Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संततधार पावसामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग

नदीकाटच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संततधार पावसामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग

सातारा: लोणावळा शहर आणि परिसरात तसेच, पवन मावळ भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा वाढत आहे.

नदीकाटच्या गावांचा संपर्क तुटला

पाणीपातळी वाढ झाल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून ४५३७ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये करण्यात येत आहे. यामुळे पवना नदीवर असलेला शिवली पूल पाण्याखाली गेला असून यामुळे शिवली, भडवली, येलघोल, धनगव्हान या गावाचा येळसे मार्गी जाणारा रस्ता बंद झाला असून या गावांचा संपर्क तुटला आहे.

सतर्कतेचा इशारा

नदीकाटच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read More