Maharashtra Breaking News : देशभरात नवं आर्थिक वर्ष सुरू झालं असून या आर्थिक वर्षामध्ये नेमकं काय बदलणार? इथपासून राज्यात कोणत्या घडामोडी ठरणार लक्षवेधी.... सर्व अपेट्स एका क्लिकवर. तुमच्या जिल्ह्यापासून शहरापर्यंत नेमकं काय सुरुय... पाहा....
राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफियाकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसोबत बोलावली तातडीची बैठक. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही दिलं बैठकीचे आमंत्रण.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठी यांनी मुरूम उत्खनन प्रकरणासाठी मागितली 2 लाखांची लाच. तहसीलदारांविरोधात शेतक-याची एसीबीकडे तक्रार. तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात, तलाठी फरार.
वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील नारा गावात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन ते तीन घरे जळाली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मावळ मतदार संघातील ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या याबाबत काही विचार केला नसल्याचं वाघेरेंनी सांगितल आहे.
प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच. प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीतच राहणार. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हैराण झाला आहे.
बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा अंजली दमानिया आणि शेतकऱ्यांचा आरोप खोटा, माझा जमिनीशी काही संबंध नाही म्हणत पोपट घनवट यांनी दमानियांचे आरोप फेटाळले आहेत.
दिशा सालियन मृत्यूची दखल सरकारनं घेतली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी. 2022 ला खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्याचा दिशा सालियन प्रकरणातील वकिलांचा आरोप. या प्रकरणी आता 1 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं निलेश ओझा यांनी सांगितलं.
वतन जमीनींच्या प्रश्नासंर्दभात उदयनराजे भोसले हे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
ई-बाईक धोरण महाराष्ट्रात स्विकारले जाईल. बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
जगात एप्रिल फूल तर आपल्याकडे अच्छे दिन नावाने ओळखले जाते. हे एप्रिल फूल सरकार आहे. लाडकी बहिणचे अनुदान वाढवले नाही. लाडका भाऊ बंद केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. मुंबईवर अदानी टॅक्स लावला जाणार. कचऱ्यावर मुंबईत कर लावला जाणार.देवनारचे डंपिंग ग्राऊंड अदानीला स्वच्छ करून हवे आहे.यासाठी तीन हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
सह्याद्री अतिथी गृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी असल्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी इकबाल सिंह चहल कॅबिनेट बैठकीसाठी पायी चालत आले.
उन्हामुळे हैराण विदर्भातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तसेच दोन दिवस बहुतांश भागांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील व कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असेही हवामान विभागानं म्हटलं आहे.
'तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट असे दोन व्यक्ती पंकजा मुंडे यांचे विषय घेवून माझ्याकडे आले होते. राजेंद्र घनवट शेतकऱ्यांच्या छळ करत आहेत. घनवट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय', असा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला. 'जगमित्र शुगर नावाची कंपनी मध्ये राजेंद्र पोपट घनवट हे या कंपनीत डायरेक्टर. शेतकऱ्याला छळुन कवडी मोलाच्या दराने जमिनी घेतल्या. जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोपट घनवट यानां माझे आव्हान आहे. संजय उर्फ आनंद च्या नावाने प्रतिज्ञा पत्र करुन घेतली जातात. राजकीय ताकत वापरून लोकांच्या जमिनी लुटणाऱ्या या बिल्डरची चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी दमानिया यांनी केली. मयत व्यक्तींना जिवंत दाखवून व्यवहार केले; दमानियांकडून बीडमधील आणखी एक धक्कादायक माहिती उघड.
रत्नागिरी - निवळी - जयगड मार्गावर ट्रक - मोटरसायकलचा भीषण अपघात अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी पेटवला ट्रक रत्नागिरी तालुक्यातील जयगड चाफे येथील प्रकार ट्रकने मोटारसायकल स्वाराला चिरडत दिड किलोमीटर फरफटत नेले रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक जयगड निवळी रस्त्यावरची अवजड वाहनांची वाहतुक ग्रामस्थांनी रोखून धरली.
अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या तीन महिन्यात महिला अत्याचाराच्या 100 गुन्ह्यांची नोंद झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून जानेवारी ते 30 मार्च या कालावधीत 31 पोलीस ठाण्याची ही आकडेवारी आहे. यामध्ये बलात्काराचे 32 तर विनयभंगाच्या 68 गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे 32 बलात्काराच्या गुन्ह्यात सर्व अल्पवयीन चिमुकल्यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Sbi बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिन मध्ये मनसेने जाब विचारला. बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत आढळून येत नसल्याचे मनसेने निदर्शनास आणले.. तर इग्रजी भाषेत असणारा बँक मधील फलक देखील मनसे काढून उतरवण्यात आले. बँकेत मराठी मातृ भाषा लवकर बदला. आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार मराठी नाही दिसेल तर मनसे स्टाईल दाखवणार . बँक मॅनेजरला मनसे कडून इशारा.
भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलाय. ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा दावा त्यांनी केला असून खोक्या प्रकरणावरुन मला व्हिलन ठरवण्याचा प्रय़त्न झाला” असं ते म्हणाले. खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं असं बिश्नोई समाजातील लोकांना सांगण्यात आलं होतं.बिश्नोई समाजातील लोकांमध्ये मला व्हिलन ठरवण्याचा प्रय़त्न झाल्याचा सुरश धस यांचा गंभीर आरोप.
मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार. मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतोय. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार. याप्रती पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात येणार.
उल्हासनगरच्या कॅम्प मधील गांधी रोडवर हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या ग्रीलमध्ये सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे दोन लहानगे बसलेले होते. याच वेळी ग्रील तुटून खाली कोसळली. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला. मात्र त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीलाही किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
नाशिक शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण. हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला तीन दिवसांचा दिला आहे येल्लो अलर्ट. नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात येणार. गारपिटीसह कडकडाटी पावसाचा दिला आहे इशारा
ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक. बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य मनसेची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी नव वर्षाच्या गुढीपाडवा निमित्त बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत असे सांगितल्यावर मनसे अलर्ट मोड मध्ये. बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा... असा कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दिला होता. बँक मध्ये मनसे नेते अविनाश जाधव व कार्यकर्ते आले आहेत.
चिपळूण मध्ये रात्री अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले, तर आंबा बागायतदार चिंतेत. रात्री बाराच्या सुमारास अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग. चिपळूण सह ग्रामीण भागात देखील पावसाने झोडपले.
संस्था आणि वनविभाग यांच्यामार्फत कोल्ह्याला पकडण्यात आलं. मंगळवारी सकाळी 6 वाजता कोल्हा आढळल्यामुळे नागरिकांची तारांबळ. जखमी अवस्थेत आढळल्याने पुढील औषध उपचार सुरू. मुंबईत गोल्डन जॅकल अर्थात सोनेरी कोल्ह्याची संख्या तुलनेने कमी आहे. . कांदळवन तसंच शहराच्या उत्तरेकडे हा प्राणी काही प्रमाणात आढळतो आहे. या प्राण्यावर अद्याप सर्वेक्षण झालेलं नाही.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या अक्षय शिंदे, गणेश गायकवाड यांच्यावर महसूल विभागाचे पथकाने कारवाई करताना वाळू चोरी करणाऱ्यांना वाहनासह पळवून लावल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणाने पोलिसांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस स्टेशनमध्ये शंभूराजे जगताप,अक्षय शिंदे गणेश गायकवाड इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यात पाणीटंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय.गावा-गावात दिसणारी पाणीटंचाई आता आता जंगल आणि माळरानावर देखील जाणवत असल्याचं चित्र समोर आलंय.रात्री अपरात्री पिण्याच्या थेंबभर घोटासाठी हरणांची देखील भटकंती होत असल्याचं जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील जानेफळ शिवारात दिसून आलंय.सध्या जालन्यातील माळरानं पाण्याअभावी कोरडे झालेत.सध्या जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा पाहायला मिळतोय.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून हरणांच्या कळपासाठी दिवसा लोडशेडींग असतानाही रात्रीच्या वेळी पाण्याची व्यवस्था केली जातीय.हरणांना पिता येईल अशा फायबरची भांडी पाण्याने भरून ठेवली जातायत. शेतकऱ्यांच्या या उपक्रमामुळे वन्य जीवांना चांगलाच आधार मिळतोय.
