-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं ठरलं!
-चंद्रहार पाटील अखेर शिवसेनेच्या गळाला
-आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
-सांगलीत शिवसेना UBTला मोठा धक्का
-ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश....
-आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश
Aditya Thackeray : महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही लढा द्यायला तयार आहोत. असा पुन्नरुच्चार आदित्य ठाकरेंनी ठाकरेंनी केलाय. ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा सवाल त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. बदल घडवणं ही आमची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Chandrahar Patil : सरकारसोबत जाणार असल्याचे चंद्रहार पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले..ठाकरेंची साथ सोडण्यावर चंद्रहार पाटलांनी केलं शिक्कामूर्तब...उद्धव ठाकरेची साथ सोडणार असल्याचे अखेर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे.आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवरून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार याच्यावर शिक्कामूर्तब झाला आहे. सकाळपासून चंद्रहार पाटलांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर त्यांनी स्वतः पोस्ट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Anjali Damania : IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या मोबाईलची तपासणी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे....वैष्णवी मृत्यूप्रकरणी सुपेकरांचा मोबाईल तपासा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंनी दोन्ही पक्षाच्या विलनीकरणा संदर्भात घेतलेल्या भूमिकेचा स्वागत केलंय.. कार्यकर्ता म्हणून दोन्ही पवार एकत्र आल्यास कार्यकर्त्यांना आनंदच होणार असल्याचं मिटकरी म्हणालेत.. मात्र दोन्हीही पक्षाच्या विलनीकरणा संदर्भात कोणताही प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर अद्यापही पाठवण्यात आलेला नसल्याचंही मिटकरी म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ramdas Kadam : ठाकरे बंधू युतीच्या चर्चांवर शिवसेना नेते रामदास कदम यांनीही भाष्य़ केलंय. उद्धव ठाकरे हे संधी साधू असल्याची टीका त्यांनी केली. त्यावेळी मनसेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेतले होते. ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील. असंही ते म्हणाले. तर ठाकरेंसोबत एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं या गजानन किर्तीकरांच्या इच्छेवरही रामदास कदम यांनी भाष्य केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
1 ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणारेय. याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणारेय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणारेय.
Sahitya Samelan : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात होणार आहे...पुण्यात झालेल्या मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय झालाय... तब्बल 32 वर्षांनंतर साता-यात मराठी साहित्य संमेलन होणार आहे...
Tuljabhawani : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याने सपोर्टसाठी चक्क लोखंडी बार लावण्यात आले आहेत... चोपदार दरवाज्यात देखील सपोर्टसाठी लोखंडी फ्रेम लावली आहे...त्यामुळे आता देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे...अवकाळी पावसाने मंदिरात अनेक ठिकाणी गळती लागली आहे...माञ गाभा-यामध्ये कुठेही गळती लागलेली नसल्याचे सांगत पुरातत्व विभागाने लोखंडी बार आणि फ्रेम लावून उपाययोजना केल्याची माहिती मंदीर संस्थानचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलीय....
Sambhajinagar : संभाजीनगरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी विजा कोसळल्याच्या घटना घडल्या.. वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात एका कांदा चाळीवर वीज कोसळल्याने कांदा चाळीला आग लागली. या आगीत कांदा चाळीतील पाच ते सहा ट्रॅक्टर कांदे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच जळून खाक झाले. त्यामुळे या शेतक-याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.. आता प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळणार का अशी आस या शेतक-याला लागलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Palghar : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला तब्बल पाच महिन्यानंतर अटक करण्यात आलीये... फरार असलेल्या अविनाश धोडी याला दादरा नगर हवेलीतून अटक केलीये.. पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये..
Mumbai Dam Water Level : यंदा लवकर दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात दडी मारली असून, उकाड्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा घटला आहे... या धरणांमध्ये 11 टक्के पाणीसाठा असून, तो दहा टक्क्यांखाली घसरल्यास राखीव पाणीसाठ्याला हात घालण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्या आहेत... यासंदर्भात येत्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Post Office Digital Pin : आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे... यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे... देशातील प्रत्येक ठिकाणाचा या 10 अंकी पिनमुळे आता अचूक पत्ता मिळेल... यूझरला indiapost.gov.in आणि mydigipin या संकेतस्थळावरू आपला डिजिपिन मिळवता येईल..नव्या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंतही अचूक ठिकाणी पोहोचू शकतो...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Delhi Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका धावपट्टीचे नूतनीकरण काम सुरु आहे..त्यामुळे तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कारणामुळे सदर विमानतळावर 15 जूनपासून दररोज सुमारे 114 उड्डाणे रद्द करण्यात येणार आहे...
Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास अधिक वेगवान होईल... आता सहा पदरी असलेला हा महामार्ग दहा पदरी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ..याआधी MSRDCने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता... आता आठऐवजी थेट दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे... येत्या दहा दिवसांत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे... सध्या या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सहा पदरी महामार्ग अपुरा पडू लागला आहे...
Dombivli Green Rain : डोंबिवलीतील काही भागात शनिवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा रंगली. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.. एमआयडीसी भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्यात मिसळल्यावर असे रंग रस्त्यावर पसरतात. या हिरव्या पावसाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झालेत..
State Corona Update : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येतोय.... राज्यात 86 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 362 वर पोहोचलीये. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झाली आहे. पुण्यात 31, मुंबई 28, पिंपरी चिंचवडमध्ये 7, ठाण्यात 6 कोरोना रुग्णांची नोंद झालीये...
Mumbai Shivsena UBT Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मुंबईत निरीक्षक नेमले आहेत... त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे... त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीच्या चर्चे संदर्भात यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.