बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक शांततेत पार पडली असून एकूण 67 मतदान केंद्रावर हे मतदान झालं आहे. रात्री मतदान प्रक्रिया संपल्यानंतर या मत पेट्या बारामती मधील प्रशासकीय भवन या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली असून 24 जून रोजी मतमोजणी पार पाडणार आहे. एकूण दोन फेऱ्यांमध्ये हि मतमोजणी पार पडणार असून एकूण 34 टेबलवरती ही मोजणी होणार आहे. प्रत्येक टेबल वरती चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे.
चुरा सिंग, पायल अरोरा आणि पिंकी मित्तल या तिघांना एअर इंडिया विमान अपघातासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यांची कोणची चूक महागात पडली? त्यांना काय शिक्षा होणार? जाणून घ्या.#airplane #AirIndiahttps://t.co/xu9MQHAWGV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 22, 2025
कल्याणमधील शिवसेना UBTच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. घनकचरा करवाढी विरोधात 9 जून रोजी केडीएमसी मुख्यालयावर शिवसेना UBTकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केडीएमसीचा गेट ढकलून देत केडीएमसी मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली होती. मनाई आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाकरेंचे कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपनेते विजय साळवी यांच्यासह 100 ते 125 कार्यकर्ते आणि पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कला, क्रीडा, समाजकारण, आरोग्य, व्यवसाय यांसह विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा, नागपुरात फेमस मीडियातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. नागपूरमधील वनामती इथं हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आलाय. झी 24 तास वृत्त वाहिनी या सोहळ्याची माध्यम प्रायोजक आहे.
महाराष्ट्र हादरला! 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला; विवाहित महिलेच्या प्रियकराचे अमानवी कृत्यhttps://t.co/4IsgLuzyTN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 22, 2025
'रश्मी ठाकरेंचा राजकीय हस्तक्षेप आढळला नाही', हा भरत गोगावलेंचा आरोप छगन भुजबळांनी फेटाळले आहे. आपण शिवसेनेत असताना रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप दिसून आला नाही. टीका करताना सीमा ठेवणे गरजेचे असंही छगन भुजबळांनी गोगावलेंना फटकारलं आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीत पैशांचा खेळ झाला असल्याचं चंद्रकांत तावरे यांनी म्हटलंय. अजितदादांच्या पॅनले 11 हजार मतदारांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे पैसे वाटले अशी माहिती आपल्याकडे असल्याचं चंद्रराव तावरे यांनी म्हटलंय. तसंच अजितदादांनी सोबत येण्यासाठी आपल्याला अध्यक्षपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोटही केलाय.
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातील दोषी आढळलेल्या 3 अधिकाऱ्यांपैकी पायल अरोरा आणि दुसऱ्या आहेत पिंकी मित्तल...पिंकी यांचं नेमकं काय चुकलं?#airplane #AirIndiahttps://t.co/9hQ7Ov4aAR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 22, 2025
हिंदी सक्तीविरोधात मनसे उद्यापासून थेट रस्त्यावर उतरणार आहे. मनसे उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहीम सुरू करणार आहे... मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिलीय. तसेच मनसेच्या शांततेच्या चुकीचा अर्थ राज्य सरकारने काढू नये असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.
मुंबै बँकेवर संचालकपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर तेजस्वी घोसाळकर पहिल्यांदाच त्यांच्या भेटीला गेल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याच्या चर्चा रंगली होती. त्यात मुंबै बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांचे तेजस्वी यांनी आभार मानले. त्यामुळे त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही सुरु झाली. आता उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे त्यांनी नाराजी दूर होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळलेत.. मराठीचा मुद्दा हा काय मुद्दा आहे का असं अबू आझमी म्हणालेत.. मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करु नका असंही ते यावेळी म्हणालेत.. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलाताना त्यांनी हे विधान केलंय.
