Maharashtra Breaking News LIVE Updates: आज देशभरामध्ये नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
सलून मध्ये कटिंग करत असतानाच पोलिसांनी केली कारवाई
पोलीस अटक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आल समोर
आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना
सतीश वाघ खून प्रकरणात मोठी
सतीश वाघ यांच्या पत्नीने दिली होती खुनाची सुपारी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला केली अटक
सतीश वाघ यांचे अपहरण करून करण्यात आला होता खून
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सापडला होता सतीश वाघ यांचा मृतदेह
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती..
त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलय..
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ...
दीपक केसरकर काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, दिपकभाई मला वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत ते बोलत असताना आपण आपल विद्ववता व्यक्त करणं योग्य वाटत नाही
पुढील चार दिवसांत राज्यात पावसाचा इशारा
राज्यात सध्या थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरण आहे
हवामान विभागाने पुढील चार दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे
दिल्ली - संसद परिसरात एका माणसाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
जखमी अवस्थेत त्याला आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
जितेंद्र असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे
तो उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे
घटनास्थळावरून एक वही सापडली आहे
दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत असल्याची माहिती तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मतदारसंघातील पूर्वनियोजित कामात व्यस्त
खासदार प्रफुल्ल पटेल देखील बाहेरगावी असल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर प्रेस क्लबकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "लोकसभेतला फेक नेरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो. त्यामुळे हा सर्वात मोठा विजय मिळवू शकलो," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "आता जबाबदारी वाढली आहे कारण जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत," असंही फडणवीस म्हणाले.
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीची अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेगाववरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंनी ही माहिती दिली.
कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत? कधी थांबणार महिलांची अवहेलना? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
मुंबई भाजप कोअर कमिटीची आज दुपारी बैठक पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित राहणार असून शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत जाणार आहेत. पदभार स्वीकारल्यावर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या अॅक्शन प्लानचा आढावा घेतला आहे. आता देवेंद्र फडणवीस प्रत्येक खातेनिहाय आढावा घेणार असून लवकरच अॅक्शन प्लान निश्चित केला जाणार आहे. यामध्ये कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा आणि ऊर्जा विभागाचा सुरूवातीला आढावा घेण्यात आला आहे.
'वन नेशन, वन इलेक्शन'ची पहिली संसदीय बैठक 8 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 39 सदस्यीय संसदीय पॅनलची पहिली बैठक असणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या या प्रमुख निवडणूक सुधारणा उपक्रमावर देशव्यापी चर्चा सुरू होईल. संसदीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या विधेयकांवरील संयुक्त समितीची पहिली बैठक, भाजपचे सदस्य पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन विधेयकांबाबत अधिका-यांनी पॅनेलला माहिती देणारी प्रास्ताविक बैठक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वाइन उद्योगाला प्रोत्साहन योजनेअंतर्गत तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय मंगळवारी उद्योग विभागाने जाहीर केला आहे. उद्योग विभागाने केलेल्या विनंतीनुसार वित्त विभागामार्फत वाइन उद्योग प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण 21 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यानुसार हा सर्व निधी बीडीएस प्रणालीवर वितरणाकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात नाशिक आणि सोलापूर येथील कंपन्यांचा समावेश आहे.
दुसरे विश्व मराठी संमेलन पुण्यात फेब्रुवारी अखेर होणार आहे. राज्य सरकारतर्फे दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. याची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केलीय. तर या संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही दिले आहेत. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत यांनी घोषणा केली आहे.
पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालकाला ही पोलिसांनी अटक केली आहे. डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याची माहिती असून ही डंपर का चालवायला दिला. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून डंपर मालकाल अनिल काटे याला ही अटक करण्यात आली आहे. तर डंपर चालक गजानन शंकर तोटरे त्याला न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या डंपरने 9 जणांना चिरडलं होतं. त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला.
24, 25 आणि 31 डिसेंबरला गृह विभागाने पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच या तिन्ही दिवशी नागरिक जल्लोष करण्याच्या मूडमध्ये असल्याने याचा समाजकंटकांकडून कुठलाही गैरफायदा उचलला जाऊ नये याकरिता मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी मंगळवार रात्रीपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशन, हॉटेल-लॉजिंगची तपासणी आणि नाकाबंदीवर जोर दिला आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरदेखील पाट्यांचे आयोजन केले जाते. शिवाय मोठ्या संख्येने नागरिक चौपाट्यांवरदेखील जातात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरदेखील तगडी गस्त ठेवण्यात येणार आहे.
माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल नियुक्त करण्यात आलं आहे. आरिफ खान हे केरळचे राज्यपाल होते. त्यांच्या जागी बिहारचे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. हरि बाबू कंभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
मध्य रेल्वेवर बुधवारी ख्रिसमसच्या सुट्टीमुळे रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना घराबाहेर पडताना टाइम टेबल बघूनच बाहेर पडावे लागणार आहे. मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मंगळवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी याबाबत माहिती देण्यात आली.
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे. आंबेडकर वादासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्यावर चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे.
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांचा सत्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर हा सत्कार सोहळा होणार आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंतीच औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
नाताळच्या सणाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळतोय. गोव्यापाठोपाठ आता कोकणातील समुद्र किनार्यांनी पर्यटकांना भुरळ पाडलीय. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनार्यांवर गर्दी केलीय. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलींग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडीमंडळीही खुश आहे. राज्याच्या अनेक भागातून आलेले पर्यटक खास कोकण पदधतीच्या व्हेज ,नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेत आहेत. इथंल्या ताज्या मासळीच्या आस्वादानेही पर्यटकांच्या जीभेचे चोचले पुरवले जाताहेत. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतात.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. दीपक उर्फ जोथा शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे असा एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून 2 मोबाईल, 38 हजारांची रोखरक्कम आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
बदलापूर, वांगणी, कर्जत भागातून दररोज हजारो प्रवासी नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईला ये-जा करत असतात. त्यामुळे लोकल वाहतुकीवर प्रचंड ताण येतोय. गेल्या 10 वर्षात या मार्गावर एकही नवीन लोकल वाढलेली नाही. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कल्याण-कर्जत मार्गावर तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर कल्याण ते बदलापूर मार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम करत असताना रेल्वेनं गावदेवी भागात लाखो रुपये खर्चून बांधलेली संरक्षक भिंत तोडण्यास सुरुवात केलीय. मुळात तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू होणार हे माहीत असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत का बांधली? असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय.
खारघर येथील बेलपाडा येथे एक तरुण हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना घडली. हायटेन्शन टॉवरवर चढलेला व्यक्तीला नागरिकांनी आवाज देत खाली उतरण्यास भाग पाडले. तरुण खाली येताच एका सीआरपीएफ जवानाने पकडून तरुणाला पोलीसांच्या स्वाधीन केलं. या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचं कौतुक करताना त्यांना सांताक्लॉजद्वारे चॉकलेट भेट देण्यात आले. नवी मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना नाताळच्या पार्श्वभूमीवर थेट सांताक्लॉज चॉकलेट देण्यासाठी अवतरला होता. यावेळी वाहनचालकांनी या उपाक्रमाचे स्वागत केले तर वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्व वाहनचालकांना केले आहे.
आपला नेता मुख्यमंत्री झाला यामध्ये आपण खुश आहोत. यापेक्षा सगळे येऊन देवाभाऊंच्या पाया पडतात यामध्ये आपण जास्त खुश आहे, असे विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी येथे सत्कार सोहळा प्रसंगी बोलत केलं आहे.
राज्यातले सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, अशा शब्दांमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. अधिवेशन झालं, पण कोणी विरोधक मोठ्याने बोलायला तयार नसल्याने ते तिकडे आहेत की आमच्याकडे आहेत,हे कळेना! काँग्रेसवाले तर प्रश्न पण उपस्थित करतात आणि उत्तर पण तेच देतात, त्यामुळे ते सगळे हवालदिल झाले आहेत. काहीच दम नाही विरोधकांमध्ये, असा टोला पडळकरांनी लगावला. विरोधक स्ट्राँग पाहिजे त्याशिवाय मजा येत नाही. पुढे कोणाचं स्ट्राँग दिसत नाही. एखादा मस्तवाल असला तर त्याच्या विरोधात लढायला मजा येते पण सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, असे विधान आमदार पडळकरांनी केले आहे. ते सांगलीच्या आटपाडी येथे सत्कार सोहळ्यात बोलत होते.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.