Maharashtra Breaking News Today 06 June 2025 LIVE Updates: रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्याबरोबरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर दौऱ्याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ब्लॉगमधून संक्षिप्त स्वरुपात घेऊ शकता.
Bengaluru Stampede: बंगळुरमध्ये विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल; सोशल मीडियावर #ArrestViratKohli ट्रेंड, पोलीस म्हणाले 'त्याला आता..'https://t.co/9r14HvbXhk#BengaluruStampede #Bengaluru #bangalorestampede #ViratKohli #RCB #RoyalChallengersBangalore
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी डीनो मोर्याच्या घरी चौकशी संपली. चौकशी संपल्यानंतर अधिकारी डिनो मोर्या याच्या घरून निघाले आहेत. जवळपास 14 तासांपासून ईडीची चौकशी सुरु होती. आज सकाळी 7 वाजता ईडीच्या पथकाने वांद्रे येथील डिनो मोर्याच्या घरी धाड टाकली होती. ईडी मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी चौकशी केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक चिनाब पूल, अंजी पूल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचं उद्घाटन केलं. तसेच काश्मीरला जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, या कार्यक्रमावेळी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील कटार येथे बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “अनेक लोकांनी काश्मीरमध्ये रेल्वे आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ब्रिटिशांनीही काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पाहिले होते पण ते अयशस्वी झाले. झेलम नदीच्या काठावर असलेल्या उरी येथून जम्मू आणि काश्मीरला रेल्वेच्या माध्यमातून देशाशी जोडण्याची त्यांची योजना होती. ब्रिटिश जे साध्य करू शकले नाहीत ते तुमच्या (मोदी) हातून घडले आणि काश्मीर देशाच्या इतर भागाशी जोडले गेले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल जिंकल्यानंतर त्यांच्या विजय उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि काही महत्त्वाच्या पोलीस अधिकार्यांना निलंबित केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक सरकारने राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांना पदावरून हटवले आहे. इतकेच नाही तर राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुखे हेमंत निंबाळकर यांची बदली करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट
आतापर्यंत कोरोनाचे 3 रुग्णाचा मृत्यू
केडीएमसी क्षेत्रात एकूण 18 रुग्ण
कोरोना 3 रुग्णांवर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार उपचार सुरु
हॉस्पिटलमधून 7 रुग्णांना डीचार्ज
गृह विलगीकरण..5 रुग्ण (प्रकृती स्थिर)
70 वर्षं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 90 वर्षीय जोडप्याचा मोठा निर्णय! संपूर्ण गावात एकच चर्चाhttps://t.co/ULGCSb3oDs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
'उद्धव ठाकरेंची फसवूणक होत आहे', मनसेकडून मोठा दावा, म्हणाले 'त्यांना बरं वाटावं म्हणून...'https://t.co/Y2VlGl26Hh#maharashtra #MaharashtraPolitics #maharashtranews #uddhavthackeray #shivsena #mns #RajThackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
सिंधू पाणी करार स्थगित झाल्याबद्दल पाकिस्तान चिंतेत आहे. पाकिस्तानने भारत सरकारला पत्र लिहिले आहे. भारताने पुनर्विचार करावा अशी पाकिस्तान वारंवार विनंती करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून या महिन्यात पुन्हा पूर्ण वेतन देण्याइतका निधी सरकार कडून आलेला नाही. त्या मुळे त्यामुळे केवळ नक्त वेतन मिळणार आहे.
महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकार कडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे. व ती कधीच पूर्ण येत नसल्याने पूर्ण वेतन देण्यात अडचणी वेतन निर्माण होत असून पी.एफ., ग्र्याजुटी, बँक कर्ज, एल.आय. सी., अशी ही साधारण ३५०० कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या त्या संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली नाहीत. कर्मचाऱ्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम ही सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली असून संचित तोटा दहा हजार कोटी रुपयांच्यावर गेला आहे.त्या मुळे एसटी प्रशासन हतबल झाले आहे.या महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी यासाठी शासनाकडे एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची मागणी करण्यात आली होती पण त्यातील केवळ ३७४ कोटी ९ लाख रुपये इतका निधी सरकारकडून देण्यात आला आहे. ८७ हजार कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी ३७७ कोटी रुपये इतकी रक्कम लागते तर पूर्ण वेतन देण्यासाठी ४६० कोटी रुपये इतकी रक्कम लागते. पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या महिन्यातही नक्त वेतन देण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढवली आहे.
30 जानेवारीला शिंदे गटात प्रवेश केला होता. पण ती माझी चूक होती. खरी शिवसेना हीच आहे. मी काही त्यांची मिंदी नाहीये. 10 व्या वर्षापासून सेनेत आहे. कोणत्या आमिषाला लोक बळी पडतात माहित नाही, असं सुताजा शिंगाडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या सेनेत त्यांनी प्रवेश केला.
