Maharashtra Breaking News Today 23 June LIVE Updates : नितीन गडकरी आज पुण्याचा दौऱ्यावर असणार आहे. तर हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मनसे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरणार आहेत. इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी परिस्थिती अजून कठीण झाली आहे. तर टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यावर असून आज चौथ्या दिवशीचा खेळाकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष आहे. राज्यापासून देशापर्यंत, मनोरंजनापासून खेळ जगतापर्यंत सर्व क्षेत्रातील घडामोडीची सर्व अपडेट क्षणोक्षणी एका क्लिकवर...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांची भेट घेतली आहे. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.
धुळ्यात भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कुणाल पाटील यांनी रविंद्र चव्हाणांची भेट घेतलीय. ते लवकरच रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंनी शेतक-यांकडे कर्जाचा तगादा लावलाय. शेतक-यांनी लवकरात लवकर कर्ज भरलं पाहिजे असं विधान त्यांनी केलंय. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.
पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मागणीhttps://t.co/au6Ew2qMTS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय.. गुलाबराव पाटलांनी केलेल्या आरोपांनंतर संजय राऊत यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
संदीप देशपांडे हे भाजपचं काम करत आहेत.. त्यांच्या बोलण्याची स्क्रिप्ट ही भाजपकडून येत आहे, असा गंभीर आरोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळींनी केलाय.. ठाकरे बंधू एकत्र येणं हे भाजपला परवडणार नसल्यानं ते संदीप देशपांडेंना समोर करत असल्याचं देखील शरद कोळींनी म्हटलंय...
राज-उद्धव युतीच्या चर्चांवर सुषमा अंधारे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्यात की, महाराष्ट्र द्रोह्यांचे मनसुबे हाणून पाडू. युती होण्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मराठीच्या हितापुढे टीका टिपण्णी शुल्लक नाही, असं त्या म्हणाल्यात.
VIDEO: चिमुरड्याला नदीत खेचून घेऊन गेली मगर, आधी जबड्याने पाय पकडून खाली पाडलं नंतर....; लोक फक्त ओरडत राहिले
VIDEO: चिमुरड्याला नदीत खेचून घेऊन गेली मगर, आधी जबड्याने पाय पकडून खाली पाडलं नंतर....; लोक फक्त ओरडत राहिलेhttps://t.co/T3nhYuTllq#UP #Crocodile
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट पीक पेरा आणि बनावट सातबारा तयार करून फसवणूक पणन विभागाची फसवणूक करण्यात आलीय.या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.बनावट सातबारा तयार करून 2 हजार 93 पेक्षाही जास्त सोयाबीन पेऱ्याची नोंदणी करण्यात आली. राज्य सरकारची जवळपास 1 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीय.भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड इथल्या वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि खाजगी व्यापाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांचा अधिक तपास करतायत.
नाशिक जिल्ह्यात आता कांदा महाबँक तयार करण्यात येणार आहे तशी घोणाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. नाशिकमध्ये उत्पादन होणारा कांदा प्रक्रिया न केल्यामुळे खराब होतो. त्यामुळे कांदा साठवण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कांदा महाबँक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 एकर जागाही ठरवण्यात आल्याची माहिती भुजबळांनी दिलीय.
