Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. राज्यातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेऊया.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं.. या मेळाव्याला बाळासाहेब थोरातांसह कांचन थोरात, माजी आमदार सुधीर तांबे आदींची उपस्थिती होती.. यावेळी विधानसभेतील पराभवाचा धक्का बसला होता हे मान्य करावं लागणार असल्याचं थोरातांनी म्हटलंय.. तुमच्या सगळ्यांवर माझा विश्वास होता पण नेमंक काय घडलं हे आजही समजत नसल्याचं ही त्यांनी म्हटलंय..
क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अंपायरने आऊट दिल्यावर थर्ड अंपायर असतो..गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निर्णय बदलले असते.. कदाचित निकाल वेगळे दिसले असते..असं वक्तव्य राज ठाकरेंनी रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात केलंय..
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी परवावर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काल गिरीष महाजन ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे, गिरीष महाजन आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. गिरीष महाजन महत्त्वाचा राजकीय संदेश घेऊन वर्षावर गेले होते अशी माहिती मिळतेय.
महायुतीत ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदं असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येतंय. पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाल असल्यानं शिवसेनेऐवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीनं मागितलीयेत. या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झालीये. शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं नवा फॉर्म्युला आणल्यानं शिवसेना नाराज झालीये.
शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणविसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलीये... तसेच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणविसांसारख्या जबाबदार नेत्याकडेच दिलं जावं, शिवसेनेने आग्रह करु नये असही खोत यांनी म्हटलंय..
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडणार आहे.. हा शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.. सोहळा लोकोत्सवाच्या स्वरुपात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे..
शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण येणार?
- उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांना प्रशासकिय निमंत्रण
- सर्व माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण जाणार
- केंद्रातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी
- मराठी कलाकार
- मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती
- अंबानींसह सर्व बडे उद्योगपती
- सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत
- 100 हून अधिक संत-महंत
- बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार
- 10 हजार लाडक्या बहिणी
- अजय-अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
- 'जो राम को लाये है हम उनको लायेंगे' या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तल
भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असल्याचं विधान शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय.. उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय..
आगरामधील ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे पर्यटन विभागाला मिळाली आहे. या ईमेलनंतर ताजमहालची त्वरित सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजमहालच्या तपासासाठी बॉम्ब निकामी पथक आणि इतर पथके दाखल झाली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे .
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये चेक झाल्यानंतर एकनाथ शिंदे तिथून निघून थेट वर्षा बंगल्यावर आले आहेत.
खातेवाटपासंदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते मिळून घेतली. महायुतीमधील समन्वय खूप चांगले आहे. शपथविधीची तयारी खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, आमदार प्रसाद लाड यांनी माहिती दिलीय. उद्धव ठाकरेंना शपथविधीचं आमंत्रण दिलं जाणार आहे. येणं न येणं मात्र हे त्यांच्या हातात आहे, असही प्रसाद लाड यांनी सांगितलं.
'मी चेकसाठी ज्युपिटर हॉस्पिटलला आलो होता. माझी प्रकृती उत्तम', असल्याच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ज्युपिटर हॉस्पिटलमधून बाहेर पडताच त्यांनी पत्रकारांना आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर गाडीत बसून ते वर्षा बंगल्याकडे रवाना झाले.
मुंबईतील वांद्रे भागात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीय. अद्यापही बीएमसीची यंत्रणा घटनास्थळी आली नसल्याने पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील वांगी गावच्या युवक व ज्येष्ठ नागरिकांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केला आहे
एकनाथ शिंदे यांना यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नसल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तापामुळं अशक्तपणा आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पांढऱ्या पेशी कमी होत असल्याने उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येतंय.
5 डिसेंबरला मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा आझाद मैदानात पार पडणार आहे. प्रशासनाच्या वतीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुद्धा आझाद मैदानात करण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे केंद्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास ८५० ट्रक कांद्याची आवक
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. सत्तास्थापनेत विलंबामुळं राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची माहिती आहे. शिवसेना अडली असेल तर सेना वगळून शपथविधी करा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे..मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली असून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची केली नियुक्ती केली आहे.
अजित पवार हे दिल्लीत पोहोचले आहेत. पवार दिल्लीत असताना अनेक आमदार देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघाचे आमदार किरण लहामटे प्रफुल पटेल यांच्या भेटीला गेले आहेत.
सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांनी दीर्घ आजाराने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ते 76 वर्षांचे होते
मुख्यमंत्री दोन दिवस ते आजारी आहेत. संभ्रम निर्माण केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आधी सांगितल होते वरती, जे निर्णय होतील ते आम्हाला मान्य आहे. आमची इच्छा आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणूका पाहता त्यांना मुख्यमंत्री पद द्यावे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
आज संध्याकाळी अजित पवार केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि राज्यात जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावे ही मागणी करणार. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह चंदिगढ दौऱ्यावर असल्याने आज संध्याकाळी चर्चा भेट होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात असलेल्या मार्करवाडी या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील ही प्रक्रिया पार पडावी यासाठी गेल्या दोन दिवसापासून मार्करवाडी मध्ये तळ ठोकून होते. पण प्रशासनाने बॅलेट पेपरवर एक जरी मतदान झाले तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्याचबरोबर सर्व मतदान साहित्य जप्त करू असा इशारा दिला. यानंतर आमदार उत्तम जानकर आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बॅलेट पेपर वरची मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता जरी थांबलो असलो तरी वेगवेगळ्या मार्गाने न्याय मागणार असून एका पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे घोटाळा झाला आहे हे मी जनतेसमोर उघड करणार आहे असा दावा देखील केला आहे
या देशातील विरोधी पक्ष संपवण्याच काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याच काम दिल्लीतील महाशक्ती करत आहे का अशी शंका मला आहे. हा भाजपचा अंतर्गत खेळ आहे.
Maharashtra Breaking News Live Updates : पंढरपुरातील मारकडवाडीत मतदानाची प्रक्रिया थांबवली
पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात आज बॅलेटपेपरवर मतदान होणार आहे... प्रशासनाच्या विरोधातनंतरही ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. ग्रामस्थांकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आलीय.. गोळ्या घातल्यातरीही मतदान करणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणण आहे.. बॅलेट पेपरवर मतदानावर ग्रामस्थ ठाम असल्यामुळे प्रशासानानं गावात जमावबंदी लागू केलीय.. आजपासून 5 डिसेंबरपर्यंत मारकवाडी गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी असणार आहे.. दरम्यान अजूनही गावात बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालेलं नाहीये... उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आलीय..मात्र मतदान अजूनही सुरू झालेलं नाहीये.. काही वेळात प्रांताधिकारी, आणि पोलीस उप अधीक्षक गावात दाखल होणार
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवा संदर्भात विचार मंथन करण्यासाठी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. राज्यभर महायुतीच्या विरोधात वातावरण असताना लागलेला निकाल चक्रावून टाकणारा आहे. लाडकी बहीण व भरमसाठ पैसा है महायुतीच्या विजयाचे कारण असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या बैठकीत केला.
Maharashtra Breaking News Live Updates : माळशिरस येथे पोलिसांचे मारकड वाडी येथे जमलेल्या नागरिकांना आवाहन. जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा
महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरला सुरू झाल्यापासून निर्माण झालेला पेच सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांदरम्यान सोमवारी सहमती झाली. संविधान स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेच्या तारखा जाहीर करून तसे संकेत देण्यात आले.
आझाद मैदानात शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी राज्यातील प्रमुख नेत्यांना दिले जाणार महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार. राज्यासह देशभराततील प्रमुख नेत्यांसह सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ही निमंत्रण दिली जाणार
Maharashtra Breaking News Live Updates : नवी मुंबईत एका मद्यधुंद व्यक्तीने पोलिसांना फोन करून शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी रविवारी दिली होती. कोपेरखेरने पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला ताब्यात घेऊन समज दिली आहे. नवी मुंबईत बॉम्बस्फोट होणार, ही धमकी नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी 34 वर्षीय आरोपी क्रिस्टोफर अँथनी डायसच्या विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे रविवारी पहाटे पाच वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपास सुरू करण्यात आला. मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीची ओळख पटली, तो कोपरखैरणे परिसरातील रहिवासी होता.
Maharashtra Breaking News Live Updates : पुण्यातील कात्रज चौक आज पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुणे सातारा महामार्ग मध्ये कात्रज चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून उड्डाण पुलाच्या कामासाठी कात्रज चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली
Maharashtra Breaking News Live Updates : माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघात मारकडवाडी गावात आज राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचे समर्थक आपले मतदान शोधण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया राबवणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत या गावातून जानकर यांना चांगलं मतदान होत होतं मात्र या विधानसभा निवडणुकीत मते कमी कशी मिळाली ईव्हीएम वर संशय व्यक्त करत त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.