... तर मास्क लावाच! डॉक्टरांचा मुंबईकरांना सल्ला; देशातील सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ https://t.co/RYPL8RRZIZ
सावधान! कोरोना वाढतोय.... माक्स नेमका कोणी लावावा? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं. #news #corona #mumbai #india— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
ठाकरे ब्रँड टीकला पाहिजे ही मनसे पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचं मनसेच्या बैठकीनंतर समोर आलं आहे. दोन ठाकरे बंधू यांनी एकत्र आले पाहिजे असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अंतर्गत विरोधाचा मोठा फटका बसला. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षांनी पुढाकार घेतला आहे. येत्या काही आठवड्यात काँग्रेस नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर टाकला छापा.
https://t.co/H0KIj90Nz5
'मी नसतो तर निवडणूकही जिंकले नसते...' म्हणत मस्क यांनी करून दिली उपकारांची जाणीव; नव्या राजकीय पक्षाची स्थापना लवकरच? नेमकं कुठं आणि कसं बिनसलं हे मैत्रीपूर्ण नातं? #news #USA #Elonmusk #Donaltrump #America— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
विशाळगडावरील उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. एस. आर.पी.ची तुकडी विशाळगडावर तैनात करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विशाळगडावर कोणत्याही सणाला परवानगी नाही. कुर्बानीच्या परवानगीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासनाचीही कोर्टात धाव हिंदुत्वादी संघटनांनी उरुस साजरा झाला तर उधळून लावण्याचा दिला होता इशारा.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक नवीन शुल्क या वर्षाच्या उत्तरार्धात देशाला मंदीच्या खाईत ढकलू शकते, असा इशारा एलोन मस्क यांनी दिला. अमेरिकन सरकारच्या नवीन विधेयक ‘वन बिग ब्युटीफुल बिल’वरून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. दोघेही त्याबद्दल वेगवेगळे दावे करत असून या दरम्यान, एलन मस्क यांना 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. भारतीय चलनानुसार हे नुकसान 12,88,069 कोटी रुपयांचं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्यातील सार्वजनिक वादाचा वॉल स्ट्रीटवर, विशेषतः मस्कच्या मालकीच्या ऑटोमोबाईल कंपनी टेस्लावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सचे मूल्य 14% कोसळले आणि मस्क यांना एकूण 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. ट्रम्प आणि मस्क यांच्या सार्वजनिक वादात अडकल्यानंतर टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! लोनचा EMI कमी होणार; RBI कडून सलग तिसऱ्यांदा दिलासाhttps://t.co/dfcVIJmqY7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
किल्ले रायगड बरोबरच कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. नवीन राजवडामधील दरबार हॉलमध्ये हा शिवकालीन शिवराज्याभिषेकाची आठवण करून देणारा शाही सोहळा संप्पन होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. या सोहळ्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, याज्ञसेनीराजे छ्त्रपती, मालोजी राजे छत्रपती, मधुरिमा राजा छत्रपती उपस्थित होते. किल्ले रायगडवर संभाजी राजे छत्रपती यांच्या वतीने तर कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Mumbai Local: कितीही मुसळधार पाऊस झाला तरी लोकल अजिबात रखडणार नाही; रेल्वे प्रशासनाचा जबरदस्त प्लान https://t.co/GHn2worVqr
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2025
मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा: आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या कथित चौकशीसाठी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. मिठी नदीतील घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) शुक्रवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चालू चौकशीचा हा एक भाग आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर 10 कोटींहून अधिक सायबर हल्ले झाल्याची माहिती पंतप्रधानांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे हल्ले प्रामुख्याने सरकारी वेबसाइट्स, बँकिंग सिस्टम्स आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष्यित होते. सायबर सुरक्षा यंत्रणांनी यापैकी बहुतांश हल्ले यशस्वीपणे परतवून लावले असले, तरी सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. या संदर्भात सरकार सायबर सुरक्षा धोरण मजबूत करण्यावर भर देत आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येतो की नाही, याचा अभ्यास करण्यास 'आयआयटी रुरकी'ला सांगण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच राज्य सरकार अलमट्टी बाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. जलसपंदा विभागाने या बाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येतो की नाही, या बाबत राज्य सरकारच्या पातळीवरच गोंधळ आहे. वडनेरे समिती एक आणि दोन, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रासह जलसंपदाच्या अनेक अधिकाऱ्यांनी अलमट्टी आणि पुराचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पण, स्थानिक राजकीय नेते अलमट्टीमुळेच पूर येत असल्याचे ठासून सांगत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, असे पत्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगली, कोल्हापुरात आंदोलन करून रान उठवले आहे. तरीही केंद्र सरकारसमोर आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने भूमिका मांडण्यात अडचणी येत आहेत.
ठाणे येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात आज कोकण विभागातील आजी-माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, आजी-माजी आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका बाबत चर्चा होणार आहे. ठाणे येथील वर्तकनगर परिसरात भाजपचे विभागीय कार्यालय आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षांत केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौ-यादरम्यान अंजी पुलाला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते कटरा ते श्रीनगर दरम्यानच्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, ते कटरा येथे 46 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित करतील. -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौ-यावर 'ऑपरेशन सिंदूर'नंतरचा हा पहिला दौरा आहे. या दौ-या दरम्यान पंतप्रधान सकाळी 11 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरील जगातील सर्वोच्च रेल्वे पूल—चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील आणि पुलाच्या डेकला भेट देतील. ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा त्यांचा केंद्रशासित प्रदेशातील पहिला दौरा आहे.
आज आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयचे आज पतधोरण जाहीर होणार आहे. यावेळी 0.50 टक्क्यांनी कमी करु शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँक रिसर्चच्या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. रेपो रेट घटल्यास गृह खरेदीसाठीच्या कर्जाचं व्याज कमी होईल.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सोहळा समितीचे मार्गदर्शन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.