Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि कला क्षेत्रापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत नेमकं काय घडतंय? आजच्या दिवसभरात कोणती घटने ठरणार लक्षवेधी? पाहा बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर...
- सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी व्हीआयपी ट्रीटमेंट
- बीड जिल्हा कारागृहबाहेरचा व्हिडिओ व्हायरल
- पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्याचा जेवणावर ताव
- पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी रंगवला गप्पांचा फड
- खोक्याला सुनावण्यात आली आहे न्यायालयीन कोठडी
शिवसेनेची एक स्पेशल टीम तामिळनाडूला रवाना
कुणाला कामराच्या शोधासाठी गेली तामिळनाडूत
पोलिसांप्रमाणे शिवसैनिक ही घेणार कुणालचा शोध....
द हॅबीटॅट स्टुडीओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई
मुख्य बांधकामाला लागुन उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले
मुंबई महापालिका प्रशासनाची कारवाई
साता-याच्या खंडाळ्यात 183 डुकरं चोरणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. आरोपींकडून पोलिसांनी 17 लाखांच्या तीन पिकअप व्हॅन जप्त केल्यात.
साता-यात प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रेयसीनं आपली आई आणि इतरांच्या मदतीनं योगेश पवार या तरुणाची हत्या केली आहे. पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे योगेशची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपी प्रेयसी, तिची आई आणि इतर साथिदारांना अटक केली.
साता-यातील साखरवाडीमध्ये आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे. साखरवाडीमध्ये बौद्ध विहारला जागा मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं आहे. तसेच याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. कारण वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संभाजीराजेंच्या या मागणीवरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
चंद्रपूर एमआयडीसी ऑइल रिसायकल करणाऱ्या कंपनी गोदामाला भीषण आग लागली आहे. बारा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लकी ऑइल या कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे लगतच्या प्लास्टिक बॉटल तयार करणाऱ्या कारखान्याला झळ पोहोचली आहे.
बीड ब्रेकिंग: सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्या प्रकरणात खोक्या चकलांबा पोलिसांच्या ताब्यात होता
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते
यादरम्यान शिरूर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे
विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आला आहे. कुणाल कामरा प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ निर्माण झाला आहे.
'कुणाल कामराची भूमिका योग्य. जे चोरी करतात ते गद्दारच. त्याने लोकांची भावना मांडली. सत्य बोलणे स्वातंत्र्यावरील हल्ला होऊ शकत नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्ट प्रतिक्रिया.
मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजुला अघोरी विद्येचा प्रकार. न्यायालयाच्या बाजुलाच केली आहे अघोरी पूजा. नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या हळदी कुंकू लावून पुजण्यात आल्या आहेत.
साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन भूसंपादन करा. नाशिकच्या साधू महंतांची बैठकीत मागणी. नाशिक महानगर पालिकेत मनपा आयुक्तांसोबत साधू महंतांची सुरू आहे बैठक. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतांना संपूर्ण मोबदला द्या. त्यांना दुःख देऊन आम्हाला कुंभमेळा करण्यात आनंद नाही. 500 ते 700 एकर जमीन साधुग्रामला हवी, साधू महंतांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांची मागणी. यापूर्वी मनपाने केलेल्या भूसंपादनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा मुद्दाही चर्चेत.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न केंद्र सरकारने पुरस्कार द्यावा,अशी मागणी करणारा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी मांडला.
कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत वादंग. कामराला तातडीनं अटक व्हायला हवी. कामराचा बोलवता धनी शोधून काढला पाहिजे. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत, अर्जुन खोतकर यांची विधानसभेत मागणी.
'अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या वर कोणालाही काही बोलण्याचा अधिकार नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून गाणे बनवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नाही. आमच्या नेत्यावर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्यावर जे प्रेम आहे ते कोणी व्यक्त केले असेल. हा कामरा कोणासोबत बसला आहे काय सुरू आहे हे पहिले असेल. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना असे वक्तव्य करायला नको होते. असे वर्तन करण्यासातगी जे मागे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे', अशा शब्दांत उदय सामंत यांनी कुणाल कामरा प्रकरणी प्रतिक्रिया दिली.
