Mumbai Nagpur Samruddhi Expressway: महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग असलेल्या मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णपमे वाहतूरीसाठी खुला होणार आहे. या महामार्गावर 319 अंडरपास, 307 पूल, 65 उड्डाणपूल, 6 बोगदे, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज आहेत. तसेच इथं हेलिपॅडचीही व्यवस्था आहे. एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात. समृद्धी महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गावर टोलनाके देखील उभारण्यात आले आहेत.
मुंबई ते नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांतील 390 गावांमधून जाणार आहे. या मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर प्रवासासाठी सध्या 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 7 तासांत पूर्ण होणार आहे.
समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतून जात आहे. नागपूर, वर्धा, अमरावती आणि इतर जिल्ह्यांना जोडणार आहे. नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे या मार्गाने हे जिल्हे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 अतिरिक्त जिल्ह्यांना देखील जोडला जाणार आहे.
समृद्धी महामार्ग हा शिर्डी, बीबी का मकबरा, सुला द्राक्ष बाग, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, तानसा वन्यजीव अभयारण्य, पेंच नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणार आहे. समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा 'ग्रीनफिल्ड' मार्ग आहे. वन्यजीवांच्या हालचालींसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. या महामार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे, 189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास बांधण्यात आले आहेत. भारतातील सर्वात रुंद 17.5 मीटरचा बोगदा आणि महाराष्ट्रातील 8 किलोमीटरचा सर्वात लांब बोगदा समृद्धी महामार्ग इगतपुरी येथे आहे.
समृद्धी महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण झाले. लवकरच संपूर्ण महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटरच्या महामार्गावरुन वाहतूक सुरु आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटच्या टप्प्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.