अँटेलिया इमारती खाली माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहानी बॉम्ब ठेवला होता असा गंभीर आरोप सलील देशमुख यांनी केलाय. तसंच ऐकीवर माहितीवर अनिल देशमुखांवर कारवाई करण्यात आल्याचं कोर्टात सिद्ध झाल्याचं सलील देशमुख म्हणालेत तसंच देशमुख कुटुंबियांवर झालेली कारवाई ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचा गंभीर आरोपही सलील देशमुख यांनी केलाय. कारवाईतून काहीही हाती आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच परमबीर सिंग हेच फिक्सर असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
महायुतीने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. परंतु शेतक-यांनी कर्ज भरलं पाहिजे. असं वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. तसेच शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही कोकाटेंनी म्हटलंय. अहिल्यानगरच्या कोपरगावात मीडियाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
पीक कर्जासाठी सीबीएलची अट लावू नये असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून ही बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी सीबीएल आणि इतर अटी घालून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे हिंगोलीच्या सेनगाव येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनेबँकेत बँकांची शाळा घेतलीय. शेतकरी पीक कर्ज मिळावं म्हणून शेतकरी बँकांत चकरा मारत आहेत. शेतकऱ्यांच्या बँकेतील चकरा थांबवण्यासाठी बँकेला धारेवर धरीत शिवसैनिकांनी बँकेसमोर आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना UBT आक्रमक झालीय. पीक कर्जावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात शिवसेना UBT आंदोलन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऑफिसमध्ये दानवेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं धडक दिली. यावेळी दानवेंनी बँकेच्या अधिका-यांना धारेवर धरलं.
'विधानभवनात सर्व षंढ बसलेयत', हिंदी सक्तीवरुन मनसे आक्रमक #HindiCompulsory #MNShttps://t.co/I5en6e0THz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
Video: चेंडू डोळ्यासमोर पकडला, उजव्या-डाव्या बाजूला फिरवला... साई सुदर्शनने नेमकं काय केलं? https://t.co/HRvBHTMW6Q#INDvsENGTest #ViralVideos #SaiSudharsan
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
राज्य सरकारने 2001 पासून 6353 कोटी रुपयांची भांडवली मदत केली आहे
2020 ते 2023 या काळात 4708 कोटींची महसुली मदत सरकारने केली आहे
वैधानिक स्वरूपाची देणी 3297 कोटी रुपयांची देणी बाकी आहेत
तोट्याच्या कारणामध्ये बसेस कमी असणे,तोट्याची फे-या, अनियमित भाडेवाढ,खाजगी वाहतूक याचा समावेश
दरवर्षी 5 हजार बसेस ताफ्यात आणण्याचे एसटीचे लक्ष्य आहे
टीम इंडियाविरुद्ध बेन स्टोक्सची चाल! भारतीय खेळाडूला इंग्लंडकडून उतरवलं मैदानात, संघाचाही नव्हता भागhttps://t.co/WnZophMG6P#INDvsENGTest #BenStokes #yashvagadia #Cricket
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
' सचिनच्या नावाआधी...' अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरुन नवा वाद, गावसकरांनी केली 'ही' मागणीhttps://t.co/TPMpdrDq3c #sports #SunilGavaskar #Anderson #TendulkarAndersonTrophy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
' सचिनच्या नावाआधी...' अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरुन नवा वाद, गावसकरांनी केली 'ही' मागणीhttps://t.co/TPMpdrDq3c #sports #SunilGavaskar #Anderson #TendulkarAndersonTrophy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार; वाचा आजचा सोन्याचा भावhttps://t.co/DAmFaPft9w
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
मरिन लाईन परिसरातील पाच मजली इमारतीला आग लागली आहे. नीळकंठ या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्नीसमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.
राज्याच्या त्रिभाषा सूत्र संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक
रात्री 9 वाजता मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवास्थानी होणार बैठक
पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाला पाहता बैठकीचे आयोजन
आधी हिंदी अनिवार्य करण्याचा घेतला होता सरकारने निर्णय
त्यानंतर 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एच्छिक विषय शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला
मात्र यामुळेही हिंदीची सक्ती होणार असा विरोधकांचा सरकारवर आरोप
यावर आज बैठकीत होणार चर्चा
लीक होणाऱ्या सिलेंडरचा रेग्युलेटर ऑफ करताना किचनमधून आग अन्...; थरार CCTV त कैद! दोघेही कसे वाचले पाहाhttps://t.co/Jr5zhKjeSK < येथे पाहा व्हिडीओ#Gas #Gascylinder #cylinder #explosion #CCTV #Video
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या 'एअर इंडिया' च्या बोईंग 787 विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीला आली आहे. ही घटना 1 जून रोजी घडली होती, मात्र त्याविषयी अलिकडेच माहिती मिळाली आहे. विमान हवेत असतानाच त्याचा दरवाजा हलू लागला आणि त्यातून आवाज येऊ लागले. त्यामुळे विमानातील प्रवाशांची तारांबळ उडाली होती. दरवाजा घट्ट बसवण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या वरील बाजूच्या फटीत पातळ टीपकागद भरले असे समजते. या धडकी भरवणाऱ्या प्रकारानंतरही ते विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरले होते. अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी हा प्रकार घडला होता.