शिंदे साहेबावर टीका करणे यामुळे शिवसैनिक दुखावणारच, असं म्हणत कलाकाराचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या नेत्यावर टीका करत असतील तर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्या सोबत आम्ही आहोत असं म्हणत ही गोष्टी 100 टक्के प्लांट आहे अशी टीका त्यांनी केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षेचे विचित्र वेळापत्रक विद्यापीठाने घोषित केले आहे. एकाच दिवशी ,एकाच सत्रात सलग दोन वेगवेगळ्या विषयांच्या पेपर ची परीक्षा घोषित केल्या आहेत. म्हणजे सकाळी मराठीचा पेपर असेल तर अवघ्या पंधरा मिनिटानंतर भौतिकशास्त्राच्या पेपरची परीक्षा आहे. हे दोन्ही पेपर वेगळे वेगवेगळ्या विषयांचे आहेत.कहर म्हणजे या पेपरमध्ये केवळ पंधरा मिनिटांची विश्रांती आहे. विद्यापीठाच्या या तुघलकी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पूर्वी विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा एक महिनाभर चालायच्या. यंदा मात्र या परीक्षा आठ दिवसात उरकण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. विज्ञान शाखेच्या परीक्षा तर केवळ तीनच दिवसात संपणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर याचा दुष्परिणाम होणार आहे. विद्यापीठाचा हा प्रकार म्हणजे परीक्षा उरकिण्याचा घाट आहे अशी टीका होते.
कामराला हे ठाऊक हवं की महाराष्ट्राच्या जनतेनं कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे दाखवून दिलंय. बाळासाहेबांची विरासत गेली हे जनतेनं ठरवलं. खालच्या दर्जाचा विनोद करत माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्याविषयी असा विनोद करणं अयोग्य. कामरा यांनी माफी मागावी. जे संविधान दाखवता त्यातच स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही असं म्हटलंय असं म्हणत कुणार कामरानं माफी मागावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
किल्ले रायगड वरील श्वानाची समाधी हटवण्याची युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा पाठिंबा. रायगड किल्ल्यातील वाघ्या कुत्र्याची समाधी या पूर्वी संभाजी ब्रिगेडने हटवली होती. पण शासकीय दबाव टाकून पुन्हा ती बसवली असा आरोपही खेडेकर यांनी केला आहे. 'प्रशांत कोरटकर याला सरकार पाठीशी घालत आहे हे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील शांततेचे वातावरण गढूळ केले जात आहे' असा आरोपही त्यांनी महायुतीवर केला.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, यासंदर्भातील शासकीय ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला जाणार असून, त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार केली होती.
कुणाल कामरा प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया. 'कायदा, संविधान, मर्यादेच्या पुढे कोणीच जाऊ नये. वैचारिक वक्तव्य असू शकतात. विचारधारा वेगळी असू शकते. पण ते मांडताना आणि चर्चा होताना त्यातून नवा प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं नवं काम निर्माण होणार नाही याचीही खबरदारी प्रत्येक जबाबदार नागरिकानं घेतली पाहिजे', असं अजित पवार म्हणाले.
नागपूर घटनेतील आरोपीचं घर आज पाडलं जाण्याची शक्यता. आरोपी फहीम खान, शमीम खानच्या संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलंय. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली असून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. फहीम खानविरोधात देशद्रोहाचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो कोठडीत आहे. फहीम खानबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असताना , त्याच्या घरात बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्याच्या दोन मजली घराबाबत महानगरपालिकेने त्याला तात्काळ नोटीस बजावलीय.
मुंबईत 13 मजली इमारतीला आग. एकाचा मृत्यू. विद्याविहार येथील इमारतीला आग. विद्याविहारला तक्षशिला सोसायटीत आग. आगीत जळून एकाचा मृत्यू, आणखी एक गंभीर जखमी. इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणले. 15 ते 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. आगीमध्ये मृत्यू झालेला सिक्युरिटी गार्ड असून दुसरा जखमी असलेला इसमही सिक्युरिटी गार्ड आहे. सोमवारी सकाळी 4:30 वाजता आगीची घडली आगीची घटना.
संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मुलाची भेट घेत आमिर खानने केले दोन्ही मुलांचे सांत्वन. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमिर खान यांनी धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.
हवामान खात्याला पावसाचा अंदाज घेताना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यात अंदाज चुकण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईत चार एक्स बँड रडार बसवले असून १३९ स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली आहे. त्यामुळे अतिवृष्टीची माहिती ५ ते ६ तास आधीच मिळणार असून संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार आहे. केरळ राज्यातील वायनाडमध्ये घडलेल्या पूर दुर्घटनेपासून धडा घेत केंद्र सरकारने मुंबईत हवामान खात्याची प्रणाली भक्कम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शहरात मागील काही वर्षांत अनेकदा अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. त्या पावसाबाबत अंदाज वर्तवण्यात हवामान खाते असमर्थ ठरले होते.
