Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात 'या' ठिकाणी आहे एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! पर्यटक करतात गर्दी

Maharashtra Tourism : तुम्ही कधी रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात चमकणारे समुद्रकिनारे पाहिले आहेत का? भारतात असे पाच समुद्र किनारे असून त्यातील एक महाराष्ट्रात आहे. 

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात 'या' ठिकाणी आहे एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! पर्यटक करतात गर्दी

Maharashtra Tourism : उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा अथंग समुद्र किनारी जायला कोणाला नाही आवडतं. महाराष्ट्राला अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. भारतातही अनेक असे समुद्रकिनारे आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. दूरवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्याची शांतता कायम आपल्याला आकर्षित करतात. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा, सरकणारी वाळू आणि थंडगार वारा जेव्हा अंगाला स्पर्श करतो तेव्हा एक सुखद अनुभव हा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. खरं तर अनुभव शब्दात मांडताना येणार नाही. पण तुम्ही कधी असा समुद्र किनारा पाहिला आहे का, जो रात्रीच्या अंधारात चमकतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात अशी 5 समुद्रकिनारे आहेत. त्यातील एक महाराष्ट्राला लाभला आहे. 

अद्भुत आणि आश्चर्यकारक असा समुद्र किनाऱ्यांमध्ये रात्रीच्या अंधारात चांदण्यांसारखे चमकणारे हे समुद्र किनारे भारतातील महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, केरळ, अंदमान- निकोबार या ठिकाणी आहेत. 

गोवा -पालोलेम बीच

गोवा नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिली असून इथल्या पालोलेम बीच अत्यंत वेगळा आणि अद्भुत आहे. रात्रीच्या वेळी लखलख चमकणारा हा समुद्रकिनारा एका अत्यंत सुंदर दृश्यासह मनाला वेगळाच आनंद देतो. त्यामुळे गोव्याला गेलात तर रात्रीच्या वेळी पालोलेम बीचचे निखळ सौंदर्य पहायला नक्की जा. 

पश्चिम बंगाल -मंदारमणी बीच

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमणी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी ताऱ्याप्रमाणे चमकतो जे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. 

केरळ - वर्कला समुद्रकिनारा

केरळमधील वर्कला बीच ज्याला ‘पापनाशम बीच’ असेही म्हटलं जातं. हा भारतातील केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला नगरपालिकेच्या वर्कला टाउनमध्ये आहे. हा समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमचम करतो. 

अंदमान आणि निकोबार - राधानगरी बीच

अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावर असणारा राधानगरी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी चमकतो. मुख्य म्हणजे हा बीच रात्रीच्या काळोखात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळल्यासारखा भासतो. 

महाराष्ट्र - मालवण समुद्र किनारा

महाराष्ट्रातील कोकणातील मालवण हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण आहे. जिथला समुद्रकिनारा पाहणे अत्यंत सुखद अनुभव देतो. खास करून मालवण समुद्र किनारा रात्रीच्या वेळी पाहणारा आयुष्यात ते दृश्य विसरू शकत नाही. कारण हा बीच रात्रीच्या अंधारात अगदी आकाशातील ताऱ्यांसारखा चमकतो. जे पाहणे फारच आल्हाददायी अनुभव मानला जातो. 

समुद्र किनाऱ्यांच्या चमकण्यामागील कारण तुम्हाला माहितीये का?

रात्रीच्या वेळी समुद्र किनारे चमकण्यामागे  एक वैज्ञानिक कारण आहे. ते म्हणजे ‘बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन’. या समुद्रकिनारी तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता. कारण या ठिकाणी बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनची उपस्थिती असते. वर्षाच्या ठराविक काळात, बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन लाटांच्या हालचालीवर प्रतिक्रिया देतात. ज्यामुळे हे समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी चमकतात.

Read More