Cyclone Alert Maharashtra : मान्सूनपूर्व पावसानं राज्यात सर्वत्र हाहाकार माजवलेला असतानाच आणखी एका संकटाची राज्याच्या किनारपट्टीवर लागली असून हे संकट आहे चक्रीवादळाचं. राज्यात पुढील काही तासांत चक्रीवादळाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळसदृश वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळं कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
22May, latest satellite obs at 7.30 am indicate a mod intensity cloud patch over South Konkan. Rest of Maharashtra scattered type clouds.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 22, 2025
As a effect of the system in Arabian Sea, a dense cloud mass observed over AS.
As posted earlier,only light rains obsd in city.
Pl watch IMD pic.twitter.com/WRFVrIaSzH
अरबी समुद्रामध्ये एकिकडून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानचा दुसरीकडे तयार होणारी चक्रीवादळसृश्य प्रणाली मान्सूनवर काही परिणाम करणार का, असाच प्रश्न अनेकांनी या स्थितीमध्ये उपस्थित केला आहे. दरम्यान तूर्तास तशी कोणतीही शक्यता किंवा चिन्हं दिसत नसून मान्सूनचे वारे त्यांच्या गतीनं पुढे सरकताना दिसत आहेत.
सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं मागील 24 तासांमध्ये श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला. या वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पूरक स्थिती निर्मआण झाल्यानं अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असणाऱ्या भागातही या वाऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे. दरम्यान मान्सूनच्या धडकण्यानं मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो दाखल झाला आहे. वाऱ्याची एकंदर गती पाहता पुढील तीन दिवसांत अर्थात रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, हा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं कायम ठेवला आहे.