आतापर्यंत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील केवळ 11 टक्केच सायबर गुन्हेगारांना अटक झाली असल्याची माहिती शासकीय संकेतस्थळावरून समोर आली. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी तब्बल 7643 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक लूट पुणेकरांची केली आहे. पुण्यात सहा हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तर मुंबईत 888 कोटी 29 लाखांची फसवणूक झाली. ठाणे शहरात 174 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली
उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सासरच्यांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे. वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं. मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पकडलेल्या अवैध दारू नष्ट केलीय. भोर पोलीस स्टेशन कडून अडीच लाख रुपयांची अवैध देशी विदेशी दारू न्यायालयाच्या परवानगी नंतर नष्ट केली आहे. दोन लाख एकोनपन्नास हजार सातशे पस्तीस रुपये ची अवैध दारू भोर पोलीसांकडून नष्ट. अनेक वर्षा पासून हा मुद्देमाल पोलीस स्टेशन मधे पडून होता ..भोर पोलीस स्टेशनने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत न्यायालयाची परवानगी घेऊन मोठ्या खड्ड्यात ओतून नष्ट ही दारू नष्ट केली.
सोने आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या तीन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. सध्या प्रतितोळे सोन्याचा दर 91 हजार रुपये, तर चांदीचा दर एक लाख दोन हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. 14.34% सोने दरांत तीन महिन्यांत वाढ 1 जानेवारीला प्रतितोळा सोन्याचा दर 73 हजार 390 रुपये होता, तर 21 मार्चपर्यंत तो 90 हजार 840 रु. पोहोचला. म्हणजेच तीन महिन्यांत दरांत 11 हजार 450 रुपयांची (14.34 टक्के) वाढ नोंदवली गेली. चांदीचा प्रतिकिलो दरही एक लाख दोन हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय बँकांकडून करण्यात येत असलेली सोन्याची खरेदी आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरांत वाढ होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता 'स्मार्ट तिकीट खिडकी' उघडण्यात आली असून खिडक्यांवर ऑनलाइन पद्धतीने पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी रेल्वे स्थानकांवर रोख आणि ऑनलाइन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच तिकीट खिडकी असल्याने ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभे राहावे लागत होते. यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा वेळ वाचावा आणि अधिकाधिक व्यवहार कॅशलेस व्हावे, यासाठी वेगळी स्मार्ट तिकीट खिडकी सुरू केली आहे.
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 502 घरांच्या सोडतीची अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे. या प्रक्रियेनुसार सोडतीतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 502 घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ 1025 अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहिर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या 1025 अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कुणाल कामरा प्रकरणी शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी एक X पोस्ट करत आपली भूमिका मांडली आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'कुणाल कामरा एक प्रख्यात लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन असून, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी एक व्यंगात्मक गीत लिहिलं तर, शिंदे गटाला मिरच्या झोंबल्या. त्यांनी कुणाल कामराचा स्टुड्ओ तोडला. देवेंद्रजी... तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात....', अशी पोस्ट राऊतांनी केली.
राज्यात राबविण्यात आलेल्या ‘100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम’अंतर्गत 40 हजार 471 क्षयरुग्ण सापडले. क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
एका कार्यक्रमात कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर, युवा सेनेच्या (शिवसेनेची युवा शाखा) सदस्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात निदर्शने केली आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्याबाहेर त्याचे फोटो जाळले.
भारतीय लष्कराच्या फोर्स आणि पूंछ पोलिसांनी पूंछमधील सुरणकोट येथील सांगला या सामान्य भागात संशयास्पद हालचालींना प्रतिसाद म्हणून संयुक्त कारवाई सुरू केली. भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोध मोहिमेत शस्त्रे, दारूगोळा, आयईडी आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या शोध मोहिमेमुळे राजौरी आणि पूंछ परिसरात एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात आला आणि दहशतवाद्यांच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये अडथळा निर्माण झाला.
जम्मू काश्मीर जिल्ह्यातील श्रीनगर- सोनमर्ग मार्गावर रविवारी बस आणि टॅक्सी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. मृतकांमध्ये महाराष्ट्रातील तीन पर्यटक आणि एका स्थानिक चालकाचा समावेश आहे. श्रीनगर-सोनमर्ग मार्गावरील गुंड येथे झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लेसिया आशीष, निक्की आशीष आणि हेतल आशीष अशी मृतकांची नावे असून हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे तसेच या अपघातात स्थानिक चालक फहीम अहमद याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दुःख व्यक्त केले आहे
अमेरिकेच्या वर्जिनियात एका दुकानात भारतीय वंशाच्या व्यक्तीची आणि त्याच्या २४ वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. भारतीय वंशाचे प्रदीप कुमार पटेल (५६) आणि त्यांची मुलगी प्रांतातील अकोमॅक काउंटीमधील लँकफोर्ड हायवेवर असलेल्या दुकानात काम करत होते. त्यावेळी गोळीबार झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.