Ajit Pawar : तुम्ही मला खूश करा मी तुम्हाला खूश करेल असं अजित पवारांनी मतदारांना सांगितलंय.. निळकंठ पॅनल निवडून दिल्यास माळेगावला पाच वर्षात 500 कोटींचं पॅकेज देऊ असं अजित पवार म्हणालेत.. माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील प्रचार दौ-या दरम्यान शिरवली गावात त्यांची प्रचार सभा झाली. त्या वेळी त्यांनी पॅनलला निवडून देण्याचं आवाहन केलंय.
Adv. Sadavarte on Raj Thackeray : राज ठाकरेंनी जबाबदारीनं बोलावं असं आवाहन करत, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध केलाय.. हिंदीची सक्ती झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.. त्यांच्या या इशा-यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केलीय...राज ठाकरेंनी पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा सदावर्तेंनी दिलाय.. तसेच राज ठाकरे गल्लीतील नेते असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
Jayant Patil on BJP : आरोप करून जेरीला आणायचं आणि त्यालाच पक्षात घ्यायचं. ही सध्याच्या राजकारणाची नवी पध्दत महाराष्ट्रात रूढ झालीय. अशा शब्दात राष्ट्रवादी SP चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरून टीका केलीय. ज्यांनी विधानसभेत ज्यांच्या वर टीका केली. तेच त्यांना हार घालून सत्कार करून प्रवेश देतात. हे जनतेला कळलं पाहिजे. असंही जयंत पाटील म्हणाले.
Tukaram Maharaj Palakhi : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा.. यंदाच्या पालखी सोहळ्याचं 340 वं वर्ष आहे.. देहूनगरीत मानाच्या दिंड्या दाखल झाल्यात. पहाटेपासूनच मंदिरात विविध कार्यक्रम झालेत....स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मोदी शाहांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज यांनी विचारलाय.. शाळा हिंदी सक्ती कशा करतात तेच बघतो, आव्हान समजायचं तर समजा असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय... उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय असा आरोप राज यांनी केलाय.,,, IAS लॉबीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय... या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील मराठीप्रेमींनी आवाज उचलावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय..
Pune Drone : पालखी सोहळ्यादरम्यान पुणे शहरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी घालण्यात आलीये.. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 20 ते 23 जून या दरम्यान पुणे शहरात असणार आहे.. त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडूनये यासाठी ड्रोन कॅमे-याच्या वापरावर बंदी घालण्यात आलीये.
Sukanu Samiti : पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबतच्या निर्णयाला राज्य सरकारनं नेमलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांचाही विरोध केलाय.. हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतांना मत विचारात घेतलंच नसल्याचा सुकाणु समिती सदस्यांचं म्हणणं आहे.. नव्या शासन निर्णयाला सुकाणू समितीतील सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी विरोध केलाय.. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने सुकाणू समिती नेमली होती. या सुकाणू समितीच्या मंजुरीनंतरच इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केल्याचं शासन निर्णयात नमूद आहे.
Beed : बीडमध्ये शेतक-यांच्या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय...शेताच्या बांधावर तृण काढण्यावरून ही हाणामारी झालीय...कानडी घाट परिसरात 4 जणानी महिलेला बेदम मारहाण केलीय... महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय...महिलेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
BJP Mega Plan : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन तयार केलाय.. पुढील काही महिन्यात भाजपमध्ये पक्ष प्रवेशांचा धडाका सुरु होणार आहे.. नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मविआला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.. मविआतील नाराजांना भाजप गळाला लावणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलीये.. मविआचे बडे नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kolhapur Todfod : इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीची संतप्त जमावाने तोडफोड केलीय......या अकॅडमीत 12 वीत शिकणा-या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...आज सकाळी यश यादव या विद्यार्थ्यांनं अकॅडमीच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली...दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप पालकांनी केलाय....यामुळे संतप्त जमावाने अकॅडमीची तोडफोड केली.... त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं......या तोडफोडीत अकॅडमीचं मोठी नुकसान झालंय...