'अमेरिका इतिहासातून काहीही शिकलेली नाही', UNSC मध्ये इराण हल्ल्यावरुन रशिया-चीनने सुनावलं, 'बळजबरीने...'https://t.co/24aKTnAzWp#USattackIran #donaldtrump #Iran #IranIsraelConflict #IranVsIsrael #IsraeliranWar #Russia #Putin #China
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
'तुम्ही कुठे कलेक्टर झालात?', मार्क्स कमी मिळाल्याने जाब विचारणाऱ्या वडिलांना मुलीचं उत्तर; संतापलेल्या बापाने रात्रभर....; ठोकल्या बेड्याhttps://t.co/b290oDCOzY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
मुंबईत माणुसकीला काळीमा! नातवाने 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; अवस्था पाहून पोलीसही हळहळलेhttps://t.co/CcK7pGg6bs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
'अनुपमा' मालिकेच्या सेटला लागली आग, संपूर्ण सेटच जळून खाक#Anupamaa #firenewshttps://t.co/jihOUklyMu
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 23, 2025
हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार पु्ण्यात समोर आला आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हांडेवाडी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोपींची चौकशी करून सोडून दिल्याचं पीआय मानसिंग यांनी सांगितले.
- बिहार निवडणुकीत मतदार यादी पडताळणीसाठी घरोघरी मोहीम राबवणार
- बांगलादेशी घुसखोर आणि बराच काळ राज्याबाहेर राहणारे लोक मतदार यादीतून ओळखले जातील
- निवडणूक आयोगाचे पथक बिहारमधील प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करेल
- 2004 नंतर पहिल्यांदाच बिहारमध्ये मतदार यादीची व्यापक पडताळणी केली जाईल
- अनेक जिल्ह्यांमधून मिळालेल्या अहवालात निवडणूक आयोगाला मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर असल्याचे अहवाल मिळाले आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात आज राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागाचे सचिव बैठकीला उपस्थित राहणार
- आज रात्री 9 वाजता वर्षा बंगल्यावर होणार बैठक
- शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी समाविष्ट करण्यास मनसेसह अनेकांचा विरोध
पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहनचालकांकडून अंमलबजावणी होत आहे किंवा नाही यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई: कुर्ला आणि भांडुप परिसरातील नागरिकांना पुढील चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कुर्ला आणि भांडुप भागातील रहिवाशांना पवई निम्नस्तर जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाच्या संरचनात्मक दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने निम्नस्तर जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ मधून सोमवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. नुकतीच दुरुस्ती झाल्याने कप्पा क्रमांक २ मधून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून संभाव्य दूषित पाणीपुरवठ्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कुर्ला आणि भांडुप परिसरातील नागरिकांनी पुढील चार दिवस पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे दोन आठवड्यांत ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढले असले, तरी सरासरीच्या तुलनेत प्रवासी संख्येत घट झाली असल्याचे समोर आले आहे. भाडेवाढ केल्यापासून दोन आठवड्यांत सरासरी १५ हजारांहून अधिक प्रवासी घटले आहेत.मे महिन्यात पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी दहा लाख १४ हजार ७९३ असून, दिवसभराचे सरासरी उत्पन्न एक कोटी ४२ लाख २९ हजार ६६४ रुपये होते. एक जूनपासून भाडेवाढ केल्यानंतर १५ जूनपर्यंत पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी नऊ लाख ९९ हजार ८३० पर्यंत आली. दोन आठवड्यांत सरासरी दोन कोटी ११ लाख ८५ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई : काश्मीरमधील पर्यटन संपुष्टात आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असून हा हेतू सफल होणार नाही. पहलगाम हल्यानंतर काश्मीरमध्ये भीती व चिंतेचे रण होते. ते आता पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक काश्मीर मध्ये जात आहेत. काश्मीरमधील रेल्वे, रस्ते यांचा विकास स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. येथील जनतेला दहशतवाद नको आहे. काश्मिर मधील पर्यटन वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मिर मध्ये व्यक्त केला.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) लंडन, टोरँटो, न्यूयाॅर्क येथे आंब्याची वाहतूक करण्यात आली. सीएसएमआयएने आंब्याच्या प्रमुख प्रजातींमधील हापूस, चौसा, केसर, बदामी नीलम या आंब्याची निर्यात केली. सीएसएमआयए येथे नाशवंत मालवाहतुकीच्या उत्तम हाताळणीमुळे आंब्याच्या निर्यातीमध्ये यावर्षी ९ टक्क्यांची वाढ झाली.