वारीदरम्यान सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता, परवानगी नसलेल्या ड्रोनवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. दिवे घाट परिसरात उडवलेला काही ड्रोन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.तर अनेक ड्रोन पाडण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ड्रोन उडवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर नजर ठेवण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
Come on kill me ऐवजी come on save me म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात युवा शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर.
कल्याण नगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात भर रस्त्यात हाणामारी झाली. काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . शहाड उड्डाणपुलावर रोजच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांच्या बाचाबाचीचे प्रकार घडत असतात असाच एक प्रकार काल रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाला.
अमेरिकेच्या युद्धातील अलर्टनंतर इराणने इस्रायलवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा शहरावर जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. इराणने तेल अवीव शहरावर 40 क्षेपणास्र डागल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या मुख्यालयात हा प्रवेश होणार आहे.
इराणवरील हल्ल्यांतर आता इस्रायलमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. इराण- इस्रायल युद्धात आता अमेरिकेने एन्ट्री घेतली आहे.
मातोश्रीच्या आसपास असणार्या परिसरात नितेश राणे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आला आहे.
बाळासाहेबांनी उमेदवारी दिली होती पण..., 21 वर्षानंतर भास्कर जाधवांनी सांगितलं शिवसेना सोडण्याच कारण#bhaskarjadhav #ShivsenaUBT #UddhavThackeray https://t.co/6uIqzIX0WX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 22, 2025
गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततदार सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून 3900 चा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे गोदावरी नदी पाणी पातळी मध्ये वाढ झालीये. रामकुंडा परिसरात असलेल्या छोटे-मोठे मंदिर हे पाण्याखाली गेले आहे. तर पुराचे इंडिकेटर म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढं पाणी आलंय. पावसाची संततदार अशीच सुरू राहिली तर टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
साठ्ये कॉलेज तरुणीच्या आत्महत्येतं खरं कारण समोर, मोबाईल मेसेजमधून झाला धक्कादायक खुलासा!#SatheyCollege #SandhyaPathakSucidehttps://t.co/TF0hJFefRm
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 22, 2025
मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तरीही मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. विभागातील 376 गावे आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 165 गावे आणि 24 वाड्यांमध्ये एकूण 245 टँकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 109 गावे आणि 23 वाड्यांना 1981 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इतर जिल्ह्यांमध्येही टंचाईचे प्रमाण कमी असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी लवकर या पालख्या निघणार असल्यामुळे काही रस्ते हे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली असून पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे.
दादर इथल्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या बॅनरवर सूर जुळणार. महाराष्ट्राचं चित्र बदलणार. महाराष्ट्रात काही वर्षात समिकरण बदलणार . महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलीय शिवसेना UBT पक्षाचे शिवसैनिक महेश जाधव यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलाय. शिवसैनिक आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळशी ते महाराष्ट्रात ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं घालणार आहेत.
दोन्ही पालख्या उद्या भल्या सकाळीच पुण्यातून हाडपेराकडे मार्गस्थ होणार, माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवडला मुक्कामी जाईल तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर ला मुक्कामी जाईल.
आयएमडीने देहरादूनमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २२ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे - आयएमडी
राष्ट्रवादी सोबत युती करण्याची शिवसेनेची तयारी .वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेव निर्णय घेऊ . मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण .मात्र पालक मंत्री पदाबाबत सुनील तटकरे यांनी मोठं मन करावं .गोगावले यांनी व्यक्त केली अपेक्षा .
शरद पवारांची साथ सोडणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचं मोठं विधान भास्कर जाधवांनी केलंय, त्यामुळे मविआत असताना त्यांनी मला विरोध केला तर तो विरोध योग्यच होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी मला तारायला हवं होतं असंही जाधव यांनी म्हटलय.. शरद पवारांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं तसंच कॅबिनेट मंत्रिपदही दिलं होतं. मात्र, तरीही शरद पवारांची साथ सोडल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली.
भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केलीय. पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हंटलंय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.