नेत्यांच्या पुढेपुढे करणा-यांनाच शिवसेना UBTत पद दिलं जातं, असा गंभीर आरोप संदीप राऊत यांनी केलाय. शिवसेना UBTमध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो असेही आरोप त्यांनी केलाय. संदीप राऊत हे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ असून त्यांना अप्पा राऊत असंही म्हटलं जातं. त्यांची ही फेसबूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलीये. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.
गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून सिद्धिविनायक मंदिरातील श्रीच्या मूर्तीचं गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही. 11 ते 15 डिसेंबर कालावधीत श्रींचं शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. शेंदूर लेपनाच्या या कालावधीत श्रींचं गाभाऱ्यातून दर्शन बंद राहणार आहे. या दरम्यान गाभा-याच्या बाहेरून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे.
सोलापुरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोलापुरातील रुपाभवानी परिसरातील नाल्यात नवजात अर्भक फेकल्याची घटना घडलीय. या अर्भकाचे मोकाट श्वानांनी लचके तोडल्याची माहिती आहे.. पुरुष जातीचे अर्भक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करतायत.
सांगलीच्या अंकलीमधील कृष्णा नदीमध्ये भली मोठी मगर मृत अवस्थेत आढळून आली.. कृष्णा नदी पात्रात ही मगर वाहत आली असताना नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी मृत मगरीला ताब्यात घेतलं.2 दिवसांपूर्वीच वारणा नदीपात्रामध्ये दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला होता.यामध्येच एका मगरीच्या पिल्लाचा देखील मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता..याच दूषित पाण्यामुळे कदाचित मगरीचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय... दरम्यान प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेय...
राजस्थानातील दौसामध्ये सोमवारी दुपारच्या सुमाराला 5 वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी NDRF पथकाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र बचाव पथकाला यश आलेलं नाही. पाय घसरून तो 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. या अपघाताची माहिती मिळताच NDRF आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
कृषी विम्यातील आणखी एक घोळ संभाजीनगरमध्ये उघड झाला आहे या वेळेस कांदा पीक नाही तर या वेळेस फळबाग लागवडीत हा कृषी विम्याचा घोळ करण्यात आलेला आहे.. संभाजी नगर जिल्ह्यात या हंगामात 13 हजार 286 शेतकऱ्यांनी 8 हजार 910 हेक्टर वरील फलबागांचा पीक विमा काढलाय ,मात्र हा पीक विमा नेहमी पेक्षा जास्त असल्याने कृषी विभागाला संशय आला आणि या प्रकरणी चौकशी सुरू झाली त्यात 1 हजार 498 शेतकऱ्यांनी 805 हेक्टर वर कुठलीही फळबाग लावली नाही फक्त विमा तितका काढला असल्याचे उघड झाले आहे. म्हणजे हा विमा फक्त कागदोपत्री आहे. नुकसान झाले दाखवायचे आणि भरपाई घ्यायची असला हा प्रकार असल्याचं सांगण्यात येताय.
नंदुरबार जिल्ह्यातून कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जिल्ह्यात 18 हजार कुपोषित बालकांची नोंद झाल्याचं समोर आलंय. त्यापैकी अति कुपोषित बालकांची संख्या 2 हजार 223 तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 15 हजार 744 इतकी आहे. अनेक मजूर कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरित झालेत. ते मार्च महिन्यात परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या आकडेवारीत अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कुपोषित बालकांसाठी अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिलीय.
मुंबईतील कुर्ला अपघातातील जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र बाहेर जाऊन 6 हजार रुपये खर्च करुन MRI करण्याबाबत डॉक्टर जखमींना सांगत आहेत. गरीब कुटुंबातील जखमींना बाहेर जाऊन MRI करणं परवडत नाही. त्यामुळे आता MRIचा खर्च कसा करायचा अशी चिंता जखमी आणि त्यांच्या नातेवाईंकांना सतावत आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते अस्लम शेख, ज्योती गायकवाड आणि अमिन पटेल यांनी भाभा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
शिवसेना UBTकडून ईव्हीएमविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं शिवसेना UBTकडून अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं. EVM विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल,प्रगत देशात EVM नाही मग भारतात का? EVM हटवा,लोकशाही वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला दिसून येतोय.
आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी 10 ते 15 जणांच्या चौकशीनंतर दोघांना ताब्यात घेतलंय. दोन्ही आरोपी पुणे क्राईम ब्रँच पथकाच्या ताब्यात आहेत. पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळे अशी या दोघांची नावं आहेत. सतीश वाघ यांची सोमवारी पहाटे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यात सरपंच हत्या प्रकरण चांगलंच तापलाय. आता कैजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवली. त्यांनी पोलिसांना पुढे जाण्यापासून रोखलं.. यामुळे कैज तालुक्यात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तणाव आहे. केजमध्ये गावकरी आक्रमक झालेत. सकाळपासूनच कैज आणि मस्साजोग या ठिकाणी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आंदोलन सुरूय. आता पोलिसांचीच गाडी अडवल्यानं वातावरण अजून बिघडलंय.
बीड जिल्ह्यात सरपंच हत्या प्रकरण चांगलंच तापलाय. आता कैजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवली. त्यांनी पोलिसांना पुढे जाण्यापासून रोखलं.. यामुळे कैज तालुक्यात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तणाव आहे. केजमध्ये गावकरी आक्रमक झालेत. सकाळपासूनच कैज आणि मस्साजोग या ठिकाणी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आंदोलन सुरूय. आता पोलिसांचीच गाडी अडवल्यानं वातावरण अजून बिघडलंय.
कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी बस चालक संजय मोरे याला कुर्ला कोर्टानं 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदोष मनुष्य वध, मारपीट असे गुन्हे संजय मोरेवर दाखल करण्यात आले आहेत.
कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीये. कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. तसंच या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च हा मुंबई महानगर पालिका तसंच बेस्टकडून केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत घोषणा केलीये.
RTO कडुन बस चालवून तपासाणी केली गेली असून बस पूर्णपणे व्यवस्थित असल्याची माहिती समोर येतेय. इलेक्ट्रिक आँटो बसच्या एक्सिलेटरचा आवाज हा येत नसल्याने. एक्सिलेटर कितीही दाबले तरी त्याची तीव्रता ही समजत नाही आणि याचमुळे एक्सिलेटरचा चालकाला अंदाज आला नाही अस बोललं जातंय
कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येतीये... बेस्टच्या कंत्राटी चालकांना फक्त एकाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं तसंच त्यांना अत्यंत तुटपूंजा पगार दिला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटी चालक रिक्षा चालवतात अशी माहिती बेस्टच्या एका कंत्राटी चालकानं दिलीये.
आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा लाड यांनी केलाय. धमकी देणा-याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 2 हजार लोकांसह हल्ला करेन, असं या धमकीत म्हटल्याचं लाड यांनी म्हटलंय. कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं हा व्यक्ती सांगतोय, असं लाड यांनी म्हटलंय. धमकी देणा-याची चौकशी करून त्याला अटक करावी, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांकडं केलीय.
कुर्ला दुर्घटनेमधील आरोपी संजय मोरे याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे. त्या संदर्भातील प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे असे सूत्रांकडून कळत आहे.
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांची आता 16 पथके आरोपीच्या मागावर लावली आहेत. आरोपी संदर्भात आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यासाठी ह्यूमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळेत 'मातोश्री'वर बैठकीला सुरूवात होणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमधील ही पहिली भेट आहे. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. फडणवीसांची भेट घेऊन अदानी सागर बंगल्यावरून रवाना झाले आहेत.
