Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
पाकिस्तान सैन्याकडून जम्मू काश्मिर एअरपोर्टवर रॉकेट हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर येतेय. सध्या जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलंय.
Operation Sindoor : भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर देशातील 'या' जिल्ह्यात आजपासून 8 तासांसाठी ब्लॅकआउट#IndiaPakistanTensions #OperationSindoor #IndiaPakistanWar2025 https://t.co/X4LIW7PWsD
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून दिल्या गेलेल्या शासकीय अंत्यसंस्कारांचे चित्र दाखवले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून शासकीय अंत्यसंस्कार दिल्याचे फोटो शेअर केले आहेत. परराष्ट्र सचिव ह्यांनी ब्रिफींग दरम्यान हे फोटो दाखवले
परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत भारताने आपली कारवाई ही लक्ष केंद्रित, मोजून आणि तणाव न वाढवणारी असल्याचे स्पष्ट केले होते. विशेषतः हे नमूद केले होते की, पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले गेले नाही. तसेच, भारतातील लष्करी ठिकाणांवर कोणत्याही हल्ल्यास योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असेही पुन्हा सांगण्यात आले होते."
"7-8 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर - अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फालोदी, उत्तरलाई आणि भुज येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सशस्त्र दलाच्या समाकलित UAS (ड्रोन) ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व हल्ले निष्फळ केले. या हल्ल्यांचे अवशेष सध्या अनेक ठिकाणांवरून मिळत आहेत, जे पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांचा स्पष्ट पुरावा आहेत."
विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, "पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये एलओसीवर विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे 16 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारतीय लष्कराला पाकिस्तानी मोर्टार आणि तोफगोळ्यांच्या गोळीबाराला उत्तर देण्यास भाग पाडले गेले. भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ते तणाव वाढवू इच्छित नाहीत, परंतु पाकिस्तानी लष्करानेही याचा आदर केला पाहिजे."
Operation Sindoor: परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, काळ्या कारनाम्यांची यादीच सांगितली#IndiaPakistanWar https://t.co/h4OAtsLvoM
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा सुरू असताना पाकिस्तानने TRF (द रेसिस्टन्स फ्रंट) च्या भूमिकेचा विरोध केला. हे त्यानंतर झाले जेव्हा TRF ने हल्ल्याची जबाबदारी एकदा नाही तर दोन वेळा स्वीकारली होती. कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांनी काल आणि आज स्पष्टपणे सांगितले की, भारताची कारवाई तणाव वाढवणारी नाही, ती अचूक आणि मोजलेली आहे. आमचा हेतू परिस्थिती ताणायचा नाही, तर केवळ वाढत्या तणावाला उत्तर देणे आहे. कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले गेलेले नाही; फक्त दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत."
परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांची दिल्लीत पत्रकार परिषद सुरु झाली. भारतावर पाकिस्तानने काल रात्री आणि आज सकाळी उत्तर आणि पश्चिम भागात अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले - परराष्ट्र मंत्रालय. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने एकात्मिक UAS (ड्रोन) ग्रिडद्वारे पाकिस्तानच्या हल्ल्यांचे प्रयत्न निष्फळ केले. हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून ते हल्ल्याचा पुरावा आहेत. लाहोरसह अनेक ठिकाणी पाकिस्तानचे एअर डिफेन्स रडार आणि प्रणाली भारताने उद्ध्वस्त केल्यानियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानकडून बिनधास्त आणि उद्दाम गोळीबार सुरू होता, तर 16 निष्पाप नागरिकांचा यात मृत्यू झाला. भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर, मोर्टार आणि तोफांची जोरदार गोळीबार झाला. यात लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की पाकिस्तानकडून ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला. तर पाकिस्तानचा हल्ला हा भारताकडून परतावून लावण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) भारतातील सर्व OTT प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि इंटरमीडिएरींना पाकिस्तानातील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग सामग्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन मुख्यलयात रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत. जळगावचा तरुण लग्नाच्या अवघ्या 2 दिवसांतच रवाना झाला आहे.
India Pakistan War : लग्नाची हळदही उतरली नव्हती अन्... जळगावचा जवान मनोज पाटील 2 दिवसांत कर्तव्यावर रवानाhttps://t.co/rXxCexU0Ha#IndianArmy #IndiaPakistanTensions #OperationSindoor2 #ManojPatil
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी रऊफ अजहरचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. रौफ अजहर हा कंदहार विमान अपहरणात सहभागी होता...
