Uddhav Thackeray vs Eknath Shinde Crisis Live Updates: राज्यातील सत्तासंघर्षावरील मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी आज पुन्हा सुरु होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत अनेक कायदेशीर मु्द्दे कोर्टात मांडण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाच्या वकिलांचा संपूर्ण युक्तिवाद संपल्यानंतर आता पुढील सुनावणीवेळी शिंदे गट आणि राज्यपालांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट या राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
'राज्यपालांचे ते पत्र म्हणजे सरकार पाडण्याचे पहिले पाऊल'
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित करुन खडे बोल सुनावले आहेत. शिवसेना आणि महाविकासाघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंनतर राज्यापालांनी सरकारला बहुमत चाचणीसाठी एकही पत्र लिहीले नाही. मात्र, एकाच आठवड्यात राज्यपालांनी सहा पत्रं कशी लिहीली? राज्यपालांचे पत्र म्हणजे सरकार पाडण्याचे पहिले पाऊल ठरत आहे. ही राज्यपालांनी कृती योग्य नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
#SupremeCourt Constitution Bench to resume hearing the Shiv Sena case between #UddhavThackeray and #EknathShinde factions.
Follow this thread for live-updates.#SupremeCourtOfIndia #ShivSenaCrisis pic.twitter.com/ldrR4XcQKS
— Live Law (@LiveLawIndia) March 15, 2023
Maharashtra Political Crisis Updates : “तीन पक्षांच्या युतीमध्ये, तिघांपैकी एका पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत. इतर दोघे युतीत ठाम आहेत. तिथे कोणत्याही प्रकारे साइडकिक्स नाहीत. ते जवळजवळ सत्तेवरच आहेत.” - CJI DY चंद्रचूड
दुसरी गोष्ट राज्यपालांनी लक्षात ठेवली पाहिजे...
Maharashtra Political Crisis Updates : CJI DY चंद्रचूड : दुसरी गोष्ट राज्यपालांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या तारखेपर्यंत शिवसेना भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहे अशी एकही सूचना नाही. कॉंग्रेस आणि NCP चा ही संबंध आहे, INC किंवा NCP मध्ये कोणताही अंतर्गत मतभेद नाही.
Maharashtra Political Crisis Updates : राज्यपालांचा 10 व्या अनुसूचीशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही आणि त्यांना फक्त सरकार स्थिर आहे की नाही हे पाहायचे आहे. - तुषार मेहता
तुषार मेहता म्हणाले, राज्यपालांना हे पाहावे लागेल की राज्यघटनेचे पालन केले जाते आणि स्थिर सरकार दिले जाते. त्यासाठी फ्लोर टेस्टसाठी बोलावावे लागते.”
Maharashtra Political Crisis Updates : राज्यपालांचा 10 व्या अनुसूचीशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही आणि त्यांना फक्त सरकार स्थिर आहे की नाही हे पाहायचे आहे.
CJI चंद्रचूड : 97 INC आणि NCP चे आमदार एकत्र आहेत हे पाहण्यात राज्यपाल अयशस्वी ठरले आहेत आणि तोपर्यंत शिंदे भाजपसोबत जाणार आहेत अशी कोणतीही सूचना नव्हती जी नंतर झाली.
“हेही पाहावे लागेल की राज्यपालांचे काय? त्यांनी या अधिकारांचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे.” - CJI DY चंद्रचूड
Maharashtra Political Crisis Updates : तुम्हाला नेतृत्वाचा वारसा मिळू शकतो आणि नेतृत्वगुण असणे आवश्यक नाही.” - तुषार मेहता
तीन वर्षे ते एकत्र होते आणि रातोरात असे काय घडले. अचानक काय कारण होते आणि तेही तीन वर्षांनंतर आणि बहुतेक मंत्री होते…” - CJI चंद्रचूड
“मैं चुप रहा तो और गलत फ़हमियाँ बड़ी, वो भी सुना है हमने जो मैंने कहा नहीं।” राज्यपालांची बाजू मांडणारे तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात शायरी सादर केली
'राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावे'
Maharashtra Political Crisis Updates : 40 मृतदेह परत येतील वगैरे वक्तव्ये अतिरंजित आहेत आणि सुसंस्कृत राज्यात असे काहीही होऊ शकत नाही परंतु राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. आमदारांना धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा राज्यपालांनी कार्यवाही करणे बंधनकारक असते, असे CJI चंद्रचूड म्हणालेत.
