Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची. तसंच, बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणीही घडामोडींना वेग आला आहे. देशभरासह राज्यभरातील ताज्या घडामोडी जाणून घेऊयात एका क्लिकवर
सांगलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात उन्हाचा तडाखा
नागपुरात आज 44.2 अंश सेल्सिअस तापमान
विदर्भात आठ जिल्ह्यात तापमान 41 अंश पलीकडे
पावसाच्या धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात घामाच्या धारा
बहिणीच्या लग्नाचे पैसे जमवण्याकरिता निघालेल्या भावाचा मुंब्रा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल गुप्ता असे या तरुणाचे नाव असून त्याच्या लहान बहिणीच्या लग्नाचे पैसे जमवण्याकरिता तो निघाला होता. गुप्ता हा दररोज दिवा ते मुंबई असा प्रवास करायचा त्याचबरोबर मुंबईतील एका स्टेशनरीच्या दुकानात तो कामाला असल्याची माहिती देखील मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीच्या पाठी ठाम उभे राहत गुप्ता कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत करणार असल्याच सांगितलं जात आहे. शिंदे गुप्ता कुटुंबातील लहान मुलीच्या मंगल कार्यात करणार सहकार्य असा शब्द देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात घ्या, शिवसेनेची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी!#CBSE #ChhatrapatiShivajiMaharajhttps://t.co/lSvVtz1pOI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
अखेर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...https://t.co/EdJFbJOSS0#MumbaiTrainAccident #MumbaiLocalAccident #MumbaiLocalTrainAccident #trainaccident #Mumbra #Thane #localtrain
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
सात लाखांची लाच मागितल्या प्रकरणी उपायुक्त वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल पकडले. महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागितली होती. दहा लाखांची मागणी करून सात लाखांची रक्कमेवर तडजोड झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराने तक्रार केली होती . तक्रारीमध्ये सात लाखांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं आहे. उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Meghalaya Couple: 'ती सर्व ग्राहकांकडे...', सोनमने जेथून फोन केला 'त्या' ढाबाचालकाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला 'ती थोडी...'https://t.co/I6RZORrYYW#meghalayapolice #MeghalayaTragedy #UttarPradesh #Sonam #SonamRaghuwanshi #SonamRaghuvanshiArrested #rajaraghuvanshi…
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरासह उंबर्डा बाजार परिसरात आज पाऊस पडला.या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.उन्हाच्या तीव्रतेमुळे उकाडा प्रचंड वाढला होता.मात्र आजच्या पावसामुळे वातावरनात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी दिलासा घेतला आहे.खरीप हंगाम तोंडावर असताना आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी जमिनीला ओलावा मिळाल्याने शेती कामांना गती येणार आहे.
Mumbai Local Accident: 'हे सगळं निराशाजनक' म्हणत राज ठाकरेंनी संपवली पत्रकार परिषद, म्हणाले 'उद्धव-राज एकत्र येणार..'https://t.co/oCp4bMP1MS#MumbaiTrainAccident #MumbaiLocalAccident #MumbaiLocalTrainAccident #trainaccident #Mumbra #Thane #localtrain
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
भारतातील असं राज्य जिथे मुले जन्माला घालण्यासाठी पैसे देणार सरकार; कारण जाणून वाटेल आश्चर्य!#BirthRatehttps://t.co/ZZSLJkfdph
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
मुंब्रा येथे सकाळी 9.40 च्या सुमारास रेल्वेमधून 13 लोकं पडले. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अपघाता कसा घडला याबाबत चौकशी पोलिसांकडून सुरू झाली आहे. तसेच दोन्ही ट्रॅकमधील अंतर मोजले जात आहे. अपघात व्हायला नेमकं काय कारणीभूत ठरलं याची चौकशी केली जात आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. यामध्ये 13 जखमी झाले आहेत. विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सुशील हगवणे विरोधात कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्र सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी सुशील हगवणेला ताब्यात घेतलं आहे. आरोपींना उद्या पुणे कोर्टात हजर करणार आहेत. तर वारजे पोलीस हे निलेश चव्हाण आणि शशांक हगवणेला थोड्यात वेळात जेलमधून ताब्यात घेणार त्या दोघांनाही उद्याच कोर्टात हजर केलं जाणार आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्यत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगाना 6 हजार मानधन, आणि इतर 17 मागण्यासाठी बच्चू कडू यांचं हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आज भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकेत आंदोलन स्थळी भेट देणार आहे. दुपारी 2 वाजता राकेश टीकेत गुरुकुंज मोझरी येथील आंदोलन स्थळी दाखल होणार असून राकेश टिकेत बच्चू कडूंची भेट घेतल्यानंतर आंदोलनाला पाठिंबा असल्याची माहिती आहे. दरम्यान रक्तातल्या शेवटच्या क्षणापर्यंत उपोषण करणार असल्याचं कडू यांनी सांगितले असून उद्या बैठक घेऊ आणि 14 नंतर आंदोलनाची वेगळी दिशा ठरवू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. कडू यांच्या आंदोलनाला रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला असून प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे या विषयी कडू यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
पीओपीच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्री करण्यास बंदी नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन होणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार?, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 30 जून ही पुढील सुनवाईची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय आहे.
ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय; नवीन लोकलमध्ये... https://t.co/QtNYKzNocR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
मुंब्राजवळील धोकादायक वळणांनी 5 जणांचा बळी घेतल्याचा आरोप होतोय... मुंब्रा स्टेशनजवळ 2 धोकादायक वळणं आहेत. ठाण्याहून मुंब्राकडे येताना बोगद्याजवळ एक धोकादायक वळण आहे. तर दुसरं वळण मुंब्रा स्टेशन सोडल्यानंतर आहे.. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांनी किती दिवस जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा असा सवाल उपस्थित होतोय.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.
केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे
जखमी व्यक्तीची माहिती खालील प्रमाणे:
1) श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत
7) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:
1) केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
2) राहुल संतोष गुप्ता
3) विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
4) आज्ञात व्यक्ती
नाशिक रेल्वे स्थानकावर देखील अपघात. गाडी पकडताना हात सटकल्याने प्रवासी गंभीर जखमी.नाशिकरोड स्थानकावरील हरिद्वार एम्प्रेस मधून करत होता प्रवास. स्थानिक रेल्वे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाख
खराब हवामानामुळे विमान उडण्यास अडचण आल्यानं दौरा रद्द
मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचा-याचाही मृत्यू. जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा अपघातात मृत्यू
मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2025
मुंब्र्यात मोठा अपघात! ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमीhttps://t.co/BbDmqEHKN0 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#mumbai #train #accident #pushpakexpress #mumbara #MumbaiLocalTrain
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
8 प्रवासी नेमके कसे पडले?
2 लोकल एकमेकांजवळून जाताना दाराजवळचे प्रवासी...; मुंब्र्यात नेमकं काय घडलं? रेल्वेनेचं सांगितलंhttps://t.co/98GSP7Q2WS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
मिरारोडच्या विनय नगर येथील एका घरातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना सापळा रचून काशिगाव पोलिसानी केली आहे. त्यांच्याकडून बनावट २१६ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत
एकनाथ शिंदे किल्ले रायगडावर दाखल. तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होणार
Maharashtra Breaking News LIVE Updates: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका बैठक घेणारेय.. पालिका आयुक्त या बैठकीत तयारीचा आढावा घेणार आहेत. महापालिका आरोग्य विभाग राज्य, आरोग्य विभाग, बी जे वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील तज्ञ ,या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. पुण्यात सहा दिवसांत 64 नवे कोरोना रुग्ण आढळलेत.
शरद पवार, अजितदादा आज पुन्हा एकाच मंचावर येणार त्यासंदर्भातली...ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्र होणार आहे.... शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत... पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला महत्त्व आहे.
पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. कोथरुड, बाणेर, बालेवाडी, वारजे, विमाननगर आदी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. बालेवाडी आणि पाषाण परिसरातील जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.
हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली Sonam Raghuwanshi सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा; CM चाही मोठा खुलासाhttps://t.co/mnmVY1S1O0 < येथे वाचा सविस्तर...#SonamRaghuvanshi #Sonam #rajaraghuvanshi #MurderCase #Crime #CrimeNews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2025
पटियाला हाऊस न्यायालयाने 26/11 चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची न्यायालयीन कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवली. तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर होता. यावेळी त्याच्या वकिलांनी आरोग्याच्या समस्या मांडल्या. न्यायालयाने तिहार अधिकाऱ्यांना आज स्थिती अहवाल दाखल करण्यास सांगितलंय.
वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी नवरा शशांक हगवणे आणि दिर सुशील हगवणे या दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या दोघांचाही ताबा आज पुणे पोलीस घेणार आहेत. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दोघांना पुणे पोलीस अटक करणार असून उद्या दोघांना पुणे कोर्टात हजर केलं जाणारेय. शशांकवर वारजे तर सुशीलवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
कायम एकमेकांवर नाराजी व्यक्त करणा-या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गाण्यावर ताल धरला... निमित्त होतं. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना UBT शाखेच्या वर्धापन दिनाचं... 8 जून 1985 मध्ये मराठवाड्यात स्थापन झालेल्या शाखेचा वर्धापनदिन सोहळा होता.. यानिमित्त दरवर्षी संभाजीनगरमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. महत्वाचं म्हणजे अंबादास दानवे मुळे खैरे नेहमीच नाराज असल्याची चर्चा असते, मात्र या कार्यक्रमात दोघेही हातात हात घेऊन नाचत असल्याचे दिसले.
Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 181 दिवस पूर्ण झाले.. मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीए. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये.
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे विमानतळ पावसाळ्यासाठी सज्ज..पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी पूर्ण...मागच्या वर्षी पावसात नवीन टर्मिनला झाली होती गळती.
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे - सातारा महामार्गावरील खेडशिवापूर ते कापूरहोळ गावच्या रस्त्यावरील डांबर उकरण्यात आलय.. रस्त्याचे काम करण्यासाठी ठिकठिकाणी डांबर उकरण्यात आलंय, मात्र पुन्हा डांबर टाकण्यास विलंब होतोय. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतोय. अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट ठेवण्यात आलंय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिकच्या मालेगावात एका मनोरुग्णाने धुमाकूळ घातलाय. कलेक्टर पट्टा भागात या मनोरुग्णाने हॉटेल काम करणा-या कामगाराचा हातातला झारा घेऊन दुचाकी स्वाराच्या डोक्यात घातला. दरम्यान या मनोरुग्णाचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.
मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके फाटा जवळ बस आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बस आणि मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याचे समजतंय. जखमींवर मालेगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT नं मिशन मुंबई हाती घेतलंय.. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यांवरून आमदार आदित्य ठाकरे आज एल्गार पुकारणार आहेत.. मुंबईतल्या मुलुंडमध्ये आज संध्याकाळी 'लढा आपल्या मुंबईचा' हा मेळावा पार पडेल. यात नागरिक, इतर सामाजिक संस्था आणि पदाधिका-यांना आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. धारावी पुनर्विकासात काय त्रुटी आहेत, या प्रकल्पाचा मुंबईवर काय परिणाम होणार आहे, याबाबत आदित्य ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई लुटली जातेय, असा आरोप शिवसेना UBT पक्षाकडून केला जातोय त्याबाबतही ते पक्षाची भूमिका स्पष्ट करतील
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर घडवणारी भारत गौरव ट्रेन सीएसएमटी स्टेशनवरून रवाना झाली आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधून 710 प्रवासी प्रवास करत आहेत. या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: भिवंडीतील मराठे पाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातही शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची लगबग इथं पाहायला मिळतेय.. काल मंदिराला स्वराज्य तोरण बांधून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा आणि लाडूतुलाही करण्यात आली. तसंच रात्री गोंधळाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. आज शिवराज्याभिषेक सोहळा आणि छत्रपतींचा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे.
किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत... राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होतोय. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी ध्वजारोहणने कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर शिव पालखी वाजत गाजत राज सदरेवर येईल. त्यानंतर राज सदरेवर प्रकाशस्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.