी थेट तीन ते 4 सोसायट्यांच्या परिसरात शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भागातील नाल्याचं पाणी अडवल्यामुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये सांडपाणी साचले आहे. काही ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी साचले आहे, त्यामुळे रहिवाशांना घरात जाणे कठीण झाले आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात भयानक दुर्गंधी पसरली आहे आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे
पाली शहराजवळील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला सखल भाग असल्याने अंबा नदीचे पाणी दोन्ही बाजूला साचले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय
IND vs ENG Test Series: 'कर्म हिशेब चुकता करतं,' गौतम गंभीरला टोला? कसोटी संघातून बाहेर झालेल्या खेळाडूची पोस्ट व्हायरलhttps://t.co/lxOfjyrzzN#indiavsengland #INDvsENG #GautamGambhir
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 19, 2025
'आई फार वाईट आहे, तिने बाबांना मारुन टाकलं,' 9 वर्षीय मुलाचा जबाब ऐकून पोलीसही हादरले, 'खाट हालत होती आणि उशी...'https://t.co/3VEHYrkpPf
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 19, 2025
पत्नीला प्रियकरासह रंगेहाथ पकडल्यानंतर पतीचं धक्कादायक कृत्य; बायकोचं नाक चावलं अन् नंतर...https://t.co/Jd1G0MHkN4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 19, 2025
फास्टॅगचा वार्षिक पास मुंबई-पुणे एक्सप्रेस, अटल सेतूवर लागू होणार का? गडकरींच्या घोषणेचा अर्थ नीट समजून घ्याhttps://t.co/9XmCwDYLqo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 19, 2025
संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून आज पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. देहूतील इनामदार वाड्यामध्ये तुकोबांच्या पादुकांची शासकीय पूजा करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्द डूडी तसेच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली. दुपारनंतर तुकोबारायांच्या पालखीचं निगडीत स्वागत करण्यात येणार आहे. सकाळपासूनच पुण्यात पावसाचा जोर आहे. मात्र या मुसळधार पावसात देखील हे वारकरी कशाची तमा न बाळगता अभंग गात टाळ मृदुंग च्या तालावर थिरकताना दिसत आहे.
एकीकडे ठाकरे बंधुंच्या एकीकरणाच्या चर्चा जोरात सुरु असतांना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राज ठाकरेंशी युती होऊ शकते का याची चाचपणी सुरु आहे. खरंतर, शिवसेना वर्धापनदिनाच्या दिवशी राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पडद्यामागून अनेक राजकिय हालचाली सुरु आहेत. शिंदेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत शिवसेना मंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या काळात कदाचित फडणविस-राज टाकरे भेटीप्रमाणेच आणखी एखादी राजकीय भेट होण्याची शक्यता आहे. फडणविस- राज टाकरे भेटीमुळे ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागला अशीही चर्चा सुरु होती. उबाठा आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबतची इच्छा असली तरी दोन्ही पक्षांकडून ठोस प्रस्ताव दिला जात नाही आहे. त्यामुळे मनसे पुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना, मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की 'एकला चलो रे' ची भूमिका स्विकारतात हे पाहणं महत्वाचे राहणार.
नांदेडमध्ये उना-हिमाचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरलीये. नांदेड रेल्वे स्टेशनमध्ये एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर ट्रेन मागे घेताना हा अपघात झाला. रेल्वे रुळ संपल्यानं ट्रेनच्या मागच्या डब्याची दोन चाकं रुळावरुन घसरली. यामुळे ट्रेनचं किरकोळ नुकसान झालं. मात्र, या दुर्घटनेमुळे ही ट्रेन 5 तास उशिरानं रवाना झाली.
पुणे शहरात पावसाचा जोर वाढलाय. रात्रीपासून पुण्यात रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र, सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. सिंहगड रोड, मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, कोंढवा आणि खडकवासला भागात पावसाची बॅटिंग सुरु आहे. पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील 7.40 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. गतवर्षी याच दिवशी 3.62 टीएमसी साठा शिल्लक होता. यंदा मात्र धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.
मुंबई शहर,उपनगर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला काल पासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. काल संध्याकाळ पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावलीये, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 30 मिनिटे उशिराने सुरु आहे.
सराफ बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी उसळी घेतली असून, गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे सोन्याचा दर प्रतीतोळा 1 लाख एक हजार आठशे रुपये प्रतितोळे इतके झालीये, तर चांदी एक लाख 12 हजार 300 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणारेय. सोलापूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात तब्बल 36 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. तर दोनच महिन्यांपूर्वी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त होतोय. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेची शाखा बुधवारी रात्री 11 वाजता उघडी होती. बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या सापडल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलाय. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप देखील केला जातोय.
दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर वरळी डोमममध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत पोहोचलेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.