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरलीय. पाकिस्तानात मुख्य विमानतळांवरील सेवा निलंबित करण्यात आलीय. कराची, सियालकोट, लाहोर विमानतळावर सेवा निलंबित करण्यात आलीय. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात घबराट निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादला जाणारी अनेक विमानं आता यूटर्न घेतायत.
Operation Sindoor नंतर पाकिस्तान Twin Strike च्या स्फोटांनी हादरलं; लष्कराचं वाहन क्षणात चक्काचूर, 14 सैनिकांचा मृत्यू https://t.co/WaZkwpepQc
पाकिस्तानच्या लष्करी वाहनाचा लक्ष्यभेद; स्फोट होताच सगळं चक्काचूर, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर #news #OperationSindoor #pakistan #BLA— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर, भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली देखील नष्ट केली आहे. भारत सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतातील १५ शहरांमध्ये असलेल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा मनसबुा भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. हे हल्ले हाणून पाडण्यासोबतच, भारतीय सैन्याने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ9 देखील नष्ट केली आहे. हे पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. पाकिस्तानने लाखो डॉलर्स खर्च करून चीनकडून ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली होती.
Operation Sindoor 2.0 : भारतीय सैन्याने आतापर्यंत कोणकोणत्या देशांच्या शस्त्रांचा केलाय नायनाटhttps://t.co/u9pIOAUQ7A#INDIANPAKISTANWAR #IndianArmy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला. पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला उडवलं आहे. हल्ल्यात 12 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूसुरुंग स्फोटानं पाकिस्तानी लष्कराचं वाहन उडवलं
भारताकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्ध्वस्त केलं आहे. पाककडून भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता पण पाकच्या हल्ल्याचा कट भारतानं उधळून लावला आहे. जम्मूमधील हल्ल्याचा पाकचा प्रयत्न हा फसला आहे. भारताच्या S-400नं पाकचे हल्ले परतवून लावले. पाकचा पठाणकोटमधील हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तानला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चंदीगडमधील हल्ल्याचा पाकचा प्रयत्न फसला आहे.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला. पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला उडवलं आहे. हल्ल्यात 12 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूसुरुंग स्फोटानं पाकिस्तानी लष्कराचं वाहन उडवलं
मेघालयातील ईस्ट खासी हिल्समध्ये 2 महिन्यांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान आणि पीओकेमध्ये कारवाई ऑपरेशन सिंदूर सुरुच आहे , असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असं म्हणाले. दहशतवाद्याचे 9 तळे उदध्वस्त केले आहेत. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामा विषयी बोलताना म्हणाले, 2014 मध्ये सरकार आल्यानंतर पंतप्रधानांनी सुरक्षा रक्षणेकडे लक्ष दिले. तर आता भारतीय सैनेनं पराक्रम दाखवला आहे.
भारत- बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बांगलादेश सीमेवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. बांगलादेशनं दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. कारण काही दिवसांपूर्वी बांगलादेशने दिला होता ईशान्येकडील राज्ये ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तान हादरलं आहे. सर्वसामान्य जनतेपासून राजकारणी देखील घाबरले आहेत. पाकिस्तानचे खासदार ताहिर इकबाल धायमोकलून हे संसदेत रडले आहेत. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की 'आता आम्हाला कोण वाचवणार?'
'आता आम्हाला कोण वाचवणार?' भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला, माजी लष्करप्रमुख ढसाढसा रडला!#IndiaVsPakistanhttps://t.co/AzHJxqd2yH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्धवस्त झालं आहे. याच स्टेडियमवर आज पाकिस्तानची मॅच होती. मात्र, हे स्टेडियम आता उद्धवस्त झालं आहे. हल्ल्यानंतर पीएसलचा सामना रद्द करण्यात आला आहे.
भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! आज होणार होती PSL ची मॅच#Rawalpindi #rawalpindistadium #MarathiNews #OperationSindoor https://t.co/tX1rmJHmTX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये ब्लॅकआऊट घोषित करण्यात आला आहे. रात्री 9 ते उद्या पहाटे 5 पर्यंत ब्लॅकआऊट करण्याचे आदेश. कारण पाकिस्ताननं देखील ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून भारतानं त्यावर अॅक्शन घेत हा निर्णय घेतला आहे.
