Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Corona : आज राज्यात 56,286 रुग्णांची वाढ, तर 376 जणांचा मृत्यू

आज राज्यात 36,130 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Corona : आज राज्यात 56,286 रुग्णांची वाढ, तर 376 जणांचा मृत्यू

मुंबई : आज राज्यात कोरोनाचे 56,286 रुग्ण वाढले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 36,130 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 26,49,757 जण कोरोना संक्रमित झाले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट 82.5 टक्के असून मृत्यूदर 1.77 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 27,02,613 व्यक्ती होमक्वारांटाईन असून 22.661 व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 

पुण्यात आज दिवसभरात 7010 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 999 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये आज विक्रमी वाढ झाली आहे. आज एकूण 6508 रुग्ण वाढले असून 34 जणांचा मृत्यू झासा आहे.

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज 1224 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगरमध्ये आज नव्या 2233 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातमी : Corona च्या दुसऱ्या लाटेत समोर आली कोरोनाची नवी लक्षणं
 

Read More