दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर.
आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केले आहेत. भास्कर केंद्रेंचा बीडमध्ये राखेचा व्यवसाय असल्याचा आरोप केलाय. सोबतच त्यांचे 15 जेसीबी आणि 100 डंपर असल्याचा दावाही केलाय. तसेच भास्कर केंद्र यांची मटका व्यावसायिकाशीही पार्टनरशिप असल्याचा आरोपही केलाय.
रायगडच्या पेणमध्ये लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आलाय. वडखळमधील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात मेलेला उंदीर सापडलाय. शालेय पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडल्याने पालकांमध्ये खळबळ उडालीय. घटनेनंतर पोषण आहाराची पाकिटे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. बीड प्रकरण तापलेल असताना मुंडे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना दिल्लीत काय खलंतल होणार याकडे सर्वांचे लक्ष.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपीविरोधात सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी सुरु आहे. आरोपीच्या पोलीस कोठडी वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पंकजा ताईंनी भगवान भक्तीगडाचा दसरा मेळावा झाला यात एक वाक्य वापरलं होतं. ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही असं त्या बोलल्या होत्या. आता आज जो फोन त्या लेडीचा झाला त्यात मला बघायचं आहे वाल्मिक अण्णांचं पान कसं हलत नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
वाल्मिक कराडला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावं. करुणा शर्माच्या गाडीत पिस्तुल ठेवलं गेलं, पोलिसांचाही सहभाग. मुख्यमंत्री 5 तारखेला आष्टी मतदारसंघात येणार आहेत. काही अधिकारी आणि कर्मचारी 20 वर्षांपासून परळीतच असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आलीये. ही सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार आहे.
वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून देण्याबाबत पोलिसांना कराडने हा फोन केला होता. घाबरू नका इथे बाप बसला आहे ना कराडचा कार्यकर्त्यांना सल्ला. बीडच्या सायबर पोलीस अधिकाऱ्याला कॉल केल्याची चर्चा.
झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनिल परबांचं नाव घेतलंय. त्यावर अनिल परबांनी स्पष्टीकरण दिलंय. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलीस चार्जशीट कोर्टाला देणार त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचं अनिल परब म्हणालेत.
कॅबिनेट बैठक संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाल्याची माहिती. तिघांमध्ये केवळ 5 मिनिटांची बैठक झाल्याची माहिती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीला जोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती.
'संदीप क्षीरसागरांकडे येवढी माहिती कशी आली?' आंधळे आणि क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर केलाय.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंनी केलेल्या कारनाम्याची माहिती पुराव्यासह दिलीय. अजित पवारांनी सर्व कागदपत्रे पाहूनं गंभीर प्रकार असल्याचं सांगितल्याची माहिती दमानियांनी अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीय. आज अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे. या भेटीत धनंजय मुंडेंबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळतेय. धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा अंजली दमानियांनी दिलीय.
इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानेच लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. देगलूर तालुक्यातील मरखेल येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या सदानंद भूताळे हा शिक्षक आपल्याच शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा गेल्या एक महिन्यांपासून लैंगिक उद्देशाने पाठलाग करत होता. शिवाय शिक्षकाने फिर्यादी मुलीच्या आईच्या मोबाईलवर मॅसेज करून तिलाही त्रास दिला. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध पोकसोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
राज्य नाही पण केंद्र सरकार अस्थिर होण्याची मोठी चिन्ह आहेत, असं विधान उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. "केंद्रात अमित शहा आणि मोदी यांची वेगवगेळी भूमिका आहे, असं अंधारेंनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. "केंद्रातील सरकार स्वत: अमित शहा यांना अस्थिर करायचं आहे. केंद्रात ते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांनाच नाही तर नरेंद्र मोदी यांना सुद्धा आव्हान देऊ शकतात," असं विधानही अंधारेंनी केलं आहे.
कोल्हापूर जिल्हात देखील 'गिया बार्रे' सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात 14 रुग्ण आढळून आलेत. 14 पैकी 12 रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सध्या दोनच रुग्णांवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिलीय. उपचार घेत असलेले रुग्ण हे धोक्याच्या बाहेर असून एक रुग्ण 12 वर्षीय मुलगी आहे. ती मुळची झरखंडची आहे, पण तिचे सध्याचे वास्तव्य हुपरीमध्ये आहे तर दुसरा रुग्ण कर्नाटकमधील कंगनोळीचा असून तो 60 वर्षीय आहे. जीबी सिंड्रोमचा प्रसार पाहता आरोग्यमंत्र्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून प्रमिलाराजे रुग्णालयात 70 व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आल्याचे देखील डीन यांनी सांगितले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी उकळून पाणी पिणे गरजेचे असून बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावं असा आवाहन करण्यात आलं आहे.