भारतातील नाशवंत वस्तूची सातासमुद्रापार वाहतूक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) प्रमुख भूमिका बजावली आहे. यावर्षी आंब्याच्या हंगामात सीएसएमआयएने भारतातील आंब्यांना जगभरात निर्यात करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. एप्रिल व मे २०२५ मध्ये विमानतळाने ३,६२४ मेट्रिक टन आंबा निर्यात केला. एप्रिल व मे २०२४ मध्ये ३,३१८ मेट्रिक टन आंबा निर्यात केला होता. तर, या दोन वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे जागतिक व्यापारामध्ये विमानतळाची विस्ताराची भूमिका अधिक दृढ झाली आहे.
श्रीनगरः जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी दिला आहे.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा उघडपणे इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. अब्दुल्ला यांनी शनिवारी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडून आलेले सरकार स्थापन होऊनही पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. २०१९ मध्ये या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, लोकांना आशा होती की नवीन सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल. परंतु राज्याचा दर्जा नसणे हा एक मोठा अडथळा आहे. राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय आपण लोकांच्या आकांक्षा कशा पूर्ण करू शकतो?
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेद्वारे केला जात असला तरी अद्याप हा पूल सुरू झालेला नाही. १० जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते मात्र जून महिना संपत आला तरी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पूल आणि विक्रोळी येथील पूल सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांना शहर भागातील कर्नाक पूल कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. विक्रोळी पूल व कर्नाक पूल हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. त्यापैकी विक्रोळी पूल सुरू झाला तरी कर्नाक पूल मात्र अद्याप वाहतूकीसाठी सुरू झालेला नाही.
विदर्भातून जवळपास 200 पेक्षा अधिक दिंड्या धाराशिव जिल्ह्यातून पंढरपूर कडे जातात. या सर्व दिंड्यांना कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यापासून अन्नदान करते आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपली शेती खास राखून ठेवली आहे या शेतीत फक्त या दिंड्यांसाठी लागणारे धान्य व भाजीपाला पिकवला जातो आनंदवारीसाठी यावर स्टोरी करून पाठवत आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक एसटी महामंडळाच्या आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका आज जाहीर करणार आहेत.
हिंदी सक्तीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज ते रस्त्यावर उतरणार आहे. तर घरोघरी जाऊन पालकांच्या सह्यांची मोहीम घेणार आहेत.
केंद्रीय मंञी नितीन गडकरी दिवसभर पुणे शहर दौऱ्यावर आहेत. हायवे प्रोजेक्ट आढावा बैठक, पुण्यभूषण प्रोग्राम मॉर्डन कॉलेज प्रोग्राम असे चार पाच भरगच्च कार्यक्रम असणार आहे. गडकरी शिवाजी रस्ता – बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पाची पाहणी आणि माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. पुण्यभूषण फाउण्डेशन आणि पुणेकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पद्मविभूषण आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर ३७वा पुण्यभूषण यांना पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.