धाराशिव -कळंब मध्ये एका सोसायटीमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या मनीषा बिडवे या महिलेचा खून झाल्याचं उघड झाल आहे .याप्रकरणी कळंब पोलिसात दोघाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी उस्मान सय्यद याला कळंब पोलिसांनी काल रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून रामेश्वर भोसले हा फरार आहे हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज शहरातील आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला गेला असल्याचा आरोप होत आहे. 28 मार्च रोजी कळंब शहरातील एका नामवंत कॉलनीमध्ये मनीषा बिडवे हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती तर आता या महिलेचा खून झाल्या असल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुख प्रकरणात या महिलेचा संबंध होता का हे आता तपासात उघड होण्याची शक्यता आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह बहुतांश उपनगरांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती आणि देखभालीसाठी महापालिकेने निर्णय घेतलाय. दरम्यान पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासकीय सुट्टी असताना मंत्रालयात कक्षाधिकारी ते सचिवस्तरापर्यंचे अधिकारी ठाण मांडून होते. सोमवारी शेवटच्या दिवशी शासनाच्या विविध विभागंचे 177 पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले असून हे सर्व निधी वितरणाचे आहेत. 26 मार्च रोजी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. तीन आठवड्यांच्या अधिवेशनानंतर लागलीच वित्त विभागाने मंजूर केलेल्या निधी वितरणाची धांदल सुरू झाली.
सोलापुरात आज दिवसभरात पावसाची शक्यता तर बुधवारी देण्यात आला यलो अलर्ट. रोज होणाऱ्या उकाड्यापासून सोलापूरकरांना मिळणार दिलासा. होळी संपल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने लावली होती हजेरी. बुधवारच्या दिवशी जोराचा वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी मात्र चिंतेत.
रायगड जिल्ह्याच्या काही भागात रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. माणगाव आणि अलिबाग तालुक्याच्या काही भागात पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात कालपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हवेत उष्मा वाढला असून सकाळ पासूनच उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे.
आर्थिक वर्ष संपण्याच्या आजच्या शेवटच्या एका दिवसातील काही तासांमध्ये तब्बल 183 जीआर प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी व अनुदान वितरित करण्यात आला. राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या विविध योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील सरकारी कंत्राटदारांच्या तोंडाला महायुती सरकारने पाने पुसली आहेत. कंत्राटदारांच्या 54 हजार कोटी रुपयांच्या थकीत बिलापैकी फक्त 742 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे कंत्राटदार संतप्त झाले असून राज्यातील विकासकामे उद्यापासून ठप्प होणार आहेत.
राज ठाकरे यांनी दिलेला सूचनेनुसार आजपासूनच मनसे मोहीम हातात घेणार असून बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केले जात आहे का? नाही याची तपासणी करणार आहे. तसेच वेळ पडल्यास खळ-खट्याक देखील करण्यात येणार असल्याचं मनसेतून स्पष्ट करण्यात आला आहे.
मुंबईतील हवा महिन्या दीड महिन्याहून अधिक काळ सुधारलेली राहील, अशी स्थिती सध्या दिसून येत नाही. मुंबईचा हवा निर्देशांक मध्यम स्थरावर गेला तरी शहरातील काही परिसरात मात्र हवा निर्देशांक कायम ढासळत राहतो. सोमवारी (ता. ३१) शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 133 म्हणजे असमाधानकारक स्थितीत होता. वांद्रे येथे प्रदूषणाची पातळी 300 या वाईट स्थितीत होती.
पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली. मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होतोय. वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईत IMDच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात मनसेचे खळखट्याक आंदोलन सुरू. मराठी भाषा आणि दुकानातला मराठीत नावे द्या हा विषय असणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष खूप खास असणार आहे. सरकारची युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) १ एप्रिलपासून लागू होणार आहे. ही योजना लागू झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांत मिळणाऱ्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम खात्रीशीर पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे.
एप्रिलपासून, भारतात अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदल लागू होतील ज्याचा परिणाम करदाते, यूपीआय वापरकर्ते, क्रेडिट कार्ड धारकांवर होईल. आयकर सवलत आजपासून लागू होणार आहे, वापरात नसलेली UPI ID बंद होणार, पॅन-आधार लिंक नसलेल्या कोणालाही 1 एप्रिलपासून लाभांश पेमेंट मिळणार नाही, म्युच्युअल फंड-डीमॅट खात्यांसाठी नवीन नियम, हॉटेल्स, रेस्टॉरंट सेवांवर 18% जीएसटी, 1 एप्रिल 2025 पासून खात्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक, 50हजार रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व-नोंदणी तपशील द्यावा लागेल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.