धाराशीवमधील श्री तुळजाभवानी मंदिरात महिलांना तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचे चरणस्पर्श करण्याच्या मुद्द्यावरुन दोन पुजारी मंडळांमध्ये वाद झाला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या बैठकीत विश्वस्तांनी हा चरण स्पर्श करण्यासंदर्भातील ठराव घेतल्याने दोन्ही पुजारी मंडळातील वादाला सुरुवात झाली.
जीबीएस आजारामुळं घाबरून जायचे कारण नाही. राज्यातील मोठ्या रूग्णालयात दर महिन्याला चार पाच जीबीएसचे रूग्ण येतच असतात.तो काही नवीन आजार नाहीय. केवळ पुण्यात अचानक रूग्ण वाढलेले आहेत,तेही केवळ तिथल्या नांदेड गावात. तेथील विहिरीतील पाण्यामुळं रूग्ण वाढत आहेत. त्यासाठीच काल जावून मी तिथं आढावा घेतला, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे.
मालवणमधील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. या कामाच्या चौथऱ्याचे काम सुरू असून यात स्टेनलेस स्टीलचा वापर केला जात आहे. राज्य शासन राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभारत आहे. पुतळा उभारणीचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये आरोपीला मदत करणारी ही महिला पश्चिम बंगालमधील आहे. या महिलेनेच आरोपीला मोबाईलमधील सीम कार्ड घेऊन दिलं होतं. या महिलेचं नावही समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सीम कार्ड घेऊन देणाऱ्या महिलेचं नाव खाऊकूमोई शेख असं आहे. मुंबई पोलिसांची एक टीम सैफ हल्ला प्रकरणाच्या चौकशीसाठी पश्चिम बंगालमध्ये गेली आहे. या टीमनेच या महिलेचा जबाब नोंदवला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी सैफ हल्ला प्रकरणात केलेल्या चौकशीमध्ये या महिलेसंदर्भात सध्या तरी कोणतीही शंका उपस्थित करण्यात आलेली नाही. मात्र या महिलेने आरोपीला सीम कार्ड घेऊन देण्यासाठी चुकीच्या मार्गाने मदत केली असेल तर पोलीस या अनुषंगाने पुढे तपास करतील असं मुंबई पोलिसांना सांगितलं आहे. सध्या तरी या महिलेकडे मुंबई पोलिसांच्या टीमने केवळ चौकशी केली आहे. मुंबई पोलिसांनी सध्या तरी या महिलेला ताब्यात घेतलेलं नाही किंवा अटक केलेलं नाही, असंही स्पष्ट केलं आहे.
मलिक्काजुर्न खरगे यांनी हिंदूंचा अपमान केलाय, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदवली आहे. खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाकुंभमध्ये स्नान केल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का? असा सवाल केला होता. यावरुनच बोलताना, "खरगे यांनी माफी मागायला हवी. नाना पटोले, वडेट्टीवार यांना त्यांची ही भूमिका मान्य आहे का?" असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे. "नाना पटोले वडेट्टीवार यांनी माफी मागायला हवी. लोकांनी काँग्रेसला आधीच नाकारले आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडायला पाहिजे होती. एमआयएम आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एक झालाय. कदाचित ते पालिका निवडणुकीत एमआयएमसोबत जातील. एमआयएमची भूमिका उद्धव ठाकरे मांडत आहेत," असंही बावनकुळे म्हणालेत.
यवतमाळच्या जवाहरनगर भारी येथे कुऱ्हाडीचे घाव घालून जावयाने सासऱ्याची हत्या केली आहे. दिलीप वाडेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर रचीन्द्र झिबलकर असे मारेकरी जावयाचे नाव आहे. जावई मुलीला नेहमी मारहाण करीत असल्याने दिलीप हे त्यांच्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी आले असता, जावयाने कुऱ्हाडीचे घाव घालून सासऱ्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मालेगाव मार्गावर ट्रकमध्ये दबून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये भरलेल्या लोखंडी प्लेटखाली दबून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्वजण कर्नाटकवरून मध्य प्रदेशात जात होते. छत्रपती संभाजीनगर मालेगाव महामार्गावर शिउर परिसरात हा प्रकार लक्षात आला. कामगारांच्या मृतदेहावर शिऊर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. चार कामगारांचा प्लेटखाली दबून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
येत्या 30 जानेवारी रोजी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली. बीडच्या पालकमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येणार आहेत. 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समितीचे बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित किती, स्थिती काय प्रलंबित राहण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली.
धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटलांच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले आहेत. जालन्यामध्ये सुरु असलेल्या जरांगेच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 'संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल,' असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. 'जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा', अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केलीय.
सकाळी 07 वाजून 56 वाजताच्या सुमारास ठाण्यातील हायपर सिटी मॉलला आग लागली आहे. हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. घटनास्थळी कासारवडवली पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 1-पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान, रेस्क्यू वाहनासह, फायर वाहनासह, हायराईस फायर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
- 'गिया बार्रे' म्हणजेच जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर.
- अचानकपणे हाता - पायात, चालताना अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- जास्त काळाचा ताप, खोकला , उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास त्वरित आरोग्य केंद्रात चाचण्या करून घेण्याच्या सूचना.
- वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार न घेण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे आवाहन.
- जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सतर्क राहण्याच्या महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना.
बीड पोलिस दलात एकाच जातीचे पोलिस भरले आहेत, असा आरोप सुरू आहेत, त्यामुळं पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक अनोखा आदेश लागू केला. यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानेच बोलवायचे, आडनाव घ्यायचे नाही, असे आदेशात म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे.
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात गीया बार्रे या आजाराने थैमान घातले आहे. मात्र मावळ तालुक्यात या आजाराचा सुदैवाने एकही रुग्ण सापडला नाही. मात्र मावळ तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मावळ तालुक्यातील आरोग्य विभागाने नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात प्रामुख्याने उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळावे, जुलाब तसेच अशक्तपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा अशा सूचना मावळ तालुक्यातील आरोग्य विभागाद्वारे नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
जरांगे कोअर कमिटीतील 8 जणांना गोंदी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.अंतरवालीत जरांगे यांच्यासह उपोषणात बसलेल्या ईतर उपोषणकर्त्यांच्या जुन्या आजारांचे वैद्यकीय रिपोर्ट उपलब्ध करून न दिल्याने पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. उपोषणातील सर्व उपोषणकर्त्यांच्या नावाच्या संविस्तर यादीसह त्यांचे मोबाईल क्रमांक,उपोषणकर्त्यांचे पत्ते द्या अशी मागणी पोलिसांनी कोअर कमिटीकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांना औषधोपचार घेण्याचे निर्देश दिले आहे तरीही उपोषणकर्ते उपचार घेत नसल्यानं त्यांच्या तब्बेतीवर परीणाम होत असून उपोषणकर्त्यांच्या जीवावर बरे वाईट परीणाम होणार नाही याची काळजी घ्या असंही या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
उल्हासनगरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी 12 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच बांगलादेशी नागरिकाने अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केला होता त्यानंतर प्रशासन सतर्क होऊन त्यांनी बांगलादेशी नागरिकांना पकडण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता उल्हासनगर शहरात शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपल्या परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1 हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामासाठी ठेवण्याआधी त्याची चौकशी करावी असे आव्हान व्यापाऱ्यांना केले आहे.
वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम नाका येथील एका हॉटेल व्यवसायिकाच्या दुकानाला अचानक आग लागून शेजारील सलून दुकानासह दोन्ही दुकाने जळून खाक झाली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणली.
बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली बाबत आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन बोलणार आहेत. बीड जिल्ह्यात काही अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा धस यांचा गंभीर आरोप आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची धस मागणी करणार आहेत.
आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भेट घेणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकमांच्या नेमणुकीची फेरमागणी करणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना सांगलीच्या इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून चोरीतील 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जय संजय जाधव(वय 19) आणि प्रथमेश दत्तात्रय गवते(वय 20) (दोघेही राहणार कराड, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही पेठनाका येथे विनानंबर प्लेटची गाडी घेऊन संशयितरित्या फिरत असताना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.याप्रकरणी अधिक सखोल चौकशी केली असता दोघांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचं समोर आले असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सांगलीच्या विटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा तरूणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 95 हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. राहुल देवकुळे आणि महावीर चव्हाण,असे गांजा विक्री करणारया तरुणांची नावे आहेत. विटा शहरातील मायणी रोडवर गजा विक्रीसाठी काही तरूण येणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर विटा पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली असता त्यांच्याकडे गांजा साठा आढळून आला.
शहापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शिंदे सेनेत प्रवेश केलायं. असंख्य शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं शहापूरात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना खिंडार पडलं आहे. यामुळं उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक धक्का बसला आहे. शहापूरातील शिवसैनिकांच्या गाड्यांचा भलामोठा ताफा ठाण्याच्या दिशेने जाऊन आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती शहर प्रमुख विजय भगत यांनी दिली.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.