Maharashtra Political Crisis Updates : CJI चंद्रचूड म्हणाले, की राज्यपाल विश्वासदर्शक ठरावाला परवानगी देऊन पक्ष तोडत आहेत. हे उघड आहे की महाविकास आघाडीनं नंबर गेम गमावला आहे. परंतु राज्यपालांनी यामध्ये पडू नये आणि दूर राहायला हवं होतं. आमदार जर नेत्यावर खूष नसतील तर त्यांच्याकडे इतर मार्ग आहेत ते म्हणू शकतात की नेत्याला काढून टाका. पण MVA सरकार कायदेशीररित्या स्थापन झाले.
Maharashtra Political Crisis Updates : राज्यपालांनी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश दिले की आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा पुरवली जाईल. राज्य पोलीस कारवाई करत नसल्याने केंद्रीय दलेही सज्ज ठेवण्यात आली.
राज्याच्या मुख्य सचिवांनाही कळवण्यात आले. गृहसचिव, DGP यांना माहिती दिलीः तुषार मेहता SG
25 जून रोजी शिवसेनेचे 38 आमदार +2 प्रहार आणि 7 अपक्ष अशा एकूण 47 जणांनी राज्यपालांना पत्र लिहून सांगितले की त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे आणि संजय राऊत यांची व्हिडीओ क्लिप दाखविली, त्यात राऊत म्हणताहेत की, ते महाराष्ट्रात जिवंत परतणार नाहीत. - तुषार मेहता
Maharashtra Political Crisis Updates : 34 आमदारांनी ठराव मंजूर करून राज्यपाल आणि सभापतींना पाठवला की शिंदे हे विधानसभेतील त्यांचे शिवसेना गटनेते आहेत. 21 जूनचे हे पत्र आहे. राज्यपालांची बाजू तुषार मेहता यांनी मांडली.
Maharashtra Political Crisis Updates : एक राजकीय पक्ष आणि दुसरा विधिमंडळ पक्ष आहे. विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाने केलाय.
4. राज्यपालांना फ्लोर टेस्टसाठी बोलावण्याचा अधिकार सरकार स्थापन होण्यापूर्वीच असतो. शिवराजसिंह चौहान केसमध्ये आले आहे. तो चांगला कायदा आहे.
5. राज्यपालांनी पक्षाच्या प्रमुखांना नाही तर एकनाथ शिंदे यांना का आमंत्रित केले.
सॅालिस्टर जनरल तुषार मेहता यांनी 7 मुद्दे मांडले..
1. राज्यपालांना दिलेली वस्तुनिष्ठ सामग्री आहे.
2. राज्यपाल दहावी अनुसूची आणि त्यामुळे निर्माण होणा-या परिणामांशी संबंध नाही.
3. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगण्याऐवजी अविश्वास प्रस्ताव आणण्याची आवश्यकता होती ?
Maharashtra Political Crisis Updates : सत्ता संघर्षाची सुनावणी : आज राज्यपालांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता युक्तीवाद करणार आहेत. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास शिंदेंना का सांगितले यावर युक्तीवाद होईल?
राज्याच्या सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज संपणार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज संपणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या वतीने काल ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता आज युक्तिवाद करणार आहेत.10-15 मिनिटांमध्ये मुद्दे मांडू असं मेहता यांनी सरन्यायाधीशांना सांगितलं आहे. मेहतांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी रिजॉईंडर मांडणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.