आज दुपारी बारा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची शिवतीर्थ येथे बैठक होणार आहे.
Amravati Manoj Jarange : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलनाला बसले आहेत. सरकारनं त्यांची मागणी मान्य केली नाही तर राज्यातील शेतक-यांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. आपण आधी शेतकरी आहोत, मग मराठा, ओबीसी आणि इतर असल्याचं जरांगे म्हणाले. शेतक-यांसाठी आपणही उपोषणाला बसायला तयार असल्याच जरांगे म्हणाले. अमरावतीत जाऊन त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. यावेळी बोलताना राज्यभरातील सर्व शेतकरी संघटनांनी बच्चू कडू यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Shivaji Park Banner : एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच, मुंबईतील दादर इथे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो छापण्यात आलेत. ठाकरे काका-पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
Manmad : मनमाडमधील वर्दळीच्या कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरोडा पडला. दरवाजे, खिडक्या बनवणारे व्यापारी मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंगल्यात घरफोडी करण्यात आली. मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून 1 किलो 600 ग्रॅम सोनं आणि 8 लाख रोख रक्कम चोरांनी लुटली. घटनास्थळी नाशिक पोलिसांचं डॉग स्क्वॅड, फॉरेन्सिक टीमनं पाहणी केली. मुर्तुजा आईला आणण्यासाठी रविवारी रात्री आर्वी इथे गेले होते.
MNS & Shivsena UBT Yuti Update : एकीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना नेमकी कशी असणार या संदर्भात तयारी पूर्ण झालीय.. निवडणुका लवकरच लागणार असल्याची शक्यता असताना अद्यापही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत कुठलाही निर्णय किंवा अधिकृत प्रस्ताव एकमेकांत समोर आलेला नाही. मात्र आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी समोर आलीय...
Sandeep Joshi On Sanjay Rathod : मृद आणि जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या खात्यात अनियमितता झाल्याचा आरोप होतोय.. राठोड यांच्या खात्यात पैसे देऊन अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संदीप जोशी यांनी केलाय. अनेक अधिका-यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली असा आरोप होतोय.. या संदर्भात जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रारही केलीय. चुकीच्या बदल्यांबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिलीय. तर यावरुन खासदार संजय राऊत यांनी यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर द्यावं असं म्हटलंय..
Mumbra Train Accident Case : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांना जीव गमवावा लागला. असं असलं तरी या दुर्घटनेचं खापर प्रवाशांवरच फोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित होतोय.दोन लोकलचे डबे जवळ आल्याचा दावा रेल्वेनं फेटाळलाय.. लोकलचे डबे जवळ आलेच नाही असा दावा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिका-यांनी केलाय. तसंच मुंब्रात दोन रुळांमधील अंतर साडेचार मीटरपेक्षा अधिक असल्याचा दावाही त्यांनी केलाय..
Bharat Gogawale : सरकारच्या आर्थिक अडचणीचं खापर मंत्री भरत गोगावलेंनी लाडकी बहिण योजनेवर फोडलंय..लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक अडचण झाल्याचं वक्तव्य रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी केलीये.. लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्याप्रणात निधीचं वाटप झालं.. त्यामुळे निधी वाटप करणं मुश्कील झाल्याचं गोगावले म्हणाले..
Narayan Rane on Nitesh Rane : भाजप नेते नारायण राणे यांनी मस्त्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणेंचे कान टोचलेत..नितेश राणेंनी सगळ्यांचा बाप हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं होतं.. त्यानंतर वादाची परिस्थीती निर्माण झाली होती.. त्यावर राणेंनी नितेश राणेंना समज दिलीये. मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो जनतेचा सेवक असतो अशी समज दिल्याचं राणेंनी सांगीतलंय..
Sangli Murder : सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय....अनिल तानाजी लोखंडे असं मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी राधिका इंगळे हिला अटक करण्यात आलीये..पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये भांडणाचा प्रकार घडला होता. यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत ही हत्या केलीये. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरुये..
Raja Raghuvanshi Murder Case : कुंडलीतील मंगळ दोष हटवण्यासाठी सोनमनं राजाशी लग्न केलं होतं अशी धक्कादायक माहिती राजा रघुवंशीचा भाऊ सचिन रघुवंशीनं दिलीय.. मंगळ दोष हटवण्यासाठीच सोनमनं राजाची हत्या केल्याचा आरोप सचिननं केलाय.. मंगळ दोष हटवून कथित प्रियकर राज कुशवाहसह सुखानं राहता येईल असं सोनमला वाटत होतं असा दावाही सचिननं केलाय..
