Meghalay Night Curfew : मेघालयमध्ये दोन महिन्यांसाठी नाईट कर्फ्यू.. रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्याचा निर्णय.. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Abdul Rauf Azhar : भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी रऊफ अजहरचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. रौफ अजहर हा कंदहार विमान अपहरणात सहभागी होता...
Operation Sindoor : राजधानी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.. जवळपास दीड तास ही बैठक चालली.. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 दहशतवादी मारल्याची माहिती सरकारनं दिली.. या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या काळात आम्ही सरकारसोबत असल्याचं खरगे आणि राहुल गांधींनी सांगितलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणीकोंडी करण्यासाठी सरकारने धरणाचे दरवाजे बंद केले होते...आता पावसामुळे दरवाजे उघडण्यात आले आहेत...त्यामुळे आता पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण होऊ शकते... पाणीकोंडीनंतर पाकिस्तानला आता पूरस्थितीचा धोका...
PM Modi : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले, अशी माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे.दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाव ठरविण्यात आले. या हल्ल्यात अनेक पुरुषांचा मृत्यू झाला. ज्यामुळे त्यांच्या पत्नींचे कुंकू अर्थात सिंदूर पुसले गेले. भारतीय संस्कृतीत सिंदूर हे विवाहित महिलेच्या सौभाग्याचे आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. हल्ल्याने अनेक महिलांचे सौभाग्य हिरावले आणि त्यांच्या दुःखाचा बदला घेण्याच्या संकल्पातून या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आले. ‘सिंदूर’ हे केवळ सौभाग्याचे प्रतीक नसून, शौर्य, बलिदान आणि न्यायाचेही प्रतीक आहे. या नावाने दहशतवाद्यांना कठोर संदेश देण्याचा आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त होतो.
India Vs Pakistan : पाकिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट...लाहोर, कराचीनंतर गुजरांवालामध्ये स्फोट...लाहोर, कराचीनंतर पाकिस्तानात तिसरा स्फोट..स्फोटानंतर शहरात गोंधळाचं वातावरण...स्फोट झालेला परिसर लष्कराकडून सील
India : अझरबैजानमध्ये 250 भारतीय प्रवासी अडकलेत... भारत-पाकिस्तान देशांमधील युद्धजन्य परिस्थीतीचा फटकाया प्रवाशांना बसलाय... पाकिस्ताननं हवाई हद्दीमध्ये भारतात येणा-या विमानांना प्रवेश नाकारलाय. त्यामुळे या प्रवाशांच्या परतीचा मार्ग बंद झालाय... यातली काही प्रवासी बाकु येथे आयोजित एका कॉन्फरन्ससाठी गेले होते होते. 6 मे रोजी ते परत निघाले दरम्यान पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणा-या विमानांना प्रवेश नाकारला. त्यामुळे त्यांचं विमान बाकूला परत गेले. या ठिकाणी पोहोचल्यावर प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची तक्रार या प्रवाशांनी केलीये.
China imposes tariffs on India : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानचा मित्र म्हणवत असलेल्या चीननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. चीननं भारतावर 166 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावलाय.. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं भारतातून आयात होणाऱ्या सायपरमेथ्रिनवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी 48.6 टक्क्यांवरून 166.2 टक्के लागू करणार असल्याचं म्हटलं आहे. सायपरमेथ्रिन हे एक कीटकनाशक आहे जे कृषी आणि स्वच्छता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कापूस, भाजीपाला, मका, फुलं यासह विविध पिकांवरील किड नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ?...राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात.. याला निमित्त ठरलंय शरद पवारांचं मोठं वक्तव्य... आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय... इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय.. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय... पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात...
Gujarat : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सुरक्षा वाढवली...सीमेलगतच्या कच्छमध्ये कडेकोट सुरक्षा...भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ...भुज विमानतळ, रेल्वे स्टेशन भागात चोख सुरक्षा...पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी
Shahbaz Sharif : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. या शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ अशी दर्पोक्ती शाहबाज शरीफ यांनी केलीय.. शाहबाज शरीफ यांनी बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात शरीफ यांनी भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला.. यावेळी पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असा दावाही शरीफ यांनी पुन्हा केला. शहबाज यांनी आपल्या मुलाखतीत भारताला धमकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचे कौतुक केलं. तसंच पाकिस्तान मागे हटणार नसल्याचं सांगत पोकळ धमकी दिली...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Gold : भारत-पाक तणावाचा सोन्याच्या दरावर परिणाम...सोन्याचे दर जीएसटीसह पुन्हा लाखावर...सलग दोन दिवस सोन्याचा दरात वाढ...सोने 1 लाख 10 हजारांवर जाण्याची शक्यता...सोने प्रतितोळा 97 हजार 200 रुपयांवर...गेल्या महिन्यात 22 एप्रिलला प्रतितोळा सोन्याची किंमत 1 लाखांवर पोहोचली होती... आता पुन्हा एकदा सोने जीएसटीसह लाखावर गेले आहे...वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाख 10 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला.. यानंतर पाकिस्तान चांगलाच हादरला... भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.. यामुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात प्रचंड गोँधळ निर्माण झाला... यानंतर संपूर्ण सियालकोट शहर रिकामं करण्यात आलं... तिकडे भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीनं रावळपिंडी आणि लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला.. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात घबराट पसरल्याचं पाहायला मिळतंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
State Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून कोसळणा-या अवकाळी पावसाचा वेग आजही कायम राहणार आहे...मुंबईत जोरदार वा-यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे...तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे...
Emergency In Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय.. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील सर्व रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय.. सर्व कर्मचा-यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्यात... तसंच पाकिस्तानातील अनेक शहरात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय.. मुल्तान, फैसलाबाद, इस्लामाबाद, बहावलपूरमध्येही नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय..
Operation Sindoor : पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचे बळी घेणा-या पाकिस्तान आश्रित दहशतवाद्यांना भारताने कायमची अद्दल घडवली... भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादाचा खात्मा केलाय... भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 120 अधिक दहशतवादी मारले गेलेत...भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री अवघ्या 25 मिनिटांत केलेल्या अचूक हल्ल्यात लष्कर,जैशसह हिजबुलचं कंबरडं मोडलंय..तोयबाच्या 6 टॉप कमांडरसह अनेक मोठे दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.