Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडली आहे. महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजिदत पवारांवर चिडले आहेत. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विष्य मांडणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे हे महायुतीचे सरकार आहे. महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदें यांचे सर्व मंत्री अजित पवारांविरोधात नाराज आहेत. यामुळे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री आणि एकटे अजित पवार अशा प्रकारचे चित्र उभे राहिले आहे.
शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. अजित पवार आमची विकासकामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केलीये.. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचं एकनाथ शिंदें नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकासकामं थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे.. तर सरकारमध्ये सर्वांना समान अधिकारी मिळावा, अशी भावना देखील व्यक्त केली आहे.
यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्यानं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे केली. यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती. महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे पहायला मिळत असलं तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय पाऊले उचलतात ते पहावे लागेल.