Central Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक...बैठकीत मुंबईतील रेल्वे अपघाताबाबत चर्चेची शक्यता...रेल्वेबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता...दुपारी तीन वाजता बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Toll Collection : महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी 500 ते एक हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती समोर आलीये...टोल वसुलीच्या बाबतीत उत्तरप्रदेश पहिल्यानंबरवर आहे..तर महाराष्ट्र टोल वसुलीत चौथ्या स्थानी असल्याचं अक्कडेवारी समोर आलीये. 2020-21 ते 2024-25 या मागील पाच वर्षात देशात 2 लाख 20 हजार 590 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला आहे..यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून 27 हजार 14 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय...यानंतर राजस्थानमधून 24 हजार 209 कोटी, तर महाराष्ट्रातून 21 हजार 105 कोटी वसूल करण्यात आलं आहे...
AC : अरे गरम होतंय एसी थोडा कमी कर, अरे थंडी वाजतेय एसी थोडा वाढव... असे शब्द घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही रोजच ऐकत असाल. मात्र लवकरच यातून सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण लवकरच तुमच्या एसीचा रिमोट सरकारच्या हाती जाणार आहे.. सरकार एसीच्या तापमानाबाबत एक नवीन नियम आणणार आहे. यानंतर, नवीन एसीचे तापमान एका मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त राहणार नाही. एसीचं तापमान 20 अंश ते 28 अंशांच्या दरम्यान निश्चित केले जाईल. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं की, सरकार देशभरात एसीसाठी नवीन तापमान रेंज लागू करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत, एसीला 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंड होऊ दिले जाणार नाही आणि कमाल मर्यादा 28 अंश सेल्सिअस असेल. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही घोषणा केलीय.
Train Travel : तुम्ही रेल्वेनं प्रवास करताना तुमचं आरक्षित तिकीट असेल तर ते वेटिंग असतं... प्रवासाच्या काही तास आधीपर्यंत तिकीट कन्फर्म होणार की नाही हे तुम्हाला कळत नाही.. प्रवाशांची हीच समस्या दूर करण्यासाठी रेल्वे एक पाऊल उचलणार आहे... रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचा वेटलिस्ट चार्ट आता चार तासांऐवजी एक दिवसआधी तयार करण्याची योजना आहे.. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता येईल अशा विश्वास व्यक्त केला जातोय.. 6 जूनपासून बिकानेर रेल्वे विभागात हा प्रयोग सुरु करण्यात आलाय. यानंतर देशाच्या विविध भागात हा प्रयोग राबवला जाईल. विशेषतः दिल्ली ते उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये जिथं वर्षभर वेटिंग लिस्ट अधिक असते तिथं हा प्रयोग राबवला जाणार आहे.. यासोबतच बिहार, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरातकडे जाणा-या रेल्वेसाच्या तिकीटासाठी प्रचंड चढाओढ असते... तसंच दिल्ली मुंबई मार्गावरील रेल्वे तिकीटासाठीही प्रवाशांना प्रचंड कसरत करावी लागते. अशा सर्व ठिकाणी 24 तास आधी वेटलिस्ट चार्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांना फोन केल्याची माहिती समोर आलीये. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला पांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसलेत... काहीही झालं तरी अन्नाचा एकही कण घेणार नाही, असं बच्चू कडू यांनी जाहीर केलंय... दरम्यान शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली... 'कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे. अशी माहिती बच्चू कडूंनी पवारांना दिली..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
POP Ganesh Murti : पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवं धोरण आणणार असल्याची माहिती मिळतेय.. याच आठवड्यात पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार नवं धोरण आणण्याची शक्यता आहे.. लालबागचा राजा, मुंबईचा राजासह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या धोरणातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पीओपी मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.. नुकतंच मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तीबाबत मोठा निर्णय घेतलाय. POP मूर्ती बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवलेत. POPच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीला आता बंदी नसेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन होणार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं.. त्यामुळे आता मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार का याकडे लक्ष लागलं होतं. आता सरकार याबाबत धोरण आणणार असल्याचं समजतंय....
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाणे दौ-यावर...आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दौरा...राज ठाकरे ठाण्यात बैठक घेण्याची शक्यता..ठाण्यातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे देणार कानमंत्र
schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू होतील. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ-सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील.. तर राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत सुरु राहतील.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका दिर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत. या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयाने 15 मे रोजी जारी केले होते. आरक्षणावर आधारीत मराठा विद्यार्थ्यांचं प्रवेश त्रिशंकू अवस्थेत आहेत. याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं 15 मे रोजी हायकोर्टाला दिले होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Mumbai : महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये 227 प्रभाग असणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.