Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Baramati Rainfall Alert:पुरामुळे सणसवाडीतील अनेकांचे संसार गेले वाहून; घरांमध्ये उरलाय फक्त चिखल आणि राडारोडा

Baramati Rainfall Alert : दादा सावंत यांच्या घरात साठवलेलं धान्यही वाहून गेल्यानं गेल्या दोन दिवसांपासून दादा सावंत आणि त्यांची पत्नी उपाशिपोटी घरातीच चिखलगाळ काढताहेत. दादा सावंत यांच्या घरात शिल्लक राहलाय फक्त हा देव्हारा. निसर्गाच्या या प्रकोपापुढे देवाचंही काही चाललं नाही का? हेच दर्शवणारी ही दृश्य.

Baramati Rainfall Alert:पुरामुळे सणसवाडीतील अनेकांचे संसार गेले वाहून; घरांमध्ये उरलाय फक्त चिखल आणि राडारोडा

Baramati Rainfall Alert : बारामतीमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. बारामतीमधील ओढ्याला आलेल्या पुरामुळे सणसवाडीतील अनेकांचे संसार वाहून गेलेत. ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्याचे पाणी गावात शिरलं. त्यामुळे नागरिकांना  जीव मुठीत धरून घरदार सोडून स्थलांतरित व्हावं लागलंय. या पुरामुळे घरांमध्ये उरलाय फक्त चिखल आणि राडारोडा.

बारामतीच्या सणसवाडी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक संसारांचा हा असा चिखल केलाय. ढगफुटी सदृश्य पावसाने सणसर ओढ्याला पूर आला आणि गावात पाणी शिरलं. एक दोन नव्हे तर तब्बल 400 ते 500 घरांना या पुराचा फटका बसला. सणसरवाडीतील दादा सावंत मोलमुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरातही या ओढ्याचं पाणी शिरलं आणि त्यांच्या घरातील होतं नव्हतं सगळं काही पुरात वाहून गेलं. राहिला फक्त चिखल आणि राडारोडा (Maharashtra Rains Update Pune Rainfall Baramati Sanaswadi Flood weather today at my location)

दादा सावंत यांच्या घरात साठवलेलं धान्यही वाहून गेल्यानं गेल्या दोन दिवसांपासून दादा सावंत आणि त्यांची पत्नी उपाशिपोटी घरातीच चिखलगाळ काढताहेत. दादा सावंत यांच्या घरात शिल्लक राहलाय फक्त हा देव्हारा. निसर्गाच्या या प्रकोपापुढे देवाचंही काही चाललं नाही का? हेच दर्शवणारी ही दृश्य.

दादा सावंत यांच्यासोबतच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुरेखा जगताप यांचाही संसार उघड्य़ावर पडलाय. सुरेखा जगताप यांच्या शेळ्या पुराच्या पाण्यात पाहुन गेलेत. त्यांनी वेळीच घर सोडल्याने त्यांची जीव वाचलाय. सरकारने किमान वेळेत पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी सरेखा जगताप यांनी केलीय.

ढगफुटीसदृश्य पाऊस आणि ओढ्यात चुकीच्या पद्धतीने टाकलेला भराव यामुळे हा पूर आळ्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. निसर्गाचा प्रकोप आणि मानवनिर्मीत चुका यामुळे सणसरवाडीतील अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. आता प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून सणसरवाडीतील हे संसार पुन्हा उभे करण्याची गरज आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसतं लढ म्हणा. अशी इथल्या नागरिकांची अवस्था झालीय. मायबाप सरकारने मदतरुपी हात या सणसरवाडीच्या गावकऱ्यांच्या पाठिवर ठेवण्याची गरज आहे.

Read More