Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचे मोठे निर्णय; लग्नासंदर्भात नवी नियमावली जाहीर, यापुढे....

वैष्णवी देशमुख प्रकरणानंतर मराठा समाज खडबडून जागा झाला आहे. मराठा समाजाच्या बैठकीत विवाहासंबंधित आचारसंहिता स्विकारण्यात आली आहे.   

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचे मोठे निर्णय; लग्नासंदर्भात नवी नियमावली जाहीर, यापुढे....

जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी झालेल्या मानसिक आणि शारिरीक छळामुळे वैष्णवी हगवणेला आपला जीव गमवावा लागल्यानंतर मराठा समाजाने आता मोठे निर्णय घेतले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीची प्रथा चर्चेत आली होती. त्यामुळे मराठा समाजाने आता बैठकीत ठराव मंजूर केला असून, विवाहासंदर्भात आचारसंहिता स्विकारली आहे. मराठा समाजाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत विवाहसोहळ्यांच्या स्वरूपात अमूलाग्र बदल करण्याचे ठरवण्यात आले. तसंच विवाहबद्दलची आचारसंहिता आणि नियमावाल स्वीकारण्यात आली..

वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबाला लग्नात 51 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. यानंतरही दोन कोटींच्या जमिनीसाठी तिचा छळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सामूहिक विवाह, मर्यादित खर्च, डीजे-फटाक्यांना बंदी असे निर्णय यावेळी घेण्यात आले. 

बैठकीत अनावश्यक खर्च, डीजे, फटाके आणि प्री-वेडिंग शूटसारख्या दिखाऊ गोष्टींना विरोध दर्शवण्यात आला. विवाहखर्च कमी करणे, दोन्ही कुटुंबांनी तो सामायिक करणे, आणि विवाहसंस्कार हे केवळ कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडणे, असे ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीस उपस्थित असलेल्या तरुण, तरुणी आणि पालकांनीही या निर्णयांचे स्वागत करत, सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलं आहे. 

याआधीही मराठा समाजाची बैठक पार पडली होती. मराठा समाज यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसंच अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आले होते. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं होतं. 

मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची बदनामी होते आहे. जाणीव पूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का? विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याचं समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली एका समाजातच होत नाही, सर्व समाजात ही वृत्ती आहे. समाजाला टार्गेट करायचं काम चालू आहे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. 

लग्नाचे प्रदर्शन होत आहे. मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मीडियातून मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नंदाने कस वागायचं हे शिकवा. विश्वास व्यक्त करायला हवा मुलीला शिकवा. तिला स्वतःच्या पायावर उभे करा असं सांगण्यात आलं. 

दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपण पण केले पाहिजे हा हट्ट नको, प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे. मुलीला शिकवा,तिला तुम्ही विश्वास द्या आई वडील भाऊ आम्ही सोबत आहोत.मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे हे आज मान्य करायला हवं.लग्न टीळे याचा राजकीय करण झालं आहे. पुणे शहरातील काही गावे तिथं तुम्ही मांडव टाकायला आठ वीस लाख देतात. पुण्यात वीस लाखाच्या आत लग्नच होत नाही. भाषणबाजी बंद करा,लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा,कमी खर्चात करा.साखरपुडा हळद एकत्रीत केलं जावे. शाहू महाराज म्हटले होते जमीन विकून मुलीचे लग्न करू नका अशी आठवण करुन देण्यात आली. 

Read More