Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पावसाने ब्रेक घेतला असला तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. तसंच, एकीकडे राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीय... तर त्यांचा पगारही बायोमेट्रिक हजेरी वरून काढला जाणारेय.... तसंच वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी आरोग्य केंद्रामध्ये इंटरशिप करणे बंधनकारक आहे.
इंदापूर अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस झालाय..या पावसामुळे सणसर, कुरवली, कळंब आणि शेटफळगढे या गावांच मोठं नुकसान झालं... या नुकसानग्रस्त भागाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधला...तसेच परिस्थितीचा आढावा घेत खासदार सुळेंनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केलीय...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. एक लेख लिहित राहुल गांधींनी हा आरोप केलाय.. आता राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातूनच उत्तर दिलंय.. आणि यावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत...
10 आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम स्थळ बिल्लावा भवन सांताक्रुज झाला आहे.
तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शन रांगेत भक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. लहान मुलाने उलटी केल्याच्या कारणावरून महिला व पुरुषात ही हाणामारी झाली आहे. पंधरा ते वीस मिनिट सुरू होता मंदिराच्या दर्शन रांगेत हा वाद. सिक्युरिटी गार्डच्या मदतीने मिटला वाद. तुळजाभवानी मंदिरात रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी झाली होती गर्दी. दर्शन रांगेतील काही ठिकाणचे फॅन बंद पडल्यामुळे गर्दी व उकाडा सुरू असल्याने भाविकांमध्ये वाद वाढला. प्रशासनाकडून दर्शन रांगेच्या नियोजनात चूक होत असल्याचा भाविकांचा आरोप.
चंद्रपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्या फोनची देखील तपासणी झाली पाहिजे अशी मागणी आता अंजली दमानिया यांनी केली आहे.
'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला#politicalnews #nileshrane #niteshranehttps://t.co/12YubCEgKD
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 8, 2025
भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पालकमंत्री संजय सावकारे देखील उपस्थित होते. मात्र काही विषयांना घेऊन खासदार प्रशांत पडोळे व पालकमंत्री यांच्यात विकास निधीवरून शाब्दिक वाद झाला. खासदार आणि पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची सुरु असताना खासदारांसाठी काम करणा-या मुलानं व्हिडिओ काढल्यानं पालकमंत्री संतापले आणि मुलाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याला सभागृहाबाहेर काढलं. मात्र हा किरकोळ विषय असल्याचं बाहेर आल्यानंतर पालकमंत्री म्हणालते.
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हजारो बाईक घेऊन बच्चू कडू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या ठिकाणी दाखल झाले आहे. मोझरीत अखेर बच्चू कडू यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उद्या या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकत या आंदोलनाला भेट देणार असून पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मात्र आमच्या बलिदानाने मागण्या मान्य होणार असतील तर आम्ही बलिदान द्यायला तयार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार बच्चू कडू यांच्या मागण्या कधीपर्यंत मान्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर, कुरवली, कळंब आणि शेटफळगढे या पूरग्रस्त गावांना भेट दिली आहे. मागील पंधरवड्यापूर्वी झालेल्या अति मुसळधार पावसाने इंदापूर तालुक्यातील या चारही गावात मोठं नुकसान झालं होतं. आज सुप्रिया सुळे यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. परिस्थितीचा आढावा घेत खासदार सुळे यांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका चौकात रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे चारी बाजूचे रस्ते गर्दीने फुल झाले असून एक ते दीड किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. उड्डाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई, पुणे , छत्रपती संभाजीनगर आणि आग्रा हायवे जोडणारा हा मुख्य चौक असून या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे. 19 जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पाच आरोपींना त्याचवेळी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी आणि मयत अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता . अखेर काल मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवास मधील मूर्खंद येथून अटक करण्यात आली आहे . जमिनीच्या तसच इतर वादातून अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ आणि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच अपहरण करून हत्या केली होती. हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीत बोलावलं असता मुख्य आरोपी अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला असून मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र अखेर काल मध्यरात्री अविनाश याच्या मुस्क्या आवळण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं.
श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार? आयपीएलनंतर समोर आली मोठी माहिती sheryasiyer TeamIndia IPL2025Final Cricket SportsNewshttps://t.co/i3VJ2bMJDg
— ZEE २४ तास (zee24taasnews) June 8, 2025
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा साताऱ्यात होणार आहे. यंदा या साहित्य संमेलनाचे 99 वे वर्ष असून तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात साहित्य संमेलनाच आयोजन करण्यात आलं आहे. सातारामधील हे आतापर्यंतचे 4 थे साहित्य संमेलन आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे 99 वे साहित्य संमेलन पार पडेल.