भारताच्या हल्लानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ. पाकिस्ताननं इराणकडे ड्रोणची मागणी केली आहे. त्यांनी थेट इराणकडे याचना केली आहे. इराणकडे शस्त्र आणि ड्रोनची मागणी त्यांनी केली आहे. दहशतवादाला कोणताही देश पाठिंबा देणार नाही हे कळल्यानंतर पाकिस्ताननं इराणकडे मदतीची याचना केली आहे.
भारतीय लष्कराची मोठी कारवाई! पाकिस्तान रडार सिस्टिम उद्ध्वस्त, 4 राज्यांतील 15 शहरांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला#IndiaPakistanWar https://t.co/BrsTMYUsQ1
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
ऑपरेशन सिंदूरनंतर आता सध्य परिस्थिती पाहता अमेरिकेनं लाहोरसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना लाहोर सोडण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा दिला सल्ला.
पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली जातेय. त्याला आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर देत म्हटलं की 'भारतावर पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास त्याला जोरदार उत्तर देण्यात येणार.' भारत इराण दरम्यानच्या 20 व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत जयशंकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. त्याला आता भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. एस -400 नं सर्व हल्ले उधळले. पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टम नेस्तेनाबूत लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टम भारताकडून उद्धवस्त करण्यात आलं आहे. ही माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती दिली.
पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासोबतचं उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
लाहौर
कसूर
कराची
बहावलनगर
गुजरांवाला
रावळपिंडी
सियालकोट
शेखुपुरा
नरवाल
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये काल रात्री एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा. सीमा सुरक्षा दलाने (BSF) मध्यरात्री केला खात्मा. पाकिस्तानी घुसखोर अंधाराचा फायदा घेत ओलांडत होता सीमा. BSF जवानांच्या व्यक्ती नजरेत आल्यावर त्यांनी केला गोळीबार. आज सकाळी उजाडल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
-एस टी बसला डंपरची जोरदार धडक.
-अपघातात चार चण जागीच ठार तर 20 प्रवासी जखमी
-पोलीस अपघातस्थळी दाखल.
-जखमीना तळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलवले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाल्याची माहिती आहे. तर आता कराचीमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे.
13818 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन… 121 जवान शहीद… RTI द्वारे समोर आलेले पाकिस्तानचे खरे रूप!
2014 ते 2021 दरम्यान पाकिस्तानकडून 13800 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; 121 भारतीय जवान शहीद, 595 जखमी – RTI द्वारे प्रफुल्ल सारडा यांना मिळालेली धक्कादायक माहिती
RTI कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा म्हणतात, “2003 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेला शस्त्रसंधी करार हा सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी होता. पण पाकिस्तान सातत्याने ceasefire violation करत असून, हे ‘आतंकीखेळ’ स्पष्टपणे दर्शवतो!”
विशेषतः 2019 आणि 2020 या दोन वर्षांत शस्त्रसंधी उल्लंघनांचे सर्वाधिक प्रकार नोंदवले गेले.
भारतीय सेनेच्या शौर्याला आणि पराक्रमाला जगभर सलाम आहे. आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाशिवाय पाकिस्तान व तिथल्या दहशतवादाला मूळापासून संपवणं गरजेचं झालं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भाकरी फिरणार? शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यताhttps://t.co/pGkuzo4SDx
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
-अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जलवाहतूकीवर
परीणाम
-वादळी वाऱ्यामुळे आज सकाळपासून बोट सेवा थांबवली
वातावरण पूर्ववत होईपर्यंत जलवाहतूक बंद राहणार
-भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा मात्र सुरूच राहणार
-महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची माहिती
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का? राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात. याला निमित्त ठरलंय शरद पवारांचं मोठं वक्तव्य. आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय. इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय. पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा शत्रू आणि मोस्ट वान्टेड दहशतवादी हाफिज सईदचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाफिज सईदचा कुठलाही ठावठिकाणा नाही. तसंच पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अंत्यविधीकडे हाफिज सईदनं पाठ फिरवली. त्यामुळे भारताच्या एअर स्ट्राईकनंतर हाफिज सईद कुठे गेला. त्याचं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय. भारतानं एअर स्ट्राईक करत हाफिज सईदचे अड्डे उद्धवस्त केले.
साखळी स्फोटांनी पाकिस्तानातील लाहोर शहर हादरलंय. लाहोरमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झालेत. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं. स्फोटांनंतर लाहोर शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळतायत. या स्फोटांच्या घटनेनंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केलाय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.