हिंमत असेल तर सायंकाळपर्यंत एक खरमरीत पत्र लिहा असं थेट आव्हान भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरेंना बावनकुळेंनी आव्हान दिलं आहे. मी सायंकाळपर्यंत ठाकरेंच्या भूमिकेची प्रतीक्षा करणार आहे. त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधींना ठाकरेंनी एक पत्र लिहावे असं बावनकुळे म्हणाले आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकच्या विधानसभेमधून सावकरकांचं चित्र हटवण्याच्या निर्णयावरुन बावनकुळेंनी हा निशाणा साधला आहे.
नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला वेगळे वळण मिळालं आहे. येथे ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक झाला आहे. 13 तारखेला ईव्हीएम विरोधात शहरात भव्य मोर्चा काढला जाणार आहे. ईव्हीएम हद्दपार करून यापुढे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी वारकरी पंथाकडून करण्यात आली आहे. महंत श्री कृष्णराव बाबा मराठी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला वारकरी मंडळ तसेच महानुभाव पंथाचे महंत उपस्थित होते.
"कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात पाच निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आणि पंचवीसहून अधिक नागरिक जखमी झाले. कंत्राटी भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्यास देण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात पाच जणांचे जीव गेले नसते. त्यामुळं आतातरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावं," असं शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक सुरु. सकाळी 9 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. सकाळीच उमेदवार प्रशांत जगताप, सचिन दोडके 6 जनपथवर दाखल झाले. कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये ॲड अभिषेक मनु सिंघवी बैठकीत उपस्थित राहणार आहेत. काल एक बैठकीनंतर लागोपाठ ही दुसरी बैठक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करण्यावर उमेदवारांचे एकमत आहे. शिवाय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा विचार असल्याची माहितीही समोर येत आहे. राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पराभूत आमदार सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळं सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात घट झाली असून, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं या शीतलहरी अधिक वेगानं वाहत येत असल्यामुळं गारठा अधिक जाणवू लागला आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त
कुर्ल्यातील बस अपघातामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमी असलेल्यांची संख्या 49 वर पोहचल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसापासून ठाणे शहरातील वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी 9 डिसेंबरला सकाळी ठाणेकर नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. सकाळी शहरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती.जणू आपण एखाद्या हिल स्टेशनवर आलो आहोत. असा भास नागरिकांना होत होता. यंदाच्या वर्षीच्या हिवाळ्यात पहिल्यांदा तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सोमवारी सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी ठाण्यात 19.04 अंश तापमानाची नोंद झाली आहे .त्यानंतर दिवसभर ठाण्यात वातावरण थंडच होते.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात बस चालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्रथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे.
कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं आहे. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू तर 36 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पुढची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. काही वेळापूर्वी घटनस्थळी फॉरेन्सिकच्या टीम दाखल झाली असून या ठिकाणी पंचनामा करण्यात येत आहे.
धुळे शहरात 4 डिग्री निचाकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नऊ अंश सेल्सिअसवरुन तापमानाचा पारा चार अंश सेल्सिअसवर आला आहे. हे यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमान आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हुडहूडिमुळे अनेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या 'बेस्ट' बसच्या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढली आहे. सोमवारी रात्री या अपघातामध्ये तीन जण दगावल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचारादरम्यान एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा चार वर पोहोचला आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिल्याचं पाहायला मिळालं. एस. जी. बर्वे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युपीए सरकारमध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्रीही राहिले. मागील बऱ्याच काळापासून ते प्रकृतीविषय समस्यांंना तोंड देत होते
शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांनी सुद्धा मारकडवाडी मध्ये सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदार संघातील मारकडवाडी मध्ये आज आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत यांची सभा सकाळी 11 वाजता होणार आहे. ईव्हीएमविरोधात फेक नेरेटिव्ह महाविकास आघाडीकडून तयार केला जात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आमदार खोत आणि आमदार पडळकर यांची सभा मारकडवाडी गावात होणार आहे. या सभेसाठी संपूर्ण तालुक्यातून लोक बोलावून मारकडवाडीमध्ये भाजप शक्तीप्रदर्शन करणार आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. प्रदूषणामुळे प्रामुख्याने घशाच्या संसर्गाच्या तक्रारी वाढू लागल्या असून, यात सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. साधारणपणे 100 पैकी 70 रुग्णांमध्ये घशाचा संसर्ग असल्याचे निरीक्षण आता डॉक्टरांकडून नोंदविण्यात आले आहे. थंडीचे लांबलेले आगमन, तसेच कधी थंडी, कधी उष्म्यातील वाढ यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे.
