Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अजित पवार पैसे सोडत नाही' म्हणणाऱ्या शिंदेंच्या मंत्र्यांना अजित पवारांचा टोला; म्हणाले, 'मी काय...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी घटकपक्षांमध्येच सरकारी निधीवरुन जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच अजित पवारांनी हे विधान केलं आहे.

'अजित पवार पैसे सोडत नाही' म्हणणाऱ्या शिंदेंच्या मंत्र्यांना अजित पवारांचा टोला; म्हणाले, 'मी काय...'

Ajit Pawar NCP Speech: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) 26 वा वर्धापन दिन मंगळवारी पुण्यात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना शिंदेंच्या काही नेत्यांना देखील अप्रत्यक्ष सुनावल्याचं पाहायला मिळालं. 

अजित पवार काय म्हणाले?

सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देत थेट नाव न घेता मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावले आहे. "कधी कधी काही बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाहीत. पैसे सोडत नाही, मग मी काय खिशात पैसे घेऊन बसतोय का?" असा सवाल अजित पवारांनी जाहीर भाषणातून केला. अजित पवारांनी अर्थसंकल्पामधून पैसा कशापद्धतीने वापरला जातो हे ही पुढे सांगितलं.

पैसा कसा खर्च होतो हे ही सांगितलं

"राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आम्ही 20 टक्के पैसे सोडतो, दुसऱ्या तीन महिन्यांत 40 टक्के सोडतो. तिसऱ्या तीन महिन्यांत 60 टक्के सोडतो, नंतर 80 टक्के आणि शेवटी 100 टक्के सोडतो. अशा प्रकारचं ते नियोजन असतं. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. तेव्हाच हे लक्षात आलं की अशाच पद्धतीने अनुसूचित जातीलाही दिलं पाहिजे. कारण आयोग होता पण वैधानिक दर्जा नव्हता. त्यानंतर आज राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला", असं अजित पवार यांनी भाषणात म्हटलं.

ही माहिती सर्वांसमोर येत नाही

"समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतो. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला जास्त निधी दिला आहे. काही जण मुद्दामहून आपलं सरकार आल्यापासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांनी विधानं केले की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. आता या ठिकाणी नरहळी झिरवाळ आहेत. तसेच सर्वांना माहिती आहे की या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना आदिवासी विभागाला आपण 41 टक्के निधी वाढवून दिला आहे. पण ही माहिती सर्वांसमोर येत नाही,", असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Read More