Kolhapur Murder : कोल्हापुरातील मदरशात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने विजेचा शॉक देऊन मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय....आळते इथं निजामिया मदरशात हा सर्व प्रकार घडलाय.... विशेष म्हणजे मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी, यासाठी आपल्या मित्राचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय... रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून अल्पवयीन आरोपीने 11 वर्षीय मित्राच्या तोंडात बोळा कोंबला, त्यानंतर विजेचा शॉक देऊन त्याचा खून केलाय... दरम्यान 'सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं' यासाठी खून केल्याची कबुली आरोपीनं दिलीय.... या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय... त्यानुसार आणखी 2 अल्पवयीन मुलांची चौकशी सुरुय..
Hindi Language GR Controversy : यंदा इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. दोनच भाषा असतील ही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा फसवी ठरवणारा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं मंगळवारी रात्री जारी केलाय.. यानुसार राज्य सरकारनं मागच्या दारानं हिंदी सक्ती लागू केल्याची चर्चा सुरु झालीय. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य असेल आणि त्यात हिंदीचा समावेश असेल. तसंच किमान 20 विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला तरच हिंदी ऐवजी अन्य भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असं जाईल असं सांगत सरकारनं हिंदी सक्तीची वाट मोकळी करुन दिल्याचा आरोप मराठी भाषा अभ्यासकांनी केलाय.. ही महाराष्ट्राची फसवणूक असल्याचा आरोपही मराठी भाषा तज्ज्ञांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Marathi School : मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना १३ वर्षात महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद झाल्याचे वास्तव समोर आलंय... मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी घटलीये.. केवळ विद्यार्थीच नव्हे तर या शाळांमधील शिक्षकांची संख्याही घटलीये.. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्यात..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Bridge : पुणे जिल्ह्यातील 830 पैकी 58 पूल हे कमकुवत असल्याचं पीडब्लूडीच्या पाहणीत आढळून आलंय...मावळच्या कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जाग होतं आत्ता कुठे जुन्या पुलांचा आढावा घेतंय त्यात 58 पूल धोकादायक नसले तरी जडवाहतुकीसाठी कमकुवत बनले असल्याचं आढळून आलंय दरम्यान, पुणे लोणावळा, मावळ भागातील इंद्रायणी नदीवरचे चार धोकादायक पूल आता वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद करून टाकलेत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
State Sowing : तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ११ लाख ७० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण आठ टक्के इतके आहे. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात एकूण क्षेत्राच्या २० टक्के झाल्या असून, त्याखालोखाल कोल्हापूर विभागात १५, लातूर व नाशिक विभागात प्रत्येकी १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोकण विदर्भ, तसेच मराठवाड्याच्या काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याने, पेरण्यांना अद्यापही वेग आलेला नाही.
Nashik Rain Alert : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या २४ तासांत १८.१ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झालीये..हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांसाठी नाशिकला पावसाचा यलो अलर्ट' देण्यात आलाय... यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुढील दोन दिवसांत पाऊस जोरदार हजेरी लावण्याचा अंदाज असून यावेळी वाऱ्याचा वेग हा ४० ते ५० किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तविली जातेय...
Mumbai MNS Meeting : मनसे नेत्यांची शिवाजी पार्क इथल्या पक्ष कार्यालयात आज बैठक होणारेय... सकाळी दहा वाजता ही बैठक होणारेय. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व असून या बैठकीला मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते उपस्थित राहणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Shivsena UBT Meeting : शिवसेना UBTच्या माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे... आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.,. जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार आहे.. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तोंडावर असताना अनेक नगरसेवक ठाकरेंची साथ सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांच्या अडचणी जाणून घेतील. तसंच स्थानिक पातळीवरील आढावाही ठाकरे घेतील..
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.