Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'सबसे आगे हम हिंदुस्थानी' महाराष्ट्र गौरव सोहळ्यात शंकर महादेवन यांच्याकडून सैनिकांसाठी गौरवोद्गार!

Maharashtra Gaurav Awards: झी २४ तासच्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात शंकर महादेवन यांची मुलाखत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेतली. 

'सबसे आगे हम हिंदुस्थानी' महाराष्ट्र गौरव सोहळ्यात शंकर महादेवन यांच्याकडून सैनिकांसाठी गौरवोद्गार!

Maharashtra Gaurav Awards: मी दक्षिण भारतीय आहे. माझी मातृभाषा तामीळ आहे. पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या भूमीने मला सर्वकाही दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया शंकर महादेवन यांनी व्यक्त केली. झी २४ तासचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार शंकर महादेवन यांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेलो तेव्हा वातावरण पाहिलं आणि त्याची भव्यता कळाली. हा पुरस्कार एका गाण्यासाठी नाहीय. आता आपली जबाबदारी वाढलीय, याची जाणिव मला झाल्याचे शंकर महादेवन यावेळी म्हणाले. झी २४ तासच्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात शंकर महादेवन यांची मुलाखत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाने जे केलंय त्याच शब्दात वर्णन करता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हे मी २५ वर्षांपुर्वी म्हटलेलं. आता सबसे आगे हम हिंदुस्थानी असे शंकर महादेवन म्हणाले,

झी २४ तासचा महाराष्ट्र गौरव कार्यक्रम दिमाखात पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तरुणाईचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाली. दिपाली विचारे आणि समूहाने गणेश वंदना सादर करुन सैनिकांना मानवंदना दिली. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर ऑपरेशन सिंदूर- नारीशक्ती अंतर्गत मेजर प्राजक्ता देसाई, माजी लष्कर अधिकारी विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, माजी एअर फोर्स अधिकारी कमांडर श्रद्धा जगताप यांची मुलाखत घेण्यात आली.

यानंतर अभंग रिपोस्ट कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते वायूदूतच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शंकर महादेवन यांची मुलाखत घेतली. 

कला संस्कृती विभागातील महाराष्ट्र रत्न पुरस्कार अभंग रिपोस्टच्या चमूला देण्यात आला.  तसेच सामाजिक कार्यासाठी राजू केंद्र यांना सन्मानित करण्यात आले. सिनेमा विभागातून श्रीया पिळगावकरला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अपशिंगे या सैनिकांच्या गावाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला. शंकर महादेवन यांना महाराष्ट्र गौरवने पुरस्कृत करण्यात आले.

Read More