मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार एकनाथ शिंदेंची माहिती. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे.
फेंगल चक्रीवादळ उद्या कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली.
नव्या राज्य सरकारच पहिलं अधिवेशन नागपुरात होणार असल्याने त्याच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळ नागपुरात असते. त्यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे.. विधानभवन परिसरात तयारींवर अखेरचा हात फिरवण्यात येतोय... सभागृहात सदस्यांसाठी अद्यावत यंत्रणा करण्यात येत आहे. शिवाय विधानभवन परिसरात सीसीटीव्ही ही बसवण्यात येत आहे. तर मंत्र्यांचे बंगल्यांची देखभाल व दुरुस्तीचे कामही जोरात सुरू आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पाण्याच्या जारची विक्री करणाऱ्या खाजगी दुकानावर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स तर्फे धाड टाकण्यात आली आहे. परवानगी नसताना अनधिकृतपणे आयएसआय हॉलमार्क असलेल्या पाण्याचे जार विक्री करण्यात येतं असल्याची माहिती ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्सला मिळाली होती. त्यानुसार अंशिता इंटरप्राईजेस या दुकानावर धाड टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या आयएसआय हॉलमार्क असलेल्या पाण्याच्या जारवर कारवाई करण्यात आलेय.
पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील पाच पराभूत उमेदवारांनी निकालाच्या पुनर्पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांनी पुनर्पडताळणी प्रक्रियेसाठी आवश्यक रकमेचा चलान देखील भरला आहे. हडपसर मधून पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूर मधून अशोक पवार आणि खडकवासल्यातून सचिन दोडके, चिंचवड मधून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या चारही उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. यासोबतच कॅन्टोन्मेंट मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी देखील निकालाच्या पुनर पडताळणीसाठी अर्ज करत चलान भरले आहे.
पिंपरी चिंचवड मधील भाजप पदाधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड करांच श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात अभिषेक करत देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री व्हावेत असं साकडं घातलं. महायुतीचा घवघवीत यशात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना मुख्यमंत्री करावं अशी भावना भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड वर्षावर दाखल
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला
जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल.
भेटीचे कारण अस्पष्ट
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी-गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात. पाच ते सहा लोकांचा मृत्यू तर 30 ते 35 लोक जखमी असल्याची माहिती.
मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीत मंत्रिपद ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तर या सगळ्यात अशी माहिती समोर आली आहे की ही बैठक 2 दिवसांनंतर होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
-नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी?-सूत्र
-भाजपकडून 14 महिला आमदार विधानसभेवर
-NCPच्या 4 महिला आमदार , शिवसेनेच्या 2 महिला आमदार विधानसभेवर
-मंत्रिपदासाठी महिला आमदारांचे प्रोफाईल मागवले-सूत्र
गटनेता निवडीसाठी सगळ्या आमदारांना मुंबईत येण्याचे भाजप आदेश देणार आहे. भाजप विधिमंडळ गटनेता 1 तारखेला निवडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून 10 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. राष्ट्रवादीनं 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज मुंबईत खाते वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे.
1. मुख्यमंत्री भाजपचाच होणार, शिंदे आणि आणि अजित पवारांनी दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत प्रस्ताव दिल्याची माहिती.
2. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..
3. एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर देण्यात आल्याची सुत्रांची माहिती. एक म्हणजे डीसीएम आणि दुसरं केंद्रात मोठ कॅबिनेट देण्याची ऑफर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
4. एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रीपदाची मागणी -सूत्र
5. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेची मागणी -सूत्र
6. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंची अमित शहांना विनंती
EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. EPFO ग्राहकांना होणार आणखी लाभ. आता PF ची12 टक्क्यांची मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लवकरच एटीएममधून PF काढण्याची सेवाही मिळण्याची शक्यता.
20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. तरी सुद्धा अजूनही काही ठिकाणी मतदारसंघात उमेदवारांकडून ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर आता अहिल्यानगरमधील 6 मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. तर पराभूत उमेदवारांकडून पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या नेतृत्त्वावर बोलताना संजय राऊतांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की 'महाराष्ट्रात कोणी काय करायचं ते अमित शाह ठरवतात. महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे झुकलंय तर एकनाथ शिंदे, अजित पवारांना जे हवं ते कधीच मिळणार नाही.'
2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.