अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना केले आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत.
महायुतीच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे.
योगेश कदम यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्री मंडळात समावेश.
राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. दोन वेळा आमदार. पहिल्यांदाच मंत्री मंडळात समावेश.
भाजप आमदार पंकज भोयर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
आशिष जैस्वाल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्री मंडळाच समावेश.
भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश.
प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
राष्ट्रवादी आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्री मंडळाच समावेश.
भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. नितेश राणे यांना पहिल्यांदाच मंत्री मंडळात स्थान मिळाले.
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. चार वेळा आमदार असलेल्या मकरंद पाटील यांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात स्थान मिळाले.
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश.
प्रताप सरनाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांच मिळाले मंत्रीपद.
संजय शिरसाट यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
भाजप आमदार संजय सावकारे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
नरहरी झिरवाळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. सलग तीन वेळा आमदार. विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ. वनारे गावचे सरपंच पदापासून प्रवास सुरू. मंत्रिपदासाठीची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.
जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश.
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पाचव्यांदा आमदार. अंजिक्यतारा साखर कारखाना ते सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष.
राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. राष्ट्रवादी शिंदे सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री होत्या. त्याआधी ठाकरे सरकारमध्ये उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा आणि युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 3 वेळा आमदार. मागील सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री.
शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. चार वेळा आमदार. मागील सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री
भाजप आमदार अशोक उईके यांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रीपदाची शपथ.
भाजप आमदार अतुल सावे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 3 वेळ आमदार. मागील सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री.
पंकजा मुंडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. विधान परिषद आमदार बीडमध्ये ताकद. याआधीही मंत्री म्हणून काम वंजारी समाजाची ताकद, ओबीसींचं नेतृत्व..
जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
शिवसेना आमदार उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 5 वेळा आमदार. मागील सरकारमध्ये उद्योगमंत्री.
भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 7 वेळा आमदार.
राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. दोन वेळा आमदार. मागील सरकारमध्ये कृषी मंत्री.
संजय राठोड यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
शिवसेना आमदार दादा भुसे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री.
भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम केलं पर्यावरण मंत्रीही होते. सामाजिक कार्यासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. नवीमुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात मोठं योगदान.
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. जामनेर मतदारसंघ. 7 वेळा आमदार, 10 वर्ष मंत्रिपद भूषपलं. ग्रामविकास, युवा कार्य आणि क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा या खात्याचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. शिक्षकाचा मुलगा आमदार ते मंत्री असा प्रवास.
भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. मिल कामगाराचा मुलगा, अभाविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे.. उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण, कापड, संसदीय कामकाज या खात्याचं काम पाहिलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 6 वेळा आमदार. राष्ट्रवादी ग्रामविकास मंत्री होते. कामगार मंत्री म्हणूनही काम पाहिलं. जलसंपदा, विधी आणि न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण खात्यांमध्ये त्यांनी काम पाहिलं..
पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते.. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय..
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीआहे.
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
खासदार नवनीत राणांनी ठेवले हात जोडल्याचे व्हाट्सअप स्टेटस
माजी खासदार नवनीत राणांच्या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा
रवी राणा मंत्रिपद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
आमदार रवी राना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याची ओळख
विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आले
राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात लावली हजेरी
रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत.
मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट थोडक्यात हुकली
उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंच्या लग्नातील उपस्थितीतने अनेकांच्या भुवया उंचावल्या
राज - उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय
आतापर्यंत
चंद्रपूर-- 6 पैकी 5 भाजप आमदार
गडचिरोली-- 3 पैकी 2 महायुती आमदार
या जिल्ह्यांमधून एकाही आमदाराला मंत्रीपदासाठी कॉल नाही.
भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही अद्याप निरोप नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आगमन झालं आहे. त्यांची स्वागत यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाली यावेळी नागपूरमधील कार्यक्रते आणि सामान्य नागरिकांनी या यात्रेला गर्दी केली होती. ही यात्रा खामला चौकात पोहोचली तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी फडणवीसांना पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आला.
वरळीतील पूनम चेंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. शिवसेनेचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थतीची माहिती घेतली. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नागपूरमध्ये रविवारी सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला गृहनिर्माण , नगर विकास, उद्योग, पर्यटन, शालेय शिक्षण, पाणी पुरवठा, जलसंधारण, मराठी भाषा, माजी सैनिक कल्याण, खनिकर्म, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम इत्यादी महत्वाची खाती देण्यात येऊ शकतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आगमन होत आहे. त्यांची स्वागत यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणार आहे. ही यात्रा खामला चौकात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.
संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना हॉटेल रेडिसनमध्ये घेराव घातला. यावेळी संजय बनसोडेही उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या कामाचा पाढा वाचत त्यांना मंत्री करण्याची विनंती केली. रविवारी सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अंबादास दानवेंच्या नागपुरमधील बंगल्यावर महाविकास आघाडीची सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे.
मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील शिवाजी नगर जंक्शन बस स्टॉपजवळ बसची धडक बसल्याने डोक्याला दुखापत झाल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
मंत्रिमंडळामध्ये समावेश करुन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पक्षाच्या आमदारांना फोन करण्यास सुरुवात झाली आहे. नितेश राणे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मंगलप्रभात लोढांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्याकडून काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ कोल्हापुरच्या कागलचे आमदार आहेत. ते नवव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच आज शहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज झाले आहे. नागपूर विमानतळ ते धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर होर्डिंग, कटआउट, स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. स्वागत रॅलीच्या मार्गावर ठिकाणी चौका चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. रस्त्यांवर रांगोळ्या सुद्धा टाकण्यात येणार आहेत. फडणवीस विमानतळावर उतरल्यानंतर ही स्वागत रॅली सुरू होईल. यावेळी फडणवीस विमानतळ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर वर्धा मार्गावरील चौकात डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मारकाला वंदन करतील. त्यानंतर ही स्वागत रॅली देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत जाईल. लक्ष्मीभुवन चौकात देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत.
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या, रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत स्लो ट्रकवरच्या ट्रेन बंद करण्यात आल्या असून या गाड्या फास्ट ट्रकवरूनच चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. काही अप आणि डाऊन मेल/ एक्स्प्रेस गाडय़ांचे डायव्हर्जन केले जाणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱया डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
जम्मू-काश्मीरमधील बहुतांश भागात शनिवारी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे पुढील तीन दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने दिल्ली, राजस्थानसह देशातील अनेक राज्ये गारठली असून, नागरिकांना हुडहुडी भरली आहे. काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट पसरल्याने श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे 4.6 सेल्सिअस नोंदवले. आदल्या रात्रीच्या तुलनेत हे तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होते. गुलमर्गमध्ये उणे 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला; पण खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारातच विकले. परिणामी राज्यात 10 डिसेंबरपर्यंत 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1 लाख 31 हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. तब्बल 14 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवताना शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती; मात्र खरेदी केवळ 10 टक्क्यांपर्यंतच पोहोचल्याने नोंदणीसाठी आता 31 डिसेंबरची मुदतवाढ देण्याची खुल्या बाजाराला दिली पसंती सोयाबीन खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यातच ऐन काढणी वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत ‘ला – निना’ स्थिती विकसीत होण्याची शक्यता आहे. मात्र, ही स्थिती तुलनेने कमकुवत आणि अल्प काळासाठी असल्यामुळे भारतासह जगातील अन्य देशांच्या हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे मत विविध हवामान संस्था आणि शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. जागतिक हवामान संस्थेच्या (डब्ल्यूएमओ) ‘ग्लोबल प्रोड्यूसिंग सेंटर्स ऑफ लॉन्ग-रेंज फोरकास्ट्स’ या विभागाने नुकताच एक सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ‘ला निना’ची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाची ‘ला-निना’ स्थिती मागील ‘ला-निना’च्या तुलनेत कमकुवत असेल, शिवाय ही स्थिती अल्प काळासाठी राहण्याची शक्यता आह
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर हे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे.
राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींच्या तुलनेत किती निधी वाटप झाले आणि किती खर्च केले ? याचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारला दिले. राज्यातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा तपशीलही न्यायालयाने सरकारला सादर करण्यास सांगितला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वितरीत केलेला निधी खर्च झाला नसेल किंवा केला नसेल तर तो का केला गेला नाही याची कारणेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. उपरोक्त सगळा तपशील जिल्हानिहाय असावा, असेही खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र त्यांना खातं कुठलं मिळणार हे गुलदस्त्यात आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी गुलाबराव पाटलांना फोन आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांचे सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी 'झी 24 तास'ला दिली आहे.
लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. अपघाताच्या वेळी संजय मोरे दारू प्यायला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झालेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळांना मंत्रिपद मिळणार असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांना करण्यात आला आहे. कोणते मंत्रिपद याबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे.
शिवसेनेकडून आज मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची संभाव्य यादी समोर आली आहे. ही पाच नावं खालीलप्रमाणे:
उदय सावंत
संजय शिरसाट
शंभुराजे देसाई
दादा भुसे
विजय शिवतारे
प्रताप सरनाईक
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज नागपुरात राजभवनमध्ये दुपारी 4 वाजताच्या सुमारास महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 30-32 मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.