1 ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणारेय. याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणारेय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणारेय.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन द्या यासह विविधी मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश. उद्या ठाण्यात होणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेवर संधी देण्याबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती
Maharashtra Breaking News LIVE Updates: हगवणेंच्या अडचणीत वाढ होणार
बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अडचणीत वाढ झालीये.. उद्या पुणे पोलीस या दोघांचा ताबा घेणारा आहेत.. दोघांना पुणे पोलीस अटक करणार असून मंगळवारी या दोघांना पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे. शशांकवर वारजे तर सुशील याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे करण्यात आलाय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिक शहरातही कोयता गँगची दहशत. पंचवटीत 10-15 जणांच्या टोळक्याचा धुडगूस. टोळक्याकडून पंचवटीत अनेक घरांवर हल्ला.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असताना आता याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येतीये. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज यांच्यात थेट चर्चा झालेली नाहीये. मात्र नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मनपा निवडणुकीपूर्वी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..
पुण्यातील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर समोर; नवऱ्यासोबत वाद, बहिणीच्याच दिरासोबत शारिरीक संबंध अन्... https://t.co/NZ3r0S7VSa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 8, 2025
नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही
lpg गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मोठ्याप्रमाणात गॅस गळती झाली आहे. त्यामुळं बावनदी जवळील घरांना आग लागली असून दोन गाड्या आणि गोठा जळून खाक झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला तब्बल पाच महिन्यानंतर अटक करण्यात आलीये. फरार असलेल्या अविनाश धोडी याला दादरा नगर हवेलीतून अटक केलीये. पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये..
Maharashtra Breaking News LIVE Updates: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याच्या घरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं सरप्राईज व्हिजिट दिली.. आमिर त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाच्या निमित्तानं त्याने घरीच एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित केलं होतं. सचिनला पाहून सिनेमातील सर्व दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला. या पार्टीला सचिन सोबत राज ठाकरे आणि रणबीर कपूरही सहभागी झाले होते.. मात्र सचिनला पाहून या मुलांना सुखद धक्काच बसला आणि सगळ्यांनी एका सुरात 'सचिनss सचिनss' चा जल्लोष केला..
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यातील भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन केलं. यावेळी बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा ही करण्यात आली. या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर झालाय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं डिनो मोरियासह आठ जणांना समन्स बजावले. डिनोला पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी ईडीने 13 आरोपीसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात मुंबई व कोची येथील ठिकाणांचा समावेश आहे.
बुधवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या भौमिकने आपला जीव गमावला आहे.
VIDEO : 'मला पण इथेच राहायचंय'; बंगलुरुतील चेंगराचेंगरीत गमावलेल्या मुलाच्या कबरीवर वडिलांचा आक्रोशhttps://t.co/SgQ5sbPOrd#Bengaluru #BengaluruStampede #Son #Father #died
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 8, 2025
Maharashtra Breaking News LIVE Updates: भारतात आता उरले 5.3 टक्केच गरीब. जागतिक बँकेच्या अहवलात दिलासादायक माहिती
यंदा लवकर दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात दडी मारली असून, उकाड्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा घटला आहे... या धरणांमध्ये 11 टक्के पाणीसाठा असून, तो दहा टक्क्यांखाली घसरल्यास राखीव पाणीसाठ्याला हात घालण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्या आहेत... यासंदर्भात येत्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत मोठी अपडेट, राज्य सरकार घेणार मोठा निर्णयhttps://t.co/g2t5crDux3
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 8, 2025
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा निर्णय घेतलाय. जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी MIDCमध्ये 500 एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर अनिवासी महाराष्ट्रीयन नागरिकांसाठीही धोरणाअतंर्गत 100 एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.जर्मनी येथे पार पडलेल्या "महाराष्ट्र बिजनेस डे" या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली..
Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिकच्या येवल्यातील गवंडगावात वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी 2 घरांचे छत आणि भिंत कोसळल्याने 3 जण जखमी झालेत. तसंच घरांचं आणि गोठ्यांचं ही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत.
पुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे, कंटेनरची डंपरला मागून धडक बसल्यान डंपरचा मागील टायर फुटून डंपर पलटी झाल्याची घटना. पुण्याच्या दिशेने जात असताना भरधाव मालवाहू कंटेनरने, क्रश सॅंडने भरलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने डंपर झाला पलटी
राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण. राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 हजार 362वर मुंबईत सर्वाधिक 640 कोरोना रुग्ण
दिल्ली विमानतळावरून 114 उड्डाणे रद्द. धावपट्टीच्या नुतनीकरण कामासाठी धावपट्टी बंद. 15 जूनपासून 3 महिन्यांसाठी 114 उड्डाणे रद्द.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर कॅनडात पोहोचला होता अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई पोलीस झिशान अख्तरला ताब्यात घेण्याची माहिती वरिष्ठ पातळीवर घेत आहेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन द्या यासह विविधी मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. अमरावती शहरातील गाडगे बाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20 हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी येथे ते सभा घेणार आहेत.. त्यानंतर अन्नत्याग आदोलन सुरु होईल.. त्यामुळे बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का? याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा.. त्यात आम्ही काहीही बोलणार नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मुंबईत निरीक्षक नेमले आहेत... त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे... त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीच्या चर्चे संदर्भात यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन मार्गिका वाढवल्या जाणार. MSRDCलकरच सरकारला प्रस्ताव पाठवणार.
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडलेलीच...आता 15 जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...तर शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.