दमट हवा आणि सतत घामाच्या धारांना सरावलेल्या मुंबईकरांना थंडीचे मोठे अप्रूप त्यामुळे हिवाळ्याची ते आवर्जून वाट पहात असतात. दिवाळीनंतर आलेल्या थंडीने या महानगरात बस्तान बसवले असे वाटत असतानाच पुन्हा गरमीने डोके वर काढले होते. मात्र, वा गरमीवर मात करून आता पुन्हा थंडी परतली असून, मुंबईचा पारा चक्क 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयीन पर्वत रांगांतून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंही परत आली असून, राज्यातील अनेक शहरांच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. विशेष म्हणजे मुंबईचे तापमान 13, तर महाबळेश्वरचे 15 असून, वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांना आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.
देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिल्याने 2023-24 या आर्थिक वर्षात तांब्याची मागणी 13 टक्के वाढून 1700 किलो टनांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय तांबा संघाने ही माहिती दिली. घरे, पायाभूत सुविधांच्या कामात तांब्याच्या वापर केला जातो.
मागील काही वर्षांमध्ये देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढत असून, त्यांच्या संपत्तीतही वाढ होत आहे. 10 वर्षांमध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या दुपटीहून अधिक वाढली. त्यांच्याजवळील संपत्ती तिप्पट झाल्याचे एका अहवालातून समोर आले. भारतात अशी स्थिती असतानाच जागतिक पातळीवर अब्जाधीशांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. यूबीएस बिलिनीअर अॅम्बिशन्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मागील 10 वर्षांत अब्जाधीशांची संख्या दुपटीहून अधिक वाढून 185 वर पोहोचली आहे एप्रिल 2024 पर्यंत त्यांच्याकडील संपत्ती तब्बल 263 टक्क्यांनी वाढली आहे. मागच्या वर्षात भारतातील अब्जाधीशांची संपत्ती 42 टक्के वाढून 905 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली.
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशाखाली नोंदले गेले,तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये सोमवारी तापमापकाचा पारा 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. रविवारच्या तुलनेत त्यात 3.5 अंशांची घट झाली असून किमान तापमानाच्या सरासरीपेक्षा ते 5.1 अंशानी कमी आहे.
अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर शासनाने आता बडगा उगारला आहे. अनधिकृतरीत्या झाड तोडण्यासाठी असलेली एक हजार रुपयांची शिक्षा आता थेट 50 हजार रुपये करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिनियमात शासन अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आल्याची माहिती सोमवारी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आली.
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशाखाली नोंदले गेले,तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 2264 घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ 4989 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर अर्ज विक्री-स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदवाढीनुसार आता 10 डिसेंबरऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढत असून, माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे. शहरातील हवेत 2023 मध्ये सरासरीपेक्षा जास्त नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण होते. ‘ग्रीनपीस इंडिया’ या संस्थेने 2019 ते 2023 मध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. कृत्रिम उपग्रहाद्वारे केलेल्या निरिक्षणानुसार मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत सरासरीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे अभ्यासादरम्यान निदर्शनास आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शंभुराज देसाई, उदय सामंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य म्हणून बेळगांवात जाण्याची शक्यता आहे.
मारकवाडीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि माजी आमदार राम सातपुते यांची सभा सकाळी 10.30 वाजता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुपारनंतर घेणार इव्हीएमबद्दल आक्